शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

१८ तासांत ३३.४ मि.मी. पाऊस

By admin | Updated: November 16, 2014 00:00 IST

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली संततधार शनिवारी दुपारपर्यंत सुरू होती. १८ तासांत ३३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हिवाळा सुरू झाला; पण अजून बोचरी थंडीही जाणवू लागली नव्हती.

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली संततधार शनिवारी दुपारपर्यंत सुरू होती. १८ तासांत ३३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हिवाळा सुरू झाला; पण अजून बोचरी थंडीही जाणवू लागली नव्हती. त्यात पावसाने हजेरी लावून ऋतुचक्राची घडीच बिघडून टाकली. या पावसाने शहरातील व आसपासच्या परिसरातील रस्त्यांची दैना करून टाकली. रस्त्यांवरील खड्ड्यांचे रूपांतर तळ्यात झाले होते. पाण्यामुळे खोलीच न कळाल्याने अनेक दुचाकी खड्ड्यातआदळल्या. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झाला. मात्र, थंडीऐवजी भरदुपारचे ऊन शहरवासीयांचा घाम काढीत होते. मात्र, अचानक शुक्रवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी ६ च्या मुहूर्तावर संततधार सुरू झाली ते शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जोर कायम होता. शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेदरम्यान २८.४ मि.मी. व त्यानंतर ११.३० वाजेपर्यंत ५.० मि.मी. या १८ तासांत ३३.४ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर एकदम कमी झाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवघी ०.५ मि.मी. पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. यंदा पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने आता हिवाळ्यात पाऊस पडणार नाही, असा शहरवासीयांचा अंदाज होता; पण अचानक पावसाने हजेरी लावल्याने कपाटात ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर काढावे लागले. सकाळी विद्यार्थीही रेनकोट घालून शाळेत जाताना दिसले. पावसाचा जोर कायम असल्याने सकाळच्या वेळी चाकरमानी रेनकोट, छत्री हातात घेऊनच घराबाहेर पडले होते. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर खूपच मंदावला होता; पण ढगाळ वातावरण कायम होते. परिणामी, दिवसभर शहरवासीयांना सूर्यदर्शन घडले नाही. शहागंज भाजीमंडईत चिखल शहागंज भाजीमंडईत पावसाने सर्वत्र चिखल निर्माण झाला होता. चिखल तुडवत ग्राहकांना भाजी खरेदी करावी लागत होती. आधीच उकिरड्यावर भरणाऱ्या या भाजीमंडईत सडलेल्या भाज्यांच्या ढिगावर पावसाचे पाणी पडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. बाजारात सर्वत्र चिखल त्यावर पोते टाकून भाज्यांची विक्री केली जात होती, अशा गलिच्छ वातावरणात भाजी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. येथील विक्रेत्याने सांगितले की, दिवसभरात २५ टक्केच भाजीपाला विक्री झाला. शिल्लक माल आता फेकून देण्याची वेळ आली आहे. ताडपत्रीने झाकले धान्य जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारात व्यापाऱ्यांनी धान्याचे पोते रस्त्यावर ठेवले होते. एकावर एक धान्याचे पोते रचून ठेवण्यात आले होते. पावसामुळे या धान्याच्या पोत्यावर ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, पावसाच्या पाण्याने खालचे पोते भिजले.