विभागातील चार जिल्ह्यांत स्वाईन फ्लूने १३ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: March 3, 2015 00:28 IST2015-03-03T00:17:45+5:302015-03-03T00:28:49+5:30

औरंगाबाद : स्वाईन फ्लूने मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य उपसंचालक यांना रोज घाटीत जाऊन वॉर्डाला भेट देण्याचे आदेश दिले

13 people killed in swine flu in four districts | विभागातील चार जिल्ह्यांत स्वाईन फ्लूने १३ जणांचा मृत्यू

विभागातील चार जिल्ह्यांत स्वाईन फ्लूने १३ जणांचा मृत्यू


औरंगाबाद : स्वाईन फ्लूने मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य उपसंचालक यांना रोज घाटीत जाऊन वॉर्डाला भेट देण्याचे आदेश दिले
आहे.
दरम्यान, विभागातील चार जिल्ह्यांत दोन महिन्यात २५ रुग्णांचा स्वाईन फ्लूने बळी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, स्वाईन फ्लूच्या साथीने आता भयंकर रूप धारण केले आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात आतापर्यंत २५ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली. त्यापैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला.
जालना जिल्ह्यातील ४ रुग्णांना स्वाईन फ्लू झाला होता. पैकी एकाला प्राणास गमवावे लागले. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ११ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली, तर बीड, जळगाव येथील चार रुग्णांचा उपचार सुरू असताना घाटीत मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. रविकिरण चव्हाण यांनी सांगितले.
स्वाईन फ्लू रुग्णांसाठी प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. तसेच टॅमी फ्लूच्या गोळ्या. एन-९५ मास्कचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आला
आहे.

Web Title: 13 people killed in swine flu in four districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.