शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नाथसागराच्या पाण्यात जॅकवेल उभारण्यासाठी २० मीटर खोदकाम; १३ जेसीबी लागल्या कामाला

By मुजीब देवणीकर | Updated: October 27, 2023 19:01 IST

जायकवाडी धरणात साडेआठ मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नाथसागराच्या पाण्यात जॅकवेल (उद्भव विहीर) बांधण्यासाठी तब्बल २० मीटरपर्यंत खोल, १०० मीटर रुंद तर ३०० मीटर लांब असे खोदकाम करावे लागणार आहे. आतापर्यंत साडेआठ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले. १३ जेसीबींच्या मदतीने नोव्हेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. जॅकवेलचे काम डिसेंबर २०२४ पूर्वी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

२०५० मध्ये शहराची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. २०४० कोटी रुपये योजनेवर खर्च होत असून, १ हजार कोटी रुपये केंद्र, राज्य शासनाने दिले आहेत. शहरात ५३ जलकुंभ, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाठी मोठी जलवाहिनी, नक्षत्रवाडीच्या डोंगरावर सहा जलशुद्धीकरण केंद्रे, शहरात १८०० किमी अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे उभारणे, जायकवाडी धरणात जॅकवेल इ. कामांचा यात समावेश आहे.

पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा खंडपीठाकडून वारंवार आढावा घेतला जात आहे. मुख्य जलवाहिनीचे काम ३९ किलोमीटरपैकी आतापर्यंत २२ किलोमीटर काम झाले असून, आणखी ७ किलोमीटर जलवाहिन्या रस्त्यावर आहेत. त्यासोबतच सध्या १८ जलकुंभांचे काम हाती घेण्यात आले आहे. ९ जलकुंभांचे काम प्रगतिपथावर असून, उर्वरित जलकुंभांच्या कामाला सुरुवात झालेली नाही. कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने ३५ जलकुंभांच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. जॅकवेलच्या कामाला सुरुवात झाली आहे. पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी जॅकवेलचे काम वेळेवर पूर्ण होणे गरजेचे आहे.

जायकवाडीच्या पाण्यात भिंतपाऊस कमी झाल्यामुळे नाथसागर भरलाच नाही. नाथसागर भरल्यास जॅकवेलच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये, पाणी आत येऊ नये यासाठी दोन मीटर उंचीची व्हर्टिकल भिंत तयार करण्यात आली आहे. पुढील वर्षी धरण भरले तरी जॅकवेलच्या कामात अडथळा येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी