शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

एमआयडीसीत १५ तासांची पाणी कपात; आता होणारा रोटेशननुसार पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 17:32 IST

उद्योगांच्या उत्पादनाला फटका बसणार आहे.

ठळक मुद्देउद्योगांवर होणार परिणाम  वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, जालना औद्योगिक वसाहतीला फटका

औरंगाबाद/ वाळूज महानगर : दुष्काळामुळे औद्योगिक वसाहतींचा १५ तासांनी पाणीपुरवठा कपात करण्याची वेळ आली आहे. उद्योग व निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एमआयडीसीने तयार केले आहे. यामुळे वाळूजसह शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींतील उद्योगांच्या उत्पादनाला फटका बसणार आहे. या निर्णयापूर्वी कुठे २४, तर कुठे १८ किंवा १३ तास उद्योगांना पाणीपुरवठा होत असे, आता ५ ते ३ तासच पाणीपुरवठा होणार आहे.

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एमआयडीसीने धरणातील उपलब्ध साठ्याचे नियोजन करून उद्योगांसह निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांचे पाणी कमीत कमी कपात करण्यात येईल, असे सांगितले होते. वाळूज महानगरातील निवासी क्षेत्राला पहाटे ५ ते दुपारी १ व वाळूज औद्योगिक क्षेत्राला दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. याचप्रमाणे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्राला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत फक्त ३ तास, शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार ३ तास, औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राला सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत, तर औरंगाबाद नागरी वसाहतीला सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तसेच जालना औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार दररोज ३ तास पाणी दिले जाणार आहे. 

एमआयडीसीकडून वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, जालना औद्योगिक वसाहतीला, तसेच वाळूज महानगरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जायकवाडीत पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. दुष्काळामुळे जिल्ह्यातील १२ लाख लोकसंख्येला पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणी द्यावे लागत आहे. एमआयडीसीच्या वाळूज, शेंद्रा येथील जलकुंभावरून ग्रामीण भागासह मनपाला टँकरने पाणी द्यावे लागत आहे. सध्या जायकवाडीतील मृतसाठ्यातून उद्योगासह निवासी क्षेत्राला पाणीपुरवठा होत आहे. 

उद्योगांवर होणार परिणाम वाळूज औद्योगिक क्षेत्रात पाण्यावर अवलंबून असलेले ५ ते १० टक्के मद्य, बीअर, औषधी कंपन्या आहेत. तसेच अनेक कोटिंग उद्योगांना तापमान थंड करून ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. या उद्योगावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ४अनेक गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पाणी मिळत असल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातही एमआयडीसीने निवासी क्षेत्राच्या पाणीपुरवठा वेळेत कपात केली आहे. नागरी वसाहतीत आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादWaterपाणीdroughtदुष्काळ