शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

औरंगाबादेत PFI च्या १४ कार्यकर्त्यांची धरपकड; आयबीचे पथक शहरात दाखल

By राम शिनगारे | Updated: September 27, 2022 12:15 IST

पहाटे झालेल्या संयुक्त कारवाईत तब्बल २०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते अशी माहिती आहे. 

औरंगाबाद: शहरात पीएफआय कार्यकर्त्यांची धरपकड सुरूच आहे. आज पहाटे १४ पीएफआय कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, शहरात अजूनही शहरात एनआयए, आयबी, एटीएस आणि शहर पोलीस यांची संयुक्त कारवाई सुरूच आहे.

मागील आठवड्यात देशभरातून पीएफआय या संस्थेच्या कार्यकर्त्यांना एनआयए आणि एटीएसच्या संयक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले होते. एटीएसच्या कोठडीतील पीएफआय कार्यकर्त्यांच्या माहितीवरून आता औरंगाबादमधून आणखी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शहर पोलीस, एनआयए, आयबी आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने पहाटे २ ते ६ वाजेच्या दरम्यान केली. तब्बल १४ कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

आयबीचे पथक शहरातताब्यात घेण्यात आलेले १४ संशयितांना सिडको , सिटी चौक, क्रांती चौक पोलीस ठाण्यात चौकशीसाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली येथून आयबीचे ८ जणांचे पथक शहरात दाखल झाले असून संशयितांची चौकशी सुरु आहे. पहाटे झालेल्या संयुक्त कारवाईत तब्बल २०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते अशी माहिती आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAnti Terrorist Squadएटीएस