शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मुख्यमंत्र्यांकडून जुनी जलवाहिनी बदलण्यास १९० कोटी मंजूर, वाढीव पाणी मिळण्याचा मार्ग खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 20:10 IST

१,६८० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जुनी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. १९० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी बदलण्यात येईल. या प्रस्तावाला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

१,६८० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे. तूर्त औरंगाबाद शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्यात तर पाणीप्रश्न अधिक गंभीर बनतो. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत १९७५ साली टाकण्यात आलेली जुनी जलवाहिनी बदलण्याचा पर्याय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचविण्यात आला होता. त्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंदाजपत्रक तयार करून शासनाला सादर केले होते. जवळपास १९० कोटी रुपये जलवाहिनी बदलण्यास खर्च येणार आहे. सध्या या जलवाहिनीतून ३० ते ३५ एमएलडी एवढेच पाणी येत आहे. जलवाहिनी बदलल्यानंतर शहराला किमान ६५ ते ७० एमएलडी पाणी मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांना आहे. या जलवाहिनीमुळे शहरात वाढीव पाणीही येईल.

‘लोकमत’चा पाठपुरावाशहराची तहान भागविण्यासाठी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्यासाठी ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त जिल्ह्यातील रखडलेल्या प्रस्तावांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनी बदलण्यासाठी १९० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा केली.

काम मनपा करणार?महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अगोदरच १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सोपविण्यात आले आहे. त्यात आता आणखी जलवाहिनीचे काम दिल्यास मुख्य योजनेच्या कामाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम मनपाकडे सोपविण्यात येऊ शकते, असे सुतोवाच दोन दिवसांपूर्वीच प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका