शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात १० लाख विद्यार्थ्यांच्या गोवर - रुबेला लसीकरणाचा कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 13:21 IST

गोरव, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत असलेले गैरसमज आणि अफवा थांबविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने पथके तैनात केली आहेत.

ठळक मुद्देशहरासह खेड्यांमध्ये गोवर, रुबेलाच्या जनजागृतीसाठी पथके तैनात२०२० पर्यंत देशातून गोवर निर्मूलनाचे ठेवले उद्दिष्ट

औरंगाबाद : २०२० पर्यंत देशातून गोवरचे निर्मूलन करण्यासाठी सुरू केलेल्या गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत असलेले गैरसमज आणि अफवा थांबविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने पथके तैनात केली आहेत. ज्या गावांमध्ये या लसीकरणाविषयी शंका उपस्थित केली जात आहे, त्याठिकाणी पथके जाऊन जनजागृती करीत आहेत. यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर आणि जि. प. शिक्षण विभागाच्या नोडल अधिकरी अश्विनी लाठकर यांनी दिली.

शहर आणि जिल्ह्यातील नोंदणीकृत शाळांमध्ये ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालक, विद्यार्थ्यांना गोवर, रुबेलाचे लसीकरण करण्यात येत आहे. यात जि. प. अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील ३०३० आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील २७३ शाळांमध्ये एकूण ५ लाख ७२ हजार ४४० विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे. या मोहिमेला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ३० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणात पथके तैनात केली आहेत. ज्या गावांमध्ये काही पालकांमध्ये गैरसमज आहेत, त्यांचे गैरसमज तात्काळ दूर केले जात असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.

याशिवाय जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारीही मोहिमेत काम करीत असल्यामुळे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे आव्हानही शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले असल्याचे लाठकर यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद शहरातील ११४० शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात ३ लाख १२ हजार ४३९ विद्यार्थी आणि पूर्व प्राथमिकच्या बालकांसह ४ लाख ८१ हजार ६१६ जणांना ही लस देण्यात येत आहे. पहिल्या तीन दिवसांत २८ हजार विद्यार्थी, बालकांना ही लस देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. ग्रामीण आणि शहरी, अशा एकूण १० लाख ५४ हजार ५६ विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे.

पालकांच्या शंका दूर होताहेतगोवर, रुबेला लसीकरणाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विविध संदेशांमुळे पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यास शासकीय यंत्रणांना यश मिळत आहे. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, २०२० मध्ये देश गोवरमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी २१ राज्यांमध्ये ही मोहीम राबविली असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी