१३ टक्के पाऊस

By Admin | Updated: August 20, 2014 23:54 IST2014-08-20T23:33:08+5:302014-08-20T23:54:56+5:30

परभणी : यावर्षी जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे़

13 percent of the rain | १३ टक्के पाऊस

१३ टक्के पाऊस

परभणी : यावर्षी जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे़ अर्धा पावसाळा सरल्यानंतरही केवळ १३ टक्के पाऊस जिल्ह्यात झाल्याने पिकांबरोबरच पाण्याचा प्रश्न तीव्र बनत चालला आहे़
जिल्ह्यात सरासरी ७५० मिमी पाऊस होतो़ आतापर्यंतचा इतिहास पाहता पावसाळ्यात जरी ताण पडला तरी संपूर्ण वर्षभरात सरासरी गाठली जाते़ त्यामुळे पाण्याचा तसा प्रश्न उद्भवत नाही़ परंतु, यावर्षी मात्र आतापर्यंतच्या पावसाळ्यांशी तुलना करता खूपच कमी पाऊस झालेला आहे़ केवळ १३ टक्के पाऊस झाल्याने पिके तर माना टाकू लागली आहेत़ जमिनीची पाणी पातळी देखील खोल जात असल्याने दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे़
प्रकल्प आणि धरणांमधील पाणी पातळी देखील तळ गाठू लागली आहे़ पावसाळ्यातील पाण्याचा संचय झाल्यानंतर उन्हाळ्यात हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते़ परंतु, पावसाळ्यातच धरण आणि प्रकल्पांनी तळ गाठल्यामुळे आगामी काळातील प्रश्न अधिकच गंभीर दिसू लागला आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत १३५़९३ मिमी पाऊस झाला़ सेलू तालुक्यात सर्वाधिक १५५़८ मिमी तर पालम तालुक्यात सर्वात कमी १०५ मिमी पाऊस झाला़
मागच्या वर्षी हीच परिस्थिती उलटी होती़ जिल्ह्यात ६१०़६३ मिमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत ९० टक्के पाऊस झाला होता़ परंतु, यावर्षी मात्र केवळ १३ टक्केच पाऊस झाल्याने आगामी काळातील संकट डोळ्यासमोर दिसू लागले आहे़ आठवडाभरापासून वातावरणात बदल झाला आहे़
पाऊस जरी होत नसला तरी ढगाळ वातावरण निर्माण होते़ परिणामी उकाडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ त्यामुळे उन्हाळ्यापेक्षाही बिकट स्थितीतून जिल्हावासिय जात आहेत़ (प्रतिनिधी)
वेधशाळेचा आशादायक अंदाज
पुणे येथील भारतीय वेधशाळेने आगामी चार दिवसांत मराठवाड्यामध्ये पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे़ त्यामुळे हा अंदाज आशादायक वाटू लागला आहे़ वेधशाळेच्या या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात ६१ मिमी, लातूर १०० मिमी, नांदेड ८१ मिमी, औरंगाबाद ३२ मिमी, हिंगोली ५८ मिमी, बीड ६७ मिमी आणि जालना जिल्ह्यामध्ये ३८ मिमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे़ या अंदाजानुसार पावसाचे पुनरागमन व्हावे, अशीच प्रार्थना जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत़
टंचाईग्रस्त गावे वाढली
पावसाळ्यामध्येच पाण्याची टंचाई निर्माण होत आहे़ मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही ही समस्या जाणवू लागली आहे़ दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत चालली असल्याने या संदर्भात प्रशासनाला तातडीने उपाययोजना करावी लागणार आहे़

Web Title: 13 percent of the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.