शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

औरंगाबाद जिल्ह्यात १२० टक्के पाऊस; १ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांवर अतिवृष्टीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 12:26 IST

Rain In Aurangabad : यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसाडेसात हजार हेक्टरवरील पंचनामे २२ हजार ४६ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पथक

- विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ५३ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांवर अतिवृष्टीने ( Heavy Rainfall in Aurangabad ) घाला घातला. ७ हजार ५७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून २२ हजार ४६ शेतकऱ्यांपर्यंत महसूलचे पथक पोहोचले आहे. २ लाख ८७ हजार ४८६ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान केले आहे. यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक किती ठिकाणी नुकसान झाले, याच्या अंतिम अहवालावरच नुकसान भरपाई निश्चित होणार आहे.

सलग तिसऱ्या वर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यातील पिकांचे नुकसान होत असून मागील दोन वर्षांत ६०० कोटींच्या आसपास नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर चार महिन्यांनी उशिरा ती मदत शेतकऱ्यांचा खात्यावर आली होती. यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे. अप्पर तहसील अंतर्गत २२ टक्के, औरंगाबाद तालुक्यात ६ टक्के, पैठण ३, वैजापूर ६, कन्नड ४, खुलताबाद ९, सिल्लोड २२ तर सोयगावमध्ये १६ टक्के पंचनामे झाले आहेत.

जिल्ह्यात १२० टक्के पाऊसजिल्ह्यात आजवर १२० टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात ९९ टक्के, पैठण १३८, गंगापूर ११२, वैजापूर १३४, कन्नड १४३, खुलताबाद ११८, सिल्लोड १४३, सोयगाव ११९ तर फुलंब्रीत ९८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पैठण, कन्नड, वैजापूर खुलताबाद भागात जास्त पाऊस झाला आहे.

नुकसानग्रस्त तालुक्यांचा आकडा असातालुका शेतकरी बाधित क्षेत्रअप्पर तहसील औरंगाबाद ४४२६- ३१०४ हेक्टरऔरंगाबाद ९८५१ - ६८९६ हेक्टरपैठण  ७५४३२ - ३२०२० हेक्टरफुलंब्री ०००० - ००००० हेक्टरवैजापूर ३६८७३ - १६०९९ हेक्टरगंगापूर ०००० - ००००० हेक्टरकन्नड ८१६०२ - ७८३११ हेक्टरखुल्ताबाद ३१६७२ - ११३४० हेक्टरसिल्लोड ४५७८५ - १३६४८ हेक्टरसोयगाव १८४५ - ६२३.५ हेक्टरएकूण २८७४८६ - १६२०५३ हेक्टर

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद