शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चालीं-निलींत पाण्यासाठी महिलांची तप्त उन्हात कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:34 IST

कसे होणार? : वर्षभरापासून नळ योजना बंद, बोअरवेलही आटल्या

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरात पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने गावातील विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. चार्ली-निर्ली येथील नळ योजना मागील वर्षभरापासून बंद असल्याने येथील महिलांना रखरखत्या उन्हात बोअरवेलचा दंडा मारून-मारून घोटभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

राजुरा तालुक्यात वेकोलीच्या उत्खननामुळे पाण्याची पातळी अत्यंत खोल गेलेली आहे. परिसरातील नाले उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडले असून गावातील विहिरी व बोअरवेलसुद्धा कोरड्या पडल्या आहेत. शासनाच्या गलथान कारभारामुळे नळ योजनाही बंद पडल्या आहेत. चार्ली -निली येथील नळ योजना पाण्याच्या स्रोताअभावी मागील वर्षभरापासून बंद पडली आहे. या नळ योजनेकरिता पूर्वी वर्धा नदीवरून पाणी आणले जात होते. परंतु, नदी लांब असल्याने अनेकदा पाइपलाइन लीक होऊन नळ योजना बंद राहत होती. म्हणून गावाजवळील नाल्यावर पाण्याचे स्रोत तयार करण्यात आले. परंतु, तेही आटले. त्यानंतर वेकोलीच्या सहकार्याने नळ योजनेकरिता पोवनी येथून पाणी आणण्यात आले. परंतु, महामार्गाच्या कामात पाइपलाइन फुटल्यामुळे नळ योजना वर्षभरापासून बंद पडली आहे.

सध्या नळ योजनेसाठी जल जीवन योजनेतून कढोली शिवारात नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यात आले. परंतु, कंत्राटदाराच्या व प्रशासनाच्या  गलथान कारभारामुळे पाणीटंचाई असतानाही व मे महिना सुरू होऊनही नळ योजना सुरू झालेली नाही. गावातील विहिरी पूर्णतः आटल्या आहेत.

आठपैकी चार बोअरवेल बंदगावात आठ बोअरवेल असून त्यातील चार बंद आहेत, तर केवळ चार बोअरवेलला थोडे थोडे पाणी येते. महिलांना तासनतास रखरखत्या उन्हात बोअरवेलचा दांडा मारून-मारून घोटभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्याकरिता गावातील जवळपास ६० टक्के लोकांनी घरी बोअरवेल मारल्या. परंतु, त्यातील अनेक बोअरवेल कोरड्या पडल्या असून काहींना थोडे-थोडे पाणी येत आहे. अशी परीस्थिती असतानाही प्रशासनाचे याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष आहे.

बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाहीचार्ली गावातील दिनकर आवारी यांनी पाणीटंचाई पाहता घरी २००-२५० फूट खोलीच्या दोन ठिकाणी बोअरवेल खोदल्या. परंतु, दोन्ही बोअरवेलला घोटभरही पाणी लागले नाही. त्यात त्यांचा ५० हजारांचा खर्च वाया गेला. यावरून वेकोली परिसरात पाण्याची पातळी किती खोल गेली आहे हे दिसून येते.

पाण्याच्या स्रोताअभावी नळ योजना कुचकामी ठरली. वेकोलीच्या सहकार्याने सुरू असलेली पाइपलाइन महामार्गाच्या कामात तुटली. ती दुरुस्त करण्याच्या सूचना वेळोवळी वेकोलिला दिल्या. सध्या कढोली शिवारात तयार करण्यात आलेल्या स्रोतावरून नळयोजना सुरू करण्याचे काम सुरू आहे. लवकरच नळ योजना सुरू होईल.-विजय निवलकर, सरपंच, चार्ली.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकWaterपाणी