शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांच्या दु:खावर दिवाळीत फुंकर; १९१४ कोटीची मदत खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 12:19 IST

पहिल्या टप्प्यात ७५ टक्के मदत देण्यात येणार असल्याने महसूल यंत्रणेचे काम चौपट वाढले.

२८२१ कोटींचा पहिला टप्पा : सहा जिल्ह्यांची मदत वाटपात आघाडी

औरंगाबाद : मराठवाड्यात ४७ लाख शेतकऱ्यांचे ३६ लाख ६२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वाटपाला वेग आला आहे. दिवाळीपूर्वीच ६७ टक्के म्हणजेच १९१४ कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत हे प्रमाण २५०० कोटींच्या आसपास जाईल, असा अंदाज आहे. औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांनी मदत वाटपात आघाडी घेतली आहे. नांदेड आणि उस्मानाबादचा अहवाल विभागीय प्रशासनाला मंगळवारपर्यंत आलेला नव्हता. नांदेड व उस्मानाबाद वगळता सुमारे २५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचली आहे.

पहिल्या टप्प्यात ७५ टक्के मदत देण्यात येणार असल्याने महसूल यंत्रणेचे काम चौपट वाढले. शनिवार आणि रविवारी सुटी असतानाही सगळी यंत्रणा ७५ आणि २५ टक्क्यांच्या दोन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात गुंतली होती. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन शीर्षकांखाली येणाऱ्या निधींचे वाटप करताना शेतकऱ्यांच्या खातेनिहाय दोन वेगळ्या याद्या कराव्या लागल्या. त्यामुळे मदतीस विलंब झाला.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून विभागाला ३७६२ कोटी रुपयांतील ७५ टक्के म्हणजेच २८२१ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार रु. जाहीर केले असून, ७५ टक्क्यांच्या तुलनेत ७५०० रुपये हेक्टरी मिळतील. बागायतीसाठी १५ हजारांच्या तुलनेत ११ हजार २५०, तर फळपिकांसाठी २५ हजार हेक्टरच्या एकूण मदतीपैकी १८ हजार ७५० रुपयांची मदत वाटप सुरू आहे.

एवढ्या कोटींचे वाटप पूर्णऔरंगाबाद जिल्ह्यात ४१६ कोटींपैकी ३२१ वाटप झाले आहेत. जालना जिल्ह्यात ४२५ पैकी ३६६ कोटी, परभणीत २५५ पैकी १३७ कोटी, हिंगोलीत २२२ पैकी १९२ कोटी, नांदेडचा अहवाल अजून आलेला नाही. बीड जिल्ह्यात ५०२ पैकी ३७९ कोटी तर लातूर जिल्ह्यात ३३६ पैकी ३०६ कोटी वाटप झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात २३७ पैकी २१० कोटी वाटप झाले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarathwadaमराठवाडा