शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

एमआयडीसीत १५ तासांची पाणी कपात; आता होणारा रोटेशननुसार पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 17:32 IST

उद्योगांच्या उत्पादनाला फटका बसणार आहे.

ठळक मुद्देउद्योगांवर होणार परिणाम  वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, जालना औद्योगिक वसाहतीला फटका

औरंगाबाद/ वाळूज महानगर : दुष्काळामुळे औद्योगिक वसाहतींचा १५ तासांनी पाणीपुरवठा कपात करण्याची वेळ आली आहे. उद्योग व निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एमआयडीसीने तयार केले आहे. यामुळे वाळूजसह शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींतील उद्योगांच्या उत्पादनाला फटका बसणार आहे. या निर्णयापूर्वी कुठे २४, तर कुठे १८ किंवा १३ तास उद्योगांना पाणीपुरवठा होत असे, आता ५ ते ३ तासच पाणीपुरवठा होणार आहे.

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एमआयडीसीने धरणातील उपलब्ध साठ्याचे नियोजन करून उद्योगांसह निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांचे पाणी कमीत कमी कपात करण्यात येईल, असे सांगितले होते. वाळूज महानगरातील निवासी क्षेत्राला पहाटे ५ ते दुपारी १ व वाळूज औद्योगिक क्षेत्राला दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. याचप्रमाणे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्राला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत फक्त ३ तास, शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार ३ तास, औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राला सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत, तर औरंगाबाद नागरी वसाहतीला सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तसेच जालना औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार दररोज ३ तास पाणी दिले जाणार आहे. 

एमआयडीसीकडून वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, जालना औद्योगिक वसाहतीला, तसेच वाळूज महानगरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जायकवाडीत पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. दुष्काळामुळे जिल्ह्यातील १२ लाख लोकसंख्येला पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणी द्यावे लागत आहे. एमआयडीसीच्या वाळूज, शेंद्रा येथील जलकुंभावरून ग्रामीण भागासह मनपाला टँकरने पाणी द्यावे लागत आहे. सध्या जायकवाडीतील मृतसाठ्यातून उद्योगासह निवासी क्षेत्राला पाणीपुरवठा होत आहे. 

उद्योगांवर होणार परिणाम वाळूज औद्योगिक क्षेत्रात पाण्यावर अवलंबून असलेले ५ ते १० टक्के मद्य, बीअर, औषधी कंपन्या आहेत. तसेच अनेक कोटिंग उद्योगांना तापमान थंड करून ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. या उद्योगावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ४अनेक गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पाणी मिळत असल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातही एमआयडीसीने निवासी क्षेत्राच्या पाणीपुरवठा वेळेत कपात केली आहे. नागरी वसाहतीत आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादWaterपाणीdroughtदुष्काळ