शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

१८ तासांत ३३.४ मि.मी. पाऊस

By admin | Updated: November 16, 2014 00:00 IST

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली संततधार शनिवारी दुपारपर्यंत सुरू होती. १८ तासांत ३३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हिवाळा सुरू झाला; पण अजून बोचरी थंडीही जाणवू लागली नव्हती.

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली संततधार शनिवारी दुपारपर्यंत सुरू होती. १८ तासांत ३३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हिवाळा सुरू झाला; पण अजून बोचरी थंडीही जाणवू लागली नव्हती. त्यात पावसाने हजेरी लावून ऋतुचक्राची घडीच बिघडून टाकली. या पावसाने शहरातील व आसपासच्या परिसरातील रस्त्यांची दैना करून टाकली. रस्त्यांवरील खड्ड्यांचे रूपांतर तळ्यात झाले होते. पाण्यामुळे खोलीच न कळाल्याने अनेक दुचाकी खड्ड्यातआदळल्या. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झाला. मात्र, थंडीऐवजी भरदुपारचे ऊन शहरवासीयांचा घाम काढीत होते. मात्र, अचानक शुक्रवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी ६ च्या मुहूर्तावर संततधार सुरू झाली ते शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जोर कायम होता. शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेदरम्यान २८.४ मि.मी. व त्यानंतर ११.३० वाजेपर्यंत ५.० मि.मी. या १८ तासांत ३३.४ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर एकदम कमी झाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवघी ०.५ मि.मी. पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. यंदा पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने आता हिवाळ्यात पाऊस पडणार नाही, असा शहरवासीयांचा अंदाज होता; पण अचानक पावसाने हजेरी लावल्याने कपाटात ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर काढावे लागले. सकाळी विद्यार्थीही रेनकोट घालून शाळेत जाताना दिसले. पावसाचा जोर कायम असल्याने सकाळच्या वेळी चाकरमानी रेनकोट, छत्री हातात घेऊनच घराबाहेर पडले होते. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर खूपच मंदावला होता; पण ढगाळ वातावरण कायम होते. परिणामी, दिवसभर शहरवासीयांना सूर्यदर्शन घडले नाही. शहागंज भाजीमंडईत चिखल शहागंज भाजीमंडईत पावसाने सर्वत्र चिखल निर्माण झाला होता. चिखल तुडवत ग्राहकांना भाजी खरेदी करावी लागत होती. आधीच उकिरड्यावर भरणाऱ्या या भाजीमंडईत सडलेल्या भाज्यांच्या ढिगावर पावसाचे पाणी पडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. बाजारात सर्वत्र चिखल त्यावर पोते टाकून भाज्यांची विक्री केली जात होती, अशा गलिच्छ वातावरणात भाजी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. येथील विक्रेत्याने सांगितले की, दिवसभरात २५ टक्केच भाजीपाला विक्री झाला. शिल्लक माल आता फेकून देण्याची वेळ आली आहे. ताडपत्रीने झाकले धान्य जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारात व्यापाऱ्यांनी धान्याचे पोते रस्त्यावर ठेवले होते. एकावर एक धान्याचे पोते रचून ठेवण्यात आले होते. पावसामुळे या धान्याच्या पोत्यावर ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, पावसाच्या पाण्याने खालचे पोते भिजले.