शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

नागभीड परिसरात वन्यप्राणी मानव संघर्ष विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले.

ठळक मुद्देउपाययोजना आवश्यक : जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : एकाच आठवड्यात दोन शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या ‘त्या’ नरभक्षक वाघाला वनविभागाने जेरबंद केले आहे. तो वाघ जेरबंद झाला म्हणून तालुक्यातील मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष संपला असे मुळीच नाही. उलट हा संघर्ष निर्माणच होणार नाही यासाठी नागरिक आणि वनविभाग यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले. नागभीड तालुका हा जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला ताडोबा आणि उमरेड कर्हांडला हे अभयारण्य अतिशय जवळ आहेत. त्यातच दोन वर्षांपूर्वीच शासनाने नागभीड तालुक्यातील घोडाझरीलाही अभयारण्य म्हणून घोषित केले. ताडोबा आणि उमरेड कऱ्हाडल्याच्या मधोमध घोडाझरी अभयारण्य असल्याने वाघांच्या भ्रमंतीस मोठा वाव असून यातूनच नागभीड तालुक्यात सध्या वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तीन चार वर्षांपूर्वी उमरेड - कऱ्हाडला अभयारण्यातील जय आणि श्रीनिवासन हे दोन वाघ नेहमीच नागभीड तालुक्याच्या भ्रमंतीवर यायचे. विशेष म्हणजे श्रीनिवासनची तर नागभीड तालुक्यातील विलम गावाजवळ हत्या करण्यात आली होती. या तालुक्यातील मौशी ढोरपा, पाहार्णी, बोंड, बाळापूर, कोसंबी गवळी, डोंगरगाव, तळोधी, गोविंदपूर, गीरगाव, कचेपार या परिसरातील अनेक गावे जंगलाने वेढलेली आहेत. या भागाचा कानोसा घेतला तर वाघ आणि बिबट यांचे दर्शन रोजच अनेकांना होत आहे. या वन्यपशुंनी पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन त्यांना ठार केल्याच्यासुद्धा घटना नेहमीच घडत आहेत. या घटना ग्रामीण जीवनाने पाहिजे त्या प्रमाणावर मनावर घेतल्या नव्हत्या. पण या महिन्यात तुकूम, सोनुली व मांगरूड येथे घडलेल्या वाघाच्या हल्याच्या तीन व त्याअगोदर कोसंबी, गवळी आणि मिंडाळा येथील घटनांनी तालुक्यातील ग्रामीण जीवन हादरुन गेले. या पाचही हल्ल्यात शेतकरीच ठार झाले आहेत. आणि तेही वाघांनी शेतात येऊन शेतकºयांना शिकार केली असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.उपाययोजना करणे गरजेचेतालुक्यात पाचही घटनांमध्ये वाघाने शेतात शेतकऱ्याला ठार केले. शेत जंगलानजिक आहे. नागभीड तालुक्यातच हजारो शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक आहे. या जंगली प्राण्यांनी कितीही हल्ले केले तरी शेतकऱ्यांना शेती ही करावीच लागणार आहे. असे हल्ले होऊ नयेत, मानव वन्यप्राणी संघर्ष वारंवार उद्भवू नये, यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :forestजंगल