शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी १४ जण रिंगणात, राखीव ४ जागांसाठी ४ उमेदवार

By योगेश पायघन | Updated: February 26, 2023 19:22 IST

व्यवस्थापन परिषदेत निवडून जाण्यासाठी चुरस, एकुण १८ उमेदवारांचे अर्ज, सर्व अर्ज ठरले वैध

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत ८ जागांसाठी एकूण १८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. रविवारी पार पडलेल्या छाननीत सर्व १८ अर्ज वैध ठरले. राखीव ४ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज असून खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी तब्बल १४ जणांनी अर्ज दाखल केले असून व्यवस्थापन परिषदेत निवडून जाण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.

अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या निवडणुका कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडल्या. आता दुसऱ्या टप्प्यात व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागांसाठी २१ ते २५ फेब्रुवारी या काळात एकूण १८ अर्ज दाखल झाले. सर्व अर्ज वैध ठरल्याने रविवारी छाननी होईल. ६ मार्च रोजी माघार घेण्याची मुदत असून त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी घोषित होईल. त्यानंतर १३ मार्चला अधिसभेच्या बैठकीत मतदान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.

खुल्या प्रवर्गात चुरस

प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक व पदवीधर गटातून प्रत्येकी एक जागा खुल्या गटातील अशा चार जागांसाठी १४ जणांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये प्राचार्य गटातून डॉ. विश्वास कंधारे, डॉ. बाबासाहेब गोरे व डॉ. भारत खंदारे, संस्थाचालकांतून गोविंद देशमुख, डॉ. मेहेर पाथ्रीकर, बस्वराज मंगरुळे, तर पदवीधर प्रवर्गातून गटातून योगिता होके पाटील, प्रा. हरिदास सोमवंशी व प्रा. सुनील मगरे यांचे दाखल झाले आहेत. शिक्षक गटातून खुल्या प्रवर्गातून पाचजण निवडून आले. त्या पाचही जणांनी व्यवस्थापन परिषदेसाठी अर्ज भरला आहे. डॉ. अंकुश कदम, डॉ. मुंजाबा धोंडगे, डॉ. विक्रम खिल्लारे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. भगवानसिंग डोभाळ आदींनी अर्ज वैध ठरले आहे. त्यामुळे खुल्या गटात चुरस आहे.

राखीव जागा बिनविरोधराखीव जागांसाठी चार गटांतून प्रत्येकी एकच उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे. प्राचार्य - एससी प्रवर्ग डॉ. गौतम पाटील, संस्थाचालक-एसटी प्रवर्ग नितीन जाधव, पदवीधर- व्हीजेएनटी प्रवर्ग दत्तात्रय भांगे आणि शिक्षक -ओबीसी प्रवर्ग डॉ. रविकिरण सावंत याप्रमाणे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध निवडल्या जातील. छाननीत सर्व अर्ज वैध ठरल्याने निवडणूकीची केवळ औपचारीकता शिल्लक आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद