शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

पुढील धोका टाळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दोन्ही हंगामापूर्वी एकरी १० हजार द्यावेत

By विकास राऊत | Updated: May 16, 2023 19:39 IST

कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमते अभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असून त्यावर उपाययोजनांसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटूंबांचा सर्व्हे करण्यास सुरूवात केली आहे. आजवर सुमारे ५ लाख कुटूंबांंचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. 

कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमते अभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. सर्व्हे पुर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षासह शासनाकडे शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात एकरी दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हा सर्व्हे १२ टप्प्यात होत आहे. थेट शेतकऱ्याशी संवाद साधला जात असून, यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबतही संवाद साधण्यात येत आहे. मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जि.प.सीईओंचे पथक स्वतः शेतकऱ्याच्या घरी जाऊन सर्व्हे करीत असून सर्व्हेचा फॉर्म भरण्यासाठी अर्धा तास लागतो आहे. जून अखेरपर्यंत सर्व्हे पुर्ण होईल.

सर्व्हेमधून काय समोर येत आहे.....शेतकऱ्यांची मानसिक कशी आहे, यावरून शेतकरी आत्महत्या करू शकतो का, याचा अंदाज येत आहे. सोमवारी चार कुटुंबाना कार्यालयात बोलून त्याची माहिती घेतली, त्यांची खूप वाईट परिस्थिती आहे. मुली लग्नाला आल्या आहेत, आर्थिक परिस्थिती वाईट आहे, सावकारी कर्ज आहे, बँक कर्ज आहे. आत्महत्या करण्याच्या मार्गावर शेतकरी जात आहे, याची माहिती काढायची आहे. त्यामुळे सर्व्हे सुरू आहे. ज्या शेतकऱ्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आहे, त्यांना बोलावून समुपदेशन करण्यात येत आहे. सर्व्हेचा ऑनलाइन डेटा जमा केला जात आहे, असे केंद्रेेकर यांनी सांगितले.

तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांना रोख पैसे मिळावेतशेतकरी आत्महत्याचे मुख्य कारण आर्थिक परिस्थितीच आहे. शेती पिकत नाही, पिकल्यावर भाव मिळत नाही, शेती कामासाठी पैसे लागतात, शेतकऱ्यांना उधार मिळणाऱ्या खतावर दुकानदार व्याज लावत असल्याचा धक्कादायक प्रकार सर्व्हेतून समोर आला आहे. मुलांचे लग्न होत नसल्याने नैराश्य येत आहे. आयुष्य अंधारमय असल्याचे शेतकर्यांना वाटत आहे. त्यामुळे ठोक मदत देण्यात यावी याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठांना सुचविणार आहे. दोन हंगामात एकरी २० हजार रोख रक्कम दिली तर शेतकरी आत्महत्या थांबू शकते वाटते. तेलंगणा प्रमाणे शेतकऱ्यांना नगद पैसे मिळाल्यास शेतकरी आत्महत्या रोखता येतील. असे केंद्रेकर यांनी सांगितले.

कसा सुरू आहे सर्व्हेप्रश्नांचे एकूण बारा विभाग असून यात १०४ प्रश्नांची माहिती भरून घेण्यात येत आहे. आत्महत्या करण्याच्या विचार येणाऱ्या शेतकऱ्यांची वेगळी यादी होत आहे. शेतकऱ्यांची प्राथमिक, कौटुंबिक माहिती, आर्थिक अडचण, कर्जामुळे कौटुंबिक कलह, व्यसन, बेरोजगारांची संख्या, घरगुती सुविधा, वीज, गॅस, नळ शौचालय आहे काय. तसेच कुटुंबातील कोणी ग्रामपंचायत, सोसायटी, स्वराज्य संस्था, बचतगट सदस्य आहे का, राष्ट्रीय बँकेचे, सहकारी बँक, सावकारी कर्ज आहे का आदी प्रश्नांची माहिती सर्व्हेतून घेण्यात येत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद