शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
8
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
9
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
10
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
11
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
12
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
13
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
14
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
15
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
16
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
17
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
18
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
19
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
20
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

औरंगाबाद जिल्ह्यात १२० टक्के पाऊस; १ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांवर अतिवृष्टीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 12:26 IST

Rain In Aurangabad : यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसाडेसात हजार हेक्टरवरील पंचनामे २२ हजार ४६ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पथक

- विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ५३ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांवर अतिवृष्टीने ( Heavy Rainfall in Aurangabad ) घाला घातला. ७ हजार ५७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून २२ हजार ४६ शेतकऱ्यांपर्यंत महसूलचे पथक पोहोचले आहे. २ लाख ८७ हजार ४८६ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान केले आहे. यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक किती ठिकाणी नुकसान झाले, याच्या अंतिम अहवालावरच नुकसान भरपाई निश्चित होणार आहे.

सलग तिसऱ्या वर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यातील पिकांचे नुकसान होत असून मागील दोन वर्षांत ६०० कोटींच्या आसपास नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर चार महिन्यांनी उशिरा ती मदत शेतकऱ्यांचा खात्यावर आली होती. यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे. अप्पर तहसील अंतर्गत २२ टक्के, औरंगाबाद तालुक्यात ६ टक्के, पैठण ३, वैजापूर ६, कन्नड ४, खुलताबाद ९, सिल्लोड २२ तर सोयगावमध्ये १६ टक्के पंचनामे झाले आहेत.

जिल्ह्यात १२० टक्के पाऊसजिल्ह्यात आजवर १२० टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात ९९ टक्के, पैठण १३८, गंगापूर ११२, वैजापूर १३४, कन्नड १४३, खुलताबाद ११८, सिल्लोड १४३, सोयगाव ११९ तर फुलंब्रीत ९८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पैठण, कन्नड, वैजापूर खुलताबाद भागात जास्त पाऊस झाला आहे.

नुकसानग्रस्त तालुक्यांचा आकडा असातालुका शेतकरी बाधित क्षेत्रअप्पर तहसील औरंगाबाद ४४२६- ३१०४ हेक्टरऔरंगाबाद ९८५१ - ६८९६ हेक्टरपैठण  ७५४३२ - ३२०२० हेक्टरफुलंब्री ०००० - ००००० हेक्टरवैजापूर ३६८७३ - १६०९९ हेक्टरगंगापूर ०००० - ००००० हेक्टरकन्नड ८१६०२ - ७८३११ हेक्टरखुल्ताबाद ३१६७२ - ११३४० हेक्टरसिल्लोड ४५७८५ - १३६४८ हेक्टरसोयगाव १८४५ - ६२३.५ हेक्टरएकूण २८७४८६ - १६२०५३ हेक्टर

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद