शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नागभीड परिसरात वन्यप्राणी मानव संघर्ष विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले.

ठळक मुद्देउपाययोजना आवश्यक : जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : एकाच आठवड्यात दोन शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या ‘त्या’ नरभक्षक वाघाला वनविभागाने जेरबंद केले आहे. तो वाघ जेरबंद झाला म्हणून तालुक्यातील मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष संपला असे मुळीच नाही. उलट हा संघर्ष निर्माणच होणार नाही यासाठी नागरिक आणि वनविभाग यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले. नागभीड तालुका हा जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला ताडोबा आणि उमरेड कर्हांडला हे अभयारण्य अतिशय जवळ आहेत. त्यातच दोन वर्षांपूर्वीच शासनाने नागभीड तालुक्यातील घोडाझरीलाही अभयारण्य म्हणून घोषित केले. ताडोबा आणि उमरेड कऱ्हाडल्याच्या मधोमध घोडाझरी अभयारण्य असल्याने वाघांच्या भ्रमंतीस मोठा वाव असून यातूनच नागभीड तालुक्यात सध्या वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तीन चार वर्षांपूर्वी उमरेड - कऱ्हाडला अभयारण्यातील जय आणि श्रीनिवासन हे दोन वाघ नेहमीच नागभीड तालुक्याच्या भ्रमंतीवर यायचे. विशेष म्हणजे श्रीनिवासनची तर नागभीड तालुक्यातील विलम गावाजवळ हत्या करण्यात आली होती. या तालुक्यातील मौशी ढोरपा, पाहार्णी, बोंड, बाळापूर, कोसंबी गवळी, डोंगरगाव, तळोधी, गोविंदपूर, गीरगाव, कचेपार या परिसरातील अनेक गावे जंगलाने वेढलेली आहेत. या भागाचा कानोसा घेतला तर वाघ आणि बिबट यांचे दर्शन रोजच अनेकांना होत आहे. या वन्यपशुंनी पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन त्यांना ठार केल्याच्यासुद्धा घटना नेहमीच घडत आहेत. या घटना ग्रामीण जीवनाने पाहिजे त्या प्रमाणावर मनावर घेतल्या नव्हत्या. पण या महिन्यात तुकूम, सोनुली व मांगरूड येथे घडलेल्या वाघाच्या हल्याच्या तीन व त्याअगोदर कोसंबी, गवळी आणि मिंडाळा येथील घटनांनी तालुक्यातील ग्रामीण जीवन हादरुन गेले. या पाचही हल्ल्यात शेतकरीच ठार झाले आहेत. आणि तेही वाघांनी शेतात येऊन शेतकºयांना शिकार केली असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.उपाययोजना करणे गरजेचेतालुक्यात पाचही घटनांमध्ये वाघाने शेतात शेतकऱ्याला ठार केले. शेत जंगलानजिक आहे. नागभीड तालुक्यातच हजारो शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक आहे. या जंगली प्राण्यांनी कितीही हल्ले केले तरी शेतकऱ्यांना शेती ही करावीच लागणार आहे. असे हल्ले होऊ नयेत, मानव वन्यप्राणी संघर्ष वारंवार उद्भवू नये, यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :forestजंगल