शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड परिसरात वन्यप्राणी मानव संघर्ष विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले.

ठळक मुद्देउपाययोजना आवश्यक : जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : एकाच आठवड्यात दोन शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या ‘त्या’ नरभक्षक वाघाला वनविभागाने जेरबंद केले आहे. तो वाघ जेरबंद झाला म्हणून तालुक्यातील मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष संपला असे मुळीच नाही. उलट हा संघर्ष निर्माणच होणार नाही यासाठी नागरिक आणि वनविभाग यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले. नागभीड तालुका हा जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला ताडोबा आणि उमरेड कर्हांडला हे अभयारण्य अतिशय जवळ आहेत. त्यातच दोन वर्षांपूर्वीच शासनाने नागभीड तालुक्यातील घोडाझरीलाही अभयारण्य म्हणून घोषित केले. ताडोबा आणि उमरेड कऱ्हाडल्याच्या मधोमध घोडाझरी अभयारण्य असल्याने वाघांच्या भ्रमंतीस मोठा वाव असून यातूनच नागभीड तालुक्यात सध्या वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तीन चार वर्षांपूर्वी उमरेड - कऱ्हाडला अभयारण्यातील जय आणि श्रीनिवासन हे दोन वाघ नेहमीच नागभीड तालुक्याच्या भ्रमंतीवर यायचे. विशेष म्हणजे श्रीनिवासनची तर नागभीड तालुक्यातील विलम गावाजवळ हत्या करण्यात आली होती. या तालुक्यातील मौशी ढोरपा, पाहार्णी, बोंड, बाळापूर, कोसंबी गवळी, डोंगरगाव, तळोधी, गोविंदपूर, गीरगाव, कचेपार या परिसरातील अनेक गावे जंगलाने वेढलेली आहेत. या भागाचा कानोसा घेतला तर वाघ आणि बिबट यांचे दर्शन रोजच अनेकांना होत आहे. या वन्यपशुंनी पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन त्यांना ठार केल्याच्यासुद्धा घटना नेहमीच घडत आहेत. या घटना ग्रामीण जीवनाने पाहिजे त्या प्रमाणावर मनावर घेतल्या नव्हत्या. पण या महिन्यात तुकूम, सोनुली व मांगरूड येथे घडलेल्या वाघाच्या हल्याच्या तीन व त्याअगोदर कोसंबी, गवळी आणि मिंडाळा येथील घटनांनी तालुक्यातील ग्रामीण जीवन हादरुन गेले. या पाचही हल्ल्यात शेतकरीच ठार झाले आहेत. आणि तेही वाघांनी शेतात येऊन शेतकºयांना शिकार केली असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.उपाययोजना करणे गरजेचेतालुक्यात पाचही घटनांमध्ये वाघाने शेतात शेतकऱ्याला ठार केले. शेत जंगलानजिक आहे. नागभीड तालुक्यातच हजारो शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक आहे. या जंगली प्राण्यांनी कितीही हल्ले केले तरी शेतकऱ्यांना शेती ही करावीच लागणार आहे. असे हल्ले होऊ नयेत, मानव वन्यप्राणी संघर्ष वारंवार उद्भवू नये, यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :forestजंगल