शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाथसागराच्या पाण्यात जॅकवेल उभारण्यासाठी २० मीटर खोदकाम; १३ जेसीबी लागल्या कामाला

By मुजीब देवणीकर | Updated: October 27, 2023 19:01 IST

जायकवाडी धरणात साडेआठ मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नाथसागराच्या पाण्यात जॅकवेल (उद्भव विहीर) बांधण्यासाठी तब्बल २० मीटरपर्यंत खोल, १०० मीटर रुंद तर ३०० मीटर लांब असे खोदकाम करावे लागणार आहे. आतापर्यंत साडेआठ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले. १३ जेसीबींच्या मदतीने नोव्हेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. जॅकवेलचे काम डिसेंबर २०२४ पूर्वी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

२०५० मध्ये शहराची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. २०४० कोटी रुपये योजनेवर खर्च होत असून, १ हजार कोटी रुपये केंद्र, राज्य शासनाने दिले आहेत. शहरात ५३ जलकुंभ, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाठी मोठी जलवाहिनी, नक्षत्रवाडीच्या डोंगरावर सहा जलशुद्धीकरण केंद्रे, शहरात १८०० किमी अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे उभारणे, जायकवाडी धरणात जॅकवेल इ. कामांचा यात समावेश आहे.

पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा खंडपीठाकडून वारंवार आढावा घेतला जात आहे. मुख्य जलवाहिनीचे काम ३९ किलोमीटरपैकी आतापर्यंत २२ किलोमीटर काम झाले असून, आणखी ७ किलोमीटर जलवाहिन्या रस्त्यावर आहेत. त्यासोबतच सध्या १८ जलकुंभांचे काम हाती घेण्यात आले आहे. ९ जलकुंभांचे काम प्रगतिपथावर असून, उर्वरित जलकुंभांच्या कामाला सुरुवात झालेली नाही. कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने ३५ जलकुंभांच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. जॅकवेलच्या कामाला सुरुवात झाली आहे. पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी जॅकवेलचे काम वेळेवर पूर्ण होणे गरजेचे आहे.

जायकवाडीच्या पाण्यात भिंतपाऊस कमी झाल्यामुळे नाथसागर भरलाच नाही. नाथसागर भरल्यास जॅकवेलच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये, पाणी आत येऊ नये यासाठी दोन मीटर उंचीची व्हर्टिकल भिंत तयार करण्यात आली आहे. पुढील वर्षी धरण भरले तरी जॅकवेलच्या कामात अडथळा येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी