शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांकडून जुनी जलवाहिनी बदलण्यास १९० कोटी मंजूर, वाढीव पाणी मिळण्याचा मार्ग खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 20:10 IST

१,६८० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जुनी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. १९० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी बदलण्यात येईल. या प्रस्तावाला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

१,६८० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे. तूर्त औरंगाबाद शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्यात तर पाणीप्रश्न अधिक गंभीर बनतो. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत १९७५ साली टाकण्यात आलेली जुनी जलवाहिनी बदलण्याचा पर्याय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचविण्यात आला होता. त्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंदाजपत्रक तयार करून शासनाला सादर केले होते. जवळपास १९० कोटी रुपये जलवाहिनी बदलण्यास खर्च येणार आहे. सध्या या जलवाहिनीतून ३० ते ३५ एमएलडी एवढेच पाणी येत आहे. जलवाहिनी बदलल्यानंतर शहराला किमान ६५ ते ७० एमएलडी पाणी मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांना आहे. या जलवाहिनीमुळे शहरात वाढीव पाणीही येईल.

‘लोकमत’चा पाठपुरावाशहराची तहान भागविण्यासाठी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्यासाठी ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त जिल्ह्यातील रखडलेल्या प्रस्तावांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनी बदलण्यासाठी १९० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा केली.

काम मनपा करणार?महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अगोदरच १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सोपविण्यात आले आहे. त्यात आता आणखी जलवाहिनीचे काम दिल्यास मुख्य योजनेच्या कामाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम मनपाकडे सोपविण्यात येऊ शकते, असे सुतोवाच दोन दिवसांपूर्वीच प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका