शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकरी राहणार पीककर्जापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 20:05 IST

दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना नाममात्र व्याजदराने पीककर्ज वाटप विविध बँकांमार्फत होते.

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली तरी जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या पीककर्जाचे १ हजार ७०६ कोटी ९५ लाख रुपये थकविले आहेत. जुन्याची परतफेड न करणाऱ्यांना यंदा पीककर्ज मिळणार नाही. या शेतकऱ्यांनी त्वरित जुन्या कर्जाचा भरणा करून नवीन कर्ज घ्यावे, असे आवाहन शिखर बँकेने केले आहे.

दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना नाममात्र व्याजदराने पीककर्ज वाटप विविध बँकांमार्फत होते. गतवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ लाख २० हजार ५९१ खातेदारांना ३ हजार ६१२ कोटी ९२ लाख रु. कर्ज वाटप केले होते. गत खरीप हंगामात घेतलेल्या कर्जाची परतफेड यावर्षीच्या ३१ मार्चपूर्वी करणाऱ्या शेतकऱ्यांना अवघ्या तीन रुपये प्रतिशेकडा याप्रमाणे व्याजाची आकारणी होते. मात्र, जिल्ह्यातील एकूण कर्जदार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली नव्हती. जे शेतकरी मागील पीककर्जाची परतफेड करतील, तेच शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरतात, असा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे. पीककर्ज थकविणाऱ्यांना नवीन कर्ज न देण्याचे कडक निर्देश बँकांना आहेत. जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांनी १ हजार ७०६ कोटी ९५ लाख रुपयांचे पीककर्ज थकविल्याची माहिती जिल्हा शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गतवर्षीच्या एकूण कर्जदारांच्या ४५ टक्के शेतकऱ्यांनी ४७ टक्के कर्ज थकविल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ६४ टक्के कर्ज थकलेमहाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून गतवर्षी ५४ हजार ८२१ शेतकऱ्यांना ५८७ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले हाेते. महाराष्ट्र बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी तब्बल ३७३ कोटी ५७ लाख रु. थकविले आहेत.

बँकांची नावे-----एकूण थकबाकीदार खातेदार----- रक्कमजिल्हा सहकारी बँक- ६४,५८७-------३३७ कोटी २० लाखप्रायव्हेट सेक्टर बँक- २,६६२--------------६४ कोटी ३० लाखमहाराष्ट्र ग्रामीण बँक-- ३३,५५२--- ३७३ कोटी ५७ लाखअन्य राष्ट्रीयीकृत बँका-- ८७ हजार १११--- ९३१ कोटी ८८ लाख

पीककर्जाची परतफेड करावीपीककर्ज वाटप करताना शेतकऱ्यांचा ‘सिबील’ तपासू नये. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला, त्यांना सात दिवसांत कर्ज देण्याचे निर्देश बँकांना आहेत. शेतकऱ्यांनी मागील पीककर्जाची परतफेड करावी, जेणेकरून नवीन कर्ज मंजूर करणे बँकांना सहज शक्य होईल.- मोघे, व्यवस्थापक, जिल्हा शिखर बँक

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर