शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

विरूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:43 IST

तेलंगणा सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील १५ वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडला होता. दरम्यान पाठपुरावा केल्याने बांधकाम सुरू झाले. मात्र, निधीअभावी सध्या बांधकाम ठप्प पडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनिधीअभावी कंत्राटदाराने केले बांधकाम बंद : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरून (स्टे) : तेलंगणा सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील १५ वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडला होता. दरम्यान पाठपुरावा केल्याने बांधकाम सुरू झाले. मात्र, निधीअभावी सध्या बांधकाम ठप्प पडल्याचे दिसून येत आहे.विरूर परिसरातील हजारो नागरिकांना कोसोदूर जावून आरोग्य तपासणी करावी लागत होती. त्यामुळे विरूर (स्टे) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता होती. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी व्हावे, यासाठी परिसरातील नागरिकांनी शासनाकडे अनेकदा निवेदन पाठविले. लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्याने विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला. दीड वर्षापूर्वी बांधकाम सुरू झाले. पण, सहा महिन्यांपासून निधीअभावी बांधकाम रखडले आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आली.विरूर येथे पोलीस ठाणे आहे. या विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता भासते. आरोपींना आरोग्य केंद्रात वैद्यकीय परीक्षणासाठी आणावे लागते. मात्र, सुविधा नसल्याने विरूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागते.हा परिसर नक्षलग्रस्त असल्याने पोलीस कर्मचाºयांवर मानसिक तणाव असतो. १९९४ मध्ये विरूर पोलीस ठाणे आणि जवळच असलेल्या माकडी रेल्वे स्थानकावर नक्षल्यांनी हल्ला केला होता. या परिसरात आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांची संख्या बरीच आहे. खासगी डॉक्टरांकडे उपचार करणे परवडत नाही. सर्व उपचार शासकीय आरोग्य केंद्रावरच अवलंबून असतो. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला दीड वर्षापूर्वीच सुरुवात झाली. काही महिने वेगाने बांधकाम सुरू होते. सध्या आरोग्य केंद्राचे केवळ अर्धे बांधकाम शिल्लक आहे. आतापर्यंत पूर्ण केलेल्या बांधकामाचे मोजमाप करून निधी द्यावा, अशी मागणी कंत्राटदाराने केली होती. मात्र संबंधित विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने बांधकाम बंद ठेवले आहे. निधीच्या कमतरतेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम होणार की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. लोकप्रतिनिधींनी विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी उर्वरित निधी मंजूर करण्यास शासनाने पाठपुरावा करावा, अशी अशी मागणी केली जात आहे.परिसरातील ३५ गावांमध्ये नाराजीविरूर परिसरातील अनेक गावांत प्रामुख्याने शेती करणाºया कुटुंबांची संख्या सर्वाधिक आहे. विरूर (स्टे.) हे गाव परिसरात सर्वात मोठे असून येथे आठवडी बाजार भरतो. वन कार्यालय, रेल्वे स्थानक, विद्यालय, महाविद्यालय, पोलीस ठाणे आहे. या गावाशी सुमारे ३५ ते ४० गावांचा संपर्क येतो. परंतु विरूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील शेकडो गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. शासनाने आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी केली जात आहे.निधीअभावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद आहे. बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधीची गरज आहे. इमारतीचे ५० टक्के काम पूर्ण झाले. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यास बांधकामाला सुरूवात करू.- जी. पटेल,कंत्राटदार, चंद्रपूर