शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

औरंगाबाद जिल्ह्यात १२० टक्के पाऊस; १ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांवर अतिवृष्टीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 12:26 IST

Rain In Aurangabad : यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसाडेसात हजार हेक्टरवरील पंचनामे २२ हजार ४६ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पथक

- विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ५३ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांवर अतिवृष्टीने ( Heavy Rainfall in Aurangabad ) घाला घातला. ७ हजार ५७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून २२ हजार ४६ शेतकऱ्यांपर्यंत महसूलचे पथक पोहोचले आहे. २ लाख ८७ हजार ४८६ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान केले आहे. यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक किती ठिकाणी नुकसान झाले, याच्या अंतिम अहवालावरच नुकसान भरपाई निश्चित होणार आहे.

सलग तिसऱ्या वर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यातील पिकांचे नुकसान होत असून मागील दोन वर्षांत ६०० कोटींच्या आसपास नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर चार महिन्यांनी उशिरा ती मदत शेतकऱ्यांचा खात्यावर आली होती. यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे. अप्पर तहसील अंतर्गत २२ टक्के, औरंगाबाद तालुक्यात ६ टक्के, पैठण ३, वैजापूर ६, कन्नड ४, खुलताबाद ९, सिल्लोड २२ तर सोयगावमध्ये १६ टक्के पंचनामे झाले आहेत.

जिल्ह्यात १२० टक्के पाऊसजिल्ह्यात आजवर १२० टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात ९९ टक्के, पैठण १३८, गंगापूर ११२, वैजापूर १३४, कन्नड १४३, खुलताबाद ११८, सिल्लोड १४३, सोयगाव ११९ तर फुलंब्रीत ९८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पैठण, कन्नड, वैजापूर खुलताबाद भागात जास्त पाऊस झाला आहे.

नुकसानग्रस्त तालुक्यांचा आकडा असातालुका शेतकरी बाधित क्षेत्रअप्पर तहसील औरंगाबाद ४४२६- ३१०४ हेक्टरऔरंगाबाद ९८५१ - ६८९६ हेक्टरपैठण  ७५४३२ - ३२०२० हेक्टरफुलंब्री ०००० - ००००० हेक्टरवैजापूर ३६८७३ - १६०९९ हेक्टरगंगापूर ०००० - ००००० हेक्टरकन्नड ८१६०२ - ७८३११ हेक्टरखुल्ताबाद ३१६७२ - ११३४० हेक्टरसिल्लोड ४५७८५ - १३६४८ हेक्टरसोयगाव १८४५ - ६२३.५ हेक्टरएकूण २८७४८६ - १६२०५३ हेक्टर

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद