शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगर-कोपरगाव महामार्गावर दोन महिन्यांत १० मृत्यू; उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:36 IST

अहिल्यानगर-कोपरगाव राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; कंत्राटदारासह प्रतिवाद्यांना नोटीस

छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर ते कोपरगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० च्या दुरवस्थेमुळे अवघ्या २ महिन्यांत २१ अपघात होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेन एस. वेणेगावकर यांनी गंभीर दखल घेतली. महामार्गाच्या देखभालीच्या कंत्राटदारासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. त्यांना ५ जानेवारी २०२६ पर्यंत उत्तर दाखल करावयाचे आहे.

याचिकाकर्त्याने उपस्थित केलेला ‘महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न जनहिताचा’ आहे. वस्तुत: चांगले रस्ते उपलब्ध करून देणे, हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. त्यानंतरच शासनास ‘टोल’ वसुलीचे अधिकार प्राप्त होतात, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. या जनहित याचिकेवर ९ जानेवारी २०२६ला पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे याचिका?दादासाहेब पवार यांनी ॲड. शिवराज कडू-पाटील यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटल्यानुसार अहिल्यानगर ते कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गावर ३ दशकांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. अब्जावधी रुपये खर्च करूनही या महामार्गाची दुरवस्थाच आहे. पावसामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे राहुरी परिसरात मागील ४ महिन्यांत ३० ते ४० निरपराध नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. याचिकाकर्त्याने संबंधित विभागांना व कंत्राटदाराला वेळोवेळी निवेदने दिली. मुख्यत: धोकादायक वळणे आणि अपघात प्रवण क्षेत्रात धोक्याच्या सूचनांचे फलक लावावेत आदी विनंत्या केल्या. मात्र, त्याची दखल घेतली नाही. म्हणून त्यांनी जनहित याचिका दाखल केली.

‘यांना’ सदोष मनुष्यवधासाठी जबाबदार धराया महामार्गावरील अपघातांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधी यांना ‘सदोष मनुष्यवधासाठी जबाबदार धरा’. अवजड वाहतूक अहिल्यानगर व कोपरगावच्या बाहेर पर्यायी मार्गाने वळवावी, आदी विनंती याचिकेत करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गातर्फे ॲड. सुहास उरगुंडे व शासनातर्फे ॲड. निखिल टेकाळे काम पाहत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : High Court Concerned Over Deaths on Ahilyanagar-Kopargaon Highway

Web Summary : Bombay High Court addresses fatal accidents on Ahilyanagar-Kopargaon highway due to poor condition. Notices issued to contractors, seeking response by January 2026. Court emphasizes state's duty for good roads before toll collection.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघातAhilyanagarअहिल्यानगरAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ