शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चालीं-निलींत पाण्यासाठी महिलांची तप्त उन्हात कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:34 IST

कसे होणार? : वर्षभरापासून नळ योजना बंद, बोअरवेलही आटल्या

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरात पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने गावातील विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. चार्ली-निर्ली येथील नळ योजना मागील वर्षभरापासून बंद असल्याने येथील महिलांना रखरखत्या उन्हात बोअरवेलचा दंडा मारून-मारून घोटभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

राजुरा तालुक्यात वेकोलीच्या उत्खननामुळे पाण्याची पातळी अत्यंत खोल गेलेली आहे. परिसरातील नाले उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडले असून गावातील विहिरी व बोअरवेलसुद्धा कोरड्या पडल्या आहेत. शासनाच्या गलथान कारभारामुळे नळ योजनाही बंद पडल्या आहेत. चार्ली -निली येथील नळ योजना पाण्याच्या स्रोताअभावी मागील वर्षभरापासून बंद पडली आहे. या नळ योजनेकरिता पूर्वी वर्धा नदीवरून पाणी आणले जात होते. परंतु, नदी लांब असल्याने अनेकदा पाइपलाइन लीक होऊन नळ योजना बंद राहत होती. म्हणून गावाजवळील नाल्यावर पाण्याचे स्रोत तयार करण्यात आले. परंतु, तेही आटले. त्यानंतर वेकोलीच्या सहकार्याने नळ योजनेकरिता पोवनी येथून पाणी आणण्यात आले. परंतु, महामार्गाच्या कामात पाइपलाइन फुटल्यामुळे नळ योजना वर्षभरापासून बंद पडली आहे.

सध्या नळ योजनेसाठी जल जीवन योजनेतून कढोली शिवारात नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यात आले. परंतु, कंत्राटदाराच्या व प्रशासनाच्या  गलथान कारभारामुळे पाणीटंचाई असतानाही व मे महिना सुरू होऊनही नळ योजना सुरू झालेली नाही. गावातील विहिरी पूर्णतः आटल्या आहेत.

आठपैकी चार बोअरवेल बंदगावात आठ बोअरवेल असून त्यातील चार बंद आहेत, तर केवळ चार बोअरवेलला थोडे थोडे पाणी येते. महिलांना तासनतास रखरखत्या उन्हात बोअरवेलचा दांडा मारून-मारून घोटभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्याकरिता गावातील जवळपास ६० टक्के लोकांनी घरी बोअरवेल मारल्या. परंतु, त्यातील अनेक बोअरवेल कोरड्या पडल्या असून काहींना थोडे-थोडे पाणी येत आहे. अशी परीस्थिती असतानाही प्रशासनाचे याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष आहे.

बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाहीचार्ली गावातील दिनकर आवारी यांनी पाणीटंचाई पाहता घरी २००-२५० फूट खोलीच्या दोन ठिकाणी बोअरवेल खोदल्या. परंतु, दोन्ही बोअरवेलला घोटभरही पाणी लागले नाही. त्यात त्यांचा ५० हजारांचा खर्च वाया गेला. यावरून वेकोली परिसरात पाण्याची पातळी किती खोल गेली आहे हे दिसून येते.

पाण्याच्या स्रोताअभावी नळ योजना कुचकामी ठरली. वेकोलीच्या सहकार्याने सुरू असलेली पाइपलाइन महामार्गाच्या कामात तुटली. ती दुरुस्त करण्याच्या सूचना वेळोवळी वेकोलिला दिल्या. सध्या कढोली शिवारात तयार करण्यात आलेल्या स्रोतावरून नळयोजना सुरू करण्याचे काम सुरू आहे. लवकरच नळ योजना सुरू होईल.-विजय निवलकर, सरपंच, चार्ली.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकWaterपाणी