शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबाद जिल्ह्यात १० लाख विद्यार्थ्यांच्या गोवर - रुबेला लसीकरणाचा कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 13:21 IST

गोरव, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत असलेले गैरसमज आणि अफवा थांबविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने पथके तैनात केली आहेत.

ठळक मुद्देशहरासह खेड्यांमध्ये गोवर, रुबेलाच्या जनजागृतीसाठी पथके तैनात२०२० पर्यंत देशातून गोवर निर्मूलनाचे ठेवले उद्दिष्ट

औरंगाबाद : २०२० पर्यंत देशातून गोवरचे निर्मूलन करण्यासाठी सुरू केलेल्या गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत असलेले गैरसमज आणि अफवा थांबविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने पथके तैनात केली आहेत. ज्या गावांमध्ये या लसीकरणाविषयी शंका उपस्थित केली जात आहे, त्याठिकाणी पथके जाऊन जनजागृती करीत आहेत. यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर आणि जि. प. शिक्षण विभागाच्या नोडल अधिकरी अश्विनी लाठकर यांनी दिली.

शहर आणि जिल्ह्यातील नोंदणीकृत शाळांमध्ये ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालक, विद्यार्थ्यांना गोवर, रुबेलाचे लसीकरण करण्यात येत आहे. यात जि. प. अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील ३०३० आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील २७३ शाळांमध्ये एकूण ५ लाख ७२ हजार ४४० विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे. या मोहिमेला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ३० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणात पथके तैनात केली आहेत. ज्या गावांमध्ये काही पालकांमध्ये गैरसमज आहेत, त्यांचे गैरसमज तात्काळ दूर केले जात असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.

याशिवाय जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारीही मोहिमेत काम करीत असल्यामुळे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे आव्हानही शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले असल्याचे लाठकर यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद शहरातील ११४० शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात ३ लाख १२ हजार ४३९ विद्यार्थी आणि पूर्व प्राथमिकच्या बालकांसह ४ लाख ८१ हजार ६१६ जणांना ही लस देण्यात येत आहे. पहिल्या तीन दिवसांत २८ हजार विद्यार्थी, बालकांना ही लस देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. ग्रामीण आणि शहरी, अशा एकूण १० लाख ५४ हजार ५६ विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे.

पालकांच्या शंका दूर होताहेतगोवर, रुबेला लसीकरणाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विविध संदेशांमुळे पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यास शासकीय यंत्रणांना यश मिळत आहे. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, २०२० मध्ये देश गोवरमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी २१ राज्यांमध्ये ही मोहीम राबविली असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी