नियंत्रण कक्षात १३१ तक्रारीचे झाले निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 00:20 IST2016-04-06T00:20:33+5:302016-04-06T00:20:33+5:30

लातूर : जिल्ह्यात दुष्काळ टंचाई तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून गेल्या आठवड्यात कक्षाकडे प्राप्त झालेल्या १३७ तक्रारींपैकी १३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे़

131 grievances redressed in the control room | नियंत्रण कक्षात १३१ तक्रारीचे झाले निवारण

नियंत्रण कक्षात १३१ तक्रारीचे झाले निवारण

  लातूर : जिल्ह्यात दुष्काळ टंचाई तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून गेल्या आठवड्यात कक्षाकडे प्राप्त झालेल्या १३७ तक्रारींपैकी १३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे़ शहरी भागातील ११९ तर ग्रामीण भागातील १८ तक्रारींचा समावेश आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ त्यामुळे जनतेशी योग्य तो संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे़ जनतेसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, वेळीच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे़ या करीता मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास सहाय्य करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे़ २८ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत ६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचे निवारण करण्यात आले़ २९ मार्च रोजी ४७ पैकी ४५ तक्रारी, ३० मार्च रोजी १३ पैकी १२, ३१ मार्च रोजी २० पैकी १८, १ एप्रिल रोजी १९ पैकी १९, २ एप्रिल रोजी ८ पैकी ७, ३ एप्रिल रोजी २४ पैकी २४ अशा एकूण १३७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ सदर तक्रारीमध्ये शहरी भागातील पाणीपुरवठ्याबाबत ११५ तक्रारी आहेत़ तर ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याबाबत १४, जनावरांच्या चाऱ्याबाबत ४, अधिग्रहणाबाबत २, शेतकऱ्यांच्या २ या प्रमाणात तक्रारी दाखल करून त्याचे निवारण करण्यात आले आहे़

Web Title: 131 grievances redressed in the control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.