शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

१८ तासांत ३३.४ मि.मी. पाऊस

By admin | Updated: November 16, 2014 00:00 IST

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली संततधार शनिवारी दुपारपर्यंत सुरू होती. १८ तासांत ३३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हिवाळा सुरू झाला; पण अजून बोचरी थंडीही जाणवू लागली नव्हती.

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली संततधार शनिवारी दुपारपर्यंत सुरू होती. १८ तासांत ३३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हिवाळा सुरू झाला; पण अजून बोचरी थंडीही जाणवू लागली नव्हती. त्यात पावसाने हजेरी लावून ऋतुचक्राची घडीच बिघडून टाकली. या पावसाने शहरातील व आसपासच्या परिसरातील रस्त्यांची दैना करून टाकली. रस्त्यांवरील खड्ड्यांचे रूपांतर तळ्यात झाले होते. पाण्यामुळे खोलीच न कळाल्याने अनेक दुचाकी खड्ड्यातआदळल्या. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झाला. मात्र, थंडीऐवजी भरदुपारचे ऊन शहरवासीयांचा घाम काढीत होते. मात्र, अचानक शुक्रवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी ६ च्या मुहूर्तावर संततधार सुरू झाली ते शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जोर कायम होता. शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेदरम्यान २८.४ मि.मी. व त्यानंतर ११.३० वाजेपर्यंत ५.० मि.मी. या १८ तासांत ३३.४ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर एकदम कमी झाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवघी ०.५ मि.मी. पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. यंदा पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने आता हिवाळ्यात पाऊस पडणार नाही, असा शहरवासीयांचा अंदाज होता; पण अचानक पावसाने हजेरी लावल्याने कपाटात ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर काढावे लागले. सकाळी विद्यार्थीही रेनकोट घालून शाळेत जाताना दिसले. पावसाचा जोर कायम असल्याने सकाळच्या वेळी चाकरमानी रेनकोट, छत्री हातात घेऊनच घराबाहेर पडले होते. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर खूपच मंदावला होता; पण ढगाळ वातावरण कायम होते. परिणामी, दिवसभर शहरवासीयांना सूर्यदर्शन घडले नाही. शहागंज भाजीमंडईत चिखल शहागंज भाजीमंडईत पावसाने सर्वत्र चिखल निर्माण झाला होता. चिखल तुडवत ग्राहकांना भाजी खरेदी करावी लागत होती. आधीच उकिरड्यावर भरणाऱ्या या भाजीमंडईत सडलेल्या भाज्यांच्या ढिगावर पावसाचे पाणी पडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. बाजारात सर्वत्र चिखल त्यावर पोते टाकून भाज्यांची विक्री केली जात होती, अशा गलिच्छ वातावरणात भाजी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. येथील विक्रेत्याने सांगितले की, दिवसभरात २५ टक्केच भाजीपाला विक्री झाला. शिल्लक माल आता फेकून देण्याची वेळ आली आहे. ताडपत्रीने झाकले धान्य जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारात व्यापाऱ्यांनी धान्याचे पोते रस्त्यावर ठेवले होते. एकावर एक धान्याचे पोते रचून ठेवण्यात आले होते. पावसामुळे या धान्याच्या पोत्यावर ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, पावसाच्या पाण्याने खालचे पोते भिजले.