शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

छत्रपती संभाजीनगरात कचरा संकलनावर ५३ महिन्यांत १३१ कोटी खर्च, तरीही शहर अस्वच्छ

By मुजीब देवणीकर | Updated: August 3, 2023 20:06 IST

दरमहा अडीच कोटींचे किमान बिल, अधिकारी म्हणतात, काम समाधानकारक

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक नागरिकाच्या घरात जमा होणारा कचरा महापालिकेला उचलावाच लागतो. त्यासाठी प्रशासनाला दरमहा तब्बल अडीच कोटी रुपये खर्च येतो. कचरा संकलनासाठी नेमलेल्या खासगी कंपनीला प्रशासनाने ५३ महिन्यात १३१ कोटी रुपये अदा केल्याची बाब उघडकीस आली. एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहर स्वच्छ, सुंदर झालेले नाही.

२०१७-१८ मध्ये नारेगाव येथे कचरा टाकण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे दोन महिने शहरातील मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे डोंगर साचले होते. अभूतपूर्व असे कचऱ्याचे संकट निर्माण झाले. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासन, महापालिकेने काही मोठे निर्णय घेतले. युद्धपातळीवर चिकलठाणा, पडेगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले. सध्या शहरात दररोज ४०० ते ४५० मे. टन कचरा दररोज जमा होतो. त्यातील ३०० ते ३५० मे. टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया होते. हर्सूल येथील प्रकल्प सुरू झाल्यास मनपाची क्षमता ४५० मे. टनापर्यंत जाईल.

शहरातील कचरा संकलन पूर्वी स्वत: मनपा प्रशासन करीत होते. फेब्रुवारी २०१९ पासून हे काम हैदराबाद येथील रेड्डी कंपनीवर सोपविले. १ क्विंटल कचरा कंपनीने जमा केला तर मनपा कंपनीला १८६३ रुपये अदा करते. दरमहा किमान अडीच ते तीन कोटीपर्यंत कंपनीचे बिल होते. मागील ५३ महिन्यात कंपनीला १३१ कोटी रुपये देण्यात आले. एवढा पैसा खर्च करूनही कंपनीचे काम अजिबात समाधानकारक नाही. अनेक वसाहतींमध्ये वाहन कचरा संकलनासाठी येतच नाही. बाजारपेठेत जे व्यापारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ‘खूश’ करणार नाहीत, त्यांचा कचराच घेतला जात नाही. निव्वळ अडवणूक करण्याचे काम कर्मचारी करतात. यासंदर्भात नागरिक, व्यापाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या.

अधिकारी म्हणतात, काम समाधानकारकरेड्डी कंपनीचे काम समाधानकारक आहे, जिथे चुकत असेल तेथे दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाते. करारात ३०० घंटागाड्या असाव्यात, असे म्हटले. आता घंटागाड्या कमी पडत आहेत. त्यापेक्षा आम्ही घंटागाड्यांची ट्रिप वाढविण्यावर भर देतोय. रेड्डी कंपनीसोबत ९ वर्षांचा करार आहे. त्यातील पहिला टप्पा पुढच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये संपताेय. तेव्हा प्रशासन फेरविचार करू शकते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका