शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या दु:खावर दिवाळीत फुंकर; १९१४ कोटीची मदत खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 12:19 IST

पहिल्या टप्प्यात ७५ टक्के मदत देण्यात येणार असल्याने महसूल यंत्रणेचे काम चौपट वाढले.

२८२१ कोटींचा पहिला टप्पा : सहा जिल्ह्यांची मदत वाटपात आघाडी

औरंगाबाद : मराठवाड्यात ४७ लाख शेतकऱ्यांचे ३६ लाख ६२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वाटपाला वेग आला आहे. दिवाळीपूर्वीच ६७ टक्के म्हणजेच १९१४ कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत हे प्रमाण २५०० कोटींच्या आसपास जाईल, असा अंदाज आहे. औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांनी मदत वाटपात आघाडी घेतली आहे. नांदेड आणि उस्मानाबादचा अहवाल विभागीय प्रशासनाला मंगळवारपर्यंत आलेला नव्हता. नांदेड व उस्मानाबाद वगळता सुमारे २५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचली आहे.

पहिल्या टप्प्यात ७५ टक्के मदत देण्यात येणार असल्याने महसूल यंत्रणेचे काम चौपट वाढले. शनिवार आणि रविवारी सुटी असतानाही सगळी यंत्रणा ७५ आणि २५ टक्क्यांच्या दोन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात गुंतली होती. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन शीर्षकांखाली येणाऱ्या निधींचे वाटप करताना शेतकऱ्यांच्या खातेनिहाय दोन वेगळ्या याद्या कराव्या लागल्या. त्यामुळे मदतीस विलंब झाला.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून विभागाला ३७६२ कोटी रुपयांतील ७५ टक्के म्हणजेच २८२१ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार रु. जाहीर केले असून, ७५ टक्क्यांच्या तुलनेत ७५०० रुपये हेक्टरी मिळतील. बागायतीसाठी १५ हजारांच्या तुलनेत ११ हजार २५०, तर फळपिकांसाठी २५ हजार हेक्टरच्या एकूण मदतीपैकी १८ हजार ७५० रुपयांची मदत वाटप सुरू आहे.

एवढ्या कोटींचे वाटप पूर्णऔरंगाबाद जिल्ह्यात ४१६ कोटींपैकी ३२१ वाटप झाले आहेत. जालना जिल्ह्यात ४२५ पैकी ३६६ कोटी, परभणीत २५५ पैकी १३७ कोटी, हिंगोलीत २२२ पैकी १९२ कोटी, नांदेडचा अहवाल अजून आलेला नाही. बीड जिल्ह्यात ५०२ पैकी ३७९ कोटी तर लातूर जिल्ह्यात ३३६ पैकी ३०६ कोटी वाटप झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात २३७ पैकी २१० कोटी वाटप झाले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarathwadaमराठवाडा