शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

औरंगाबाद जिल्ह्यात १० लाख विद्यार्थ्यांच्या गोवर - रुबेला लसीकरणाचा कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 13:21 IST

गोरव, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत असलेले गैरसमज आणि अफवा थांबविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने पथके तैनात केली आहेत.

ठळक मुद्देशहरासह खेड्यांमध्ये गोवर, रुबेलाच्या जनजागृतीसाठी पथके तैनात२०२० पर्यंत देशातून गोवर निर्मूलनाचे ठेवले उद्दिष्ट

औरंगाबाद : २०२० पर्यंत देशातून गोवरचे निर्मूलन करण्यासाठी सुरू केलेल्या गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत असलेले गैरसमज आणि अफवा थांबविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने पथके तैनात केली आहेत. ज्या गावांमध्ये या लसीकरणाविषयी शंका उपस्थित केली जात आहे, त्याठिकाणी पथके जाऊन जनजागृती करीत आहेत. यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर आणि जि. प. शिक्षण विभागाच्या नोडल अधिकरी अश्विनी लाठकर यांनी दिली.

शहर आणि जिल्ह्यातील नोंदणीकृत शाळांमध्ये ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालक, विद्यार्थ्यांना गोवर, रुबेलाचे लसीकरण करण्यात येत आहे. यात जि. प. अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील ३०३० आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील २७३ शाळांमध्ये एकूण ५ लाख ७२ हजार ४४० विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे. या मोहिमेला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ३० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणात पथके तैनात केली आहेत. ज्या गावांमध्ये काही पालकांमध्ये गैरसमज आहेत, त्यांचे गैरसमज तात्काळ दूर केले जात असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.

याशिवाय जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारीही मोहिमेत काम करीत असल्यामुळे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे आव्हानही शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले असल्याचे लाठकर यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद शहरातील ११४० शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात ३ लाख १२ हजार ४३९ विद्यार्थी आणि पूर्व प्राथमिकच्या बालकांसह ४ लाख ८१ हजार ६१६ जणांना ही लस देण्यात येत आहे. पहिल्या तीन दिवसांत २८ हजार विद्यार्थी, बालकांना ही लस देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. ग्रामीण आणि शहरी, अशा एकूण १० लाख ५४ हजार ५६ विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे.

पालकांच्या शंका दूर होताहेतगोवर, रुबेला लसीकरणाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विविध संदेशांमुळे पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यास शासकीय यंत्रणांना यश मिळत आहे. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, २०२० मध्ये देश गोवरमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी २१ राज्यांमध्ये ही मोहीम राबविली असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी