शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार प्रस्ताव धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2017 23:35 IST

जिंतूर : येथील संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थी निवडीसाठी समितीची बैठक तब्बल ११ महिन्यांपासून झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : येथील संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थी निवडीसाठी समितीची बैठक तब्बल ११ महिन्यांपासून झालेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेले जवळपास २ हजार प्रस्ताव मान्यतेअभावी धूळ खात पडून आहेत.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजना, विधवा परितक्त्या निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर शासनाच्या वतीने त्यांना दरमहा ६०० रुपये मानधन दिल्या जाते. तालुक्यामध्ये इंदिरा गांधी, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन निराधारांची संख्या जवळपास ४ हजार २६ आहे. तर इंदिरा गांधी विधवा निराधार लाभार्थ्यांची संख्या ५७ असून राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन लाभार्थ्यांची संख्या ७ आहे. संजय गांधी निराधारचे १ हजार ९२३, श्रावणबाळ योजनेतील ४०८ लाभार्थी आहेत. या व्यतीरिक्त तालुक्यातील तब्बल २ हजार लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व इतर कारणामुळे ११ महिन्यांपासून निराधार योजना लाभार्थी निवड समितीची बैठक झालेली नाही. तहसील विभागाकडे आलेले २ हजार प्रस्ताव मान्यतेअभावी पडून आहेत. लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थ्यांची निवड केली जाते. तहसीलदार पदावर पुर्ण वेळ अधिकारी नसल्याने लाभार्थी निवडीसाठीही उशिर होत असल्याचे बोलले जात होते. एक महिन्यापुर्वी तहसीलदार पदाचा पदभार सुरेश शेजुळ यांनी स्विकारल्यामुळे लाभार्थी निवडीची बैठक तातडीने होईल, असे वाटत होते. परंतु, शेजूळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अद्यापही बैठक झालेली नाही. त्यामुुळे प्रस्ताव दाखल केलेले लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये चकरा मारीत आहेत. शिवाय सध्याच्या लाभार्थ्यांना तीन ते चार महिन्याला मानधन मिळत असल्याने त्यांना विविध अडचणीना लाभार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.