शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरील जोखमीच्या ८६ गावांचे संकट केव्हा टळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST

चंद्रपूर : गत २० वर्षांच्या कालावधीत पुरामुळे गावांचे नुकसान होणे आणि दरड कोसळणे अशा संकटांमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या ...

चंद्रपूर : गत २० वर्षांच्या कालावधीत पुरामुळे गावांचे नुकसान होणे आणि दरड कोसळणे अशा संकटांमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या अतिजोखमीच्या पूरपीडित गावांसाठी राज्य सरकार नवीन पुनर्वसन धोरण तयार करणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचाही पुनर्वसन व पायाभूत सुविधांच्या यादीत समावेश होणार काय, असा सवाल गावकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ उपस्थित केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती समुद्रसपाटीची नसल्याने दरड कोसळण्याच्या घटनांची संख्या अत्यल्पच आहे. मात्र, इरई, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील गावांना दरवर्षी पुराचा जोरदार तडाखा बसतो. विशेषत: वैनगंगा नदी काठावरील अतिजोखमीच्या गावांची पावसाळ्यात कोंडी होते. पूरपीडित सर्वच गावांच्या पुनर्वसनाची आवश्यकता नाही, असे गावकऱ्यांचेच म्हणणे आहे. परंतु, पुरापासून बचाव करण्यासाठी पायाभूत सोईसुविधा मागील २० वर्षांच्या कालखंडात निर्माण होऊ शकल्या नाही. याची जबर किमत पूरपीडित गावांना मोजावी लागत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. घरांची पडझड होणे, पुरामुळे उभी पिके वाहून जाणे आणि हजारो हेक्टर शेतीची जमीन खरवडून निघणे या घटना आता दरवर्षीच घडू लागल्या आहेत, याबाबत गावकरी नाराज आहेत. मदत व पुनर्वसनमंत्री जिल्ह्याचेच असल्याने राज्य शासनाकडून नवीन पुनर्वसन सर्वंकष धोरण तयार करताना जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचा प्राधान्याने विचार झाला तरच हे नैसर्गिक संकट टळू शकते, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

बॉक्स

जीवनवाहिनीचा सर्वाधिक फटका

वैनगंगा नदी ही विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांतून समुद्रसपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला ९८ किलोमीटरचा प्रवास करून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमधून वाहते. जीवनवाहिनी म्हणून ओळखणाऱ्या वैनगंगेला पूर आल्यास ब्रह्मपुरी तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सर्वाधिक फटका बसतो.

बॉक्स

पूरबाधित गावांची तीन श्रेणी

मागील २० वर्षांत पूर आलेल्या गावांची यादी तयार करून स्थानांतरण, पुनर्वसन तसेच पायाभूत सुविधांबाबत नव्याने विचार केला जाणार आहे. या सर्वंकष पुनर्वसन धोरणासाठी जिल्हाधिकारी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन अशा पूरबाधित गावांची यादी निश्चित करतील. त्यामध्ये अतिजोखमीची पहिल्या यादीत, मध्यम दुसऱ्या व कमी जोखमीच्या गावांची नावे तिसऱ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

वर्षनिहाय पूरबाधित गावे

२०२०-६७

२०१३-८६

२००५-३५

एकूण १८८

तालुकानिहाय पूरप्रवण गावांची संख्या

चंद्रपूर १३

बल्लारपूर ०८

गोंडपिपरी ०८

वरोरा १०

भद्रावती ०९

ब्रह्मपुरी १३

सिंदेवाही २

राजुरा ०५

कोरपना १७