शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

नदी काठावरील जोखमीच्या ८६ गावांचे संकट केव्हा टळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST

चंद्रपूर : गत २० वर्षांच्या कालावधीत पुरामुळे गावांचे नुकसान होणे आणि दरड कोसळणे अशा संकटांमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या ...

चंद्रपूर : गत २० वर्षांच्या कालावधीत पुरामुळे गावांचे नुकसान होणे आणि दरड कोसळणे अशा संकटांमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या अतिजोखमीच्या पूरपीडित गावांसाठी राज्य सरकार नवीन पुनर्वसन धोरण तयार करणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचाही पुनर्वसन व पायाभूत सुविधांच्या यादीत समावेश होणार काय, असा सवाल गावकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ उपस्थित केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती समुद्रसपाटीची नसल्याने दरड कोसळण्याच्या घटनांची संख्या अत्यल्पच आहे. मात्र, इरई, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील गावांना दरवर्षी पुराचा जोरदार तडाखा बसतो. विशेषत: वैनगंगा नदी काठावरील अतिजोखमीच्या गावांची पावसाळ्यात कोंडी होते. पूरपीडित सर्वच गावांच्या पुनर्वसनाची आवश्यकता नाही, असे गावकऱ्यांचेच म्हणणे आहे. परंतु, पुरापासून बचाव करण्यासाठी पायाभूत सोईसुविधा मागील २० वर्षांच्या कालखंडात निर्माण होऊ शकल्या नाही. याची जबर किमत पूरपीडित गावांना मोजावी लागत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. घरांची पडझड होणे, पुरामुळे उभी पिके वाहून जाणे आणि हजारो हेक्टर शेतीची जमीन खरवडून निघणे या घटना आता दरवर्षीच घडू लागल्या आहेत, याबाबत गावकरी नाराज आहेत. मदत व पुनर्वसनमंत्री जिल्ह्याचेच असल्याने राज्य शासनाकडून नवीन पुनर्वसन सर्वंकष धोरण तयार करताना जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचा प्राधान्याने विचार झाला तरच हे नैसर्गिक संकट टळू शकते, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

बॉक्स

जीवनवाहिनीचा सर्वाधिक फटका

वैनगंगा नदी ही विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांतून समुद्रसपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला ९८ किलोमीटरचा प्रवास करून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमधून वाहते. जीवनवाहिनी म्हणून ओळखणाऱ्या वैनगंगेला पूर आल्यास ब्रह्मपुरी तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सर्वाधिक फटका बसतो.

बॉक्स

पूरबाधित गावांची तीन श्रेणी

मागील २० वर्षांत पूर आलेल्या गावांची यादी तयार करून स्थानांतरण, पुनर्वसन तसेच पायाभूत सुविधांबाबत नव्याने विचार केला जाणार आहे. या सर्वंकष पुनर्वसन धोरणासाठी जिल्हाधिकारी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन अशा पूरबाधित गावांची यादी निश्चित करतील. त्यामध्ये अतिजोखमीची पहिल्या यादीत, मध्यम दुसऱ्या व कमी जोखमीच्या गावांची नावे तिसऱ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

वर्षनिहाय पूरबाधित गावे

२०२०-६७

२०१३-८६

२००५-३५

एकूण १८८

तालुकानिहाय पूरप्रवण गावांची संख्या

चंद्रपूर १३

बल्लारपूर ०८

गोंडपिपरी ०८

वरोरा १०

भद्रावती ०९

ब्रह्मपुरी १३

सिंदेवाही २

राजुरा ०५

कोरपना १७