शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

दूषित पाण्यामुळे गंगापूर तालुक्यात १५ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:37 AM

तालुक्यातील शिंगी येथे रविवारी रात्री ९ वाजता दूषित पाण्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

गंगापूर : तालुक्यातील शिंगी येथे रविवारी रात्री ९ वाजता दूषित पाण्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.शिंगी येथील जाधव कुटुंब हे शेतवस्तीवर वास्तव्यास असून सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने शेतकरी मिळेल त्या पाण्याचा वापर करून तहान भागवतात.रात्री ९ वाजता विषबाधेने अस्वस्थ झालेल्या रुग्णांना ग्रामस्थांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती चव्हाण, श्रद्धा गुडदे, अंजली गायकवाड यांनी तातडीने उपचार केले व घाटीकडे रवाना केले.विषबाधा झालेल्यांमध्ये बाळासाहेब जाधव, लक्ष्मण जाधव, तेजस फालके, किरण जाधव (३ महिने), अनिकेत जाधव, ओम जाधव (७), राम जाधव (६), गोकुळ जाधव (२२), सरला जाधव (३०), पूनम फालके (२२), कल्याणी जाधव (३), भागीरथी जाधव (५२), शशिकला नागरे (५०), लता जाधव (३०), झेलाबाई फालके (४०) आदींचा समावेश आहे.उपसा न झालेल्याविहिरीचे पाणी पिलेबाळू नाना जाधव यांच्या गट नंबर ३४ मध्ये स्वत:ची विहीर आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून या विहिरीतील पाण्याच्या उपसा झालेला नव्हता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाळू जाधव यांचे कुटुब हेच पाणी पित होते. तेव्हापासून या कुटुंबातील काही सदस्यांना चक्कर येणे, डोळ्याला अंधारी येणे, उलटी होणे असा त्रास जाणवत होता. रविवारी रात्री मात्र त्रास वाढल्याने सर्वांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

टॅग्स :water shortageपाणीकपातhospitalहॉस्पिटल