शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

ऐतिहासिक रामाळा तलावासाठी पर्यावरणमंत्री काय देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात आली. त्यासाठी तलाव कोरडा करण्यात आला; पण जलपर्णीचा प्रश्न कायम  आहे. विकास आराखडा अनेक तरतुदी करण्यात आल्या. मात्र अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडकालीन रामाळा तलावाने शेकडो पिढ्यांची तहान भागविली. मात्र, या तलावाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले. अतिक्रमणाचा प्रश्नही कायम आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने अनेक घोषणा केल्या. मात्र,  अंमलबजावणीचा दुष्काळ असताना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे रविवारी या तलावाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे  तलावासाठी काय देणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.औद्योगिकीकरणामुळे शहराची लोकसंख्या वाढली. अनेक तलाव नागरी वस्त्यांनी गिळंकृत केले. आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात आली. त्यासाठी तलाव कोरडा करण्यात आला; पण जलपर्णीचा प्रश्न कायम  आहे. विकास आराखडा अनेक तरतुदी करण्यात आल्या. मात्र अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न आहे.

असा आहे चंद्रपूर जिल्ह्याचा दाैरापर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे रविवारी दुपारी सव्वातीन वाजता चंद्रपूर येथे आगमन होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता शहरातील रामाळा तलाव आणि सायंकाळी चार वाजता बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पाहणी करतील. सायंकाळी साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हा पर्यटनविषयक बैठक घेतील. सायंकाळी इरई नदीची पाहणी करतील. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत.

तलाव परिसरात अनेकांचे अतिक्रमणजलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत नाही.  या वनस्पतीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. सोसायटीने  मत्स्यबीज टाकूनही त्याचा काही लाभ होत नाही. जलपर्णी काढण्यासाठी पाणी सोडले तर मोठे नुकसान होईल. पाणी सोडले नाही, तर तलावावर जलपर्णी पसरेल, असे दुहेरी संकट आहे.  

सांडपाण्याचे केंद्ररामाळा तलाव शहरातील सांडपाणी जमा होण्याचे केंद्र आहे. शहरातील मुख्य मच्छीनाल्याचा एक भाग झरपट नदीला मिळतो. तो सरळ तलावात येतो. त्यामुळे दूषित पाण्यावर जगणारी वनस्पती वाढते. नागरिकांना दुर्गंधी आणि विविध आजारांचा सामना करावा लागतो. मनपाने  तलावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंध घातला होता.

विकास आराखडा कागदावरचइको-प्रोचे बंडू धोतरे व विविध संघटनांनी रामाळा तलावाच्या विकासासाठी साखळी आंदोलन केले होते. जिल्हा प्रशासन व चंद्रपूर मनपाने संयुक्त आराखडा तयार केला. यासाठी निधी देण्याची घाेषणाही झाली. परंतु, अंमलबजावणी झाली नाही. तलावालगतच्या रेल्वे मालधक्क्यावरून रासायनिक खते चढ-उतार होते. युरिया, सल्फेटसारखी खते पावसाच्या पाण्यासोबत वाहून तलावात येतात. तलावाचा विकास केल्यास उत्तम पर्यटन केंद्र होऊ शकते

 

टॅग्स :tourismपर्यटनwater transportजलवाहतूक