शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

ऐतिहासिक रामाळा तलावासाठी पर्यावरणमंत्री काय देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात आली. त्यासाठी तलाव कोरडा करण्यात आला; पण जलपर्णीचा प्रश्न कायम  आहे. विकास आराखडा अनेक तरतुदी करण्यात आल्या. मात्र अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडकालीन रामाळा तलावाने शेकडो पिढ्यांची तहान भागविली. मात्र, या तलावाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले. अतिक्रमणाचा प्रश्नही कायम आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने अनेक घोषणा केल्या. मात्र,  अंमलबजावणीचा दुष्काळ असताना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे रविवारी या तलावाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे  तलावासाठी काय देणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.औद्योगिकीकरणामुळे शहराची लोकसंख्या वाढली. अनेक तलाव नागरी वस्त्यांनी गिळंकृत केले. आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात आली. त्यासाठी तलाव कोरडा करण्यात आला; पण जलपर्णीचा प्रश्न कायम  आहे. विकास आराखडा अनेक तरतुदी करण्यात आल्या. मात्र अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न आहे.

असा आहे चंद्रपूर जिल्ह्याचा दाैरापर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे रविवारी दुपारी सव्वातीन वाजता चंद्रपूर येथे आगमन होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता शहरातील रामाळा तलाव आणि सायंकाळी चार वाजता बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पाहणी करतील. सायंकाळी साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हा पर्यटनविषयक बैठक घेतील. सायंकाळी इरई नदीची पाहणी करतील. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत.

तलाव परिसरात अनेकांचे अतिक्रमणजलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत नाही.  या वनस्पतीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. सोसायटीने  मत्स्यबीज टाकूनही त्याचा काही लाभ होत नाही. जलपर्णी काढण्यासाठी पाणी सोडले तर मोठे नुकसान होईल. पाणी सोडले नाही, तर तलावावर जलपर्णी पसरेल, असे दुहेरी संकट आहे.  

सांडपाण्याचे केंद्ररामाळा तलाव शहरातील सांडपाणी जमा होण्याचे केंद्र आहे. शहरातील मुख्य मच्छीनाल्याचा एक भाग झरपट नदीला मिळतो. तो सरळ तलावात येतो. त्यामुळे दूषित पाण्यावर जगणारी वनस्पती वाढते. नागरिकांना दुर्गंधी आणि विविध आजारांचा सामना करावा लागतो. मनपाने  तलावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंध घातला होता.

विकास आराखडा कागदावरचइको-प्रोचे बंडू धोतरे व विविध संघटनांनी रामाळा तलावाच्या विकासासाठी साखळी आंदोलन केले होते. जिल्हा प्रशासन व चंद्रपूर मनपाने संयुक्त आराखडा तयार केला. यासाठी निधी देण्याची घाेषणाही झाली. परंतु, अंमलबजावणी झाली नाही. तलावालगतच्या रेल्वे मालधक्क्यावरून रासायनिक खते चढ-उतार होते. युरिया, सल्फेटसारखी खते पावसाच्या पाण्यासोबत वाहून तलावात येतात. तलावाचा विकास केल्यास उत्तम पर्यटन केंद्र होऊ शकते

 

टॅग्स :tourismपर्यटनwater transportजलवाहतूक