शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

लोकशाहीची नीतिमूल्ये टिकविण्यासाठी पेटून उठण्याची गरज - विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 12:48 IST

क्रांतिभूमी चिमुरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

चिमूर (चंद्रपूर) : देशात हुकूमशाहीची मुहूर्तमेढ रोवण्याचा मानस अंगीकारत धर्मा- धर्मात, जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी विषाचे बीज पेरले जात आहे. ‘मुह मे राम, बगल मे छुरी’ अशी दुटप्पी भूमिका ठेवणाऱ्या मनुवादी विचारांमुळे देश गुलामगिरीच्या वाटेवर लोटला जात आहे. संविधानातील लोकशाहीची नीतिमूल्ये जर टिकवायची असतील तर बहुजन नायक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पेटून उठण्याची गरज आहे, असे परखड मत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

ते क्रांतिभूमी चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या पटांगणात क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बोलत होते. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) कमिटी, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण (ओबीसी /अनुसूचित) जाती विभाग व कौमी एकता नवजवान कमिटी चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, चंद्रपूर काँग्रेस (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ओबीसी विभागाचे जेसाभाई मोटवानी, अनुसूचित जाती सेलचे प्रफुल खापर्डे, चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे, जिल्हा महासचिव गजानन बुटके, गजानन गुरपुडे, विनोद बोरकर, खेमराज मरस्कोल्हे, प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर, सिंदेवाही काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, कौमी एकता नवजवान कमिटी चिमूरचे अध्यक्ष जावा शेख, चुनीलाल कुडवे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रसिद्ध नाट्य कलावंत तथा गायक अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक ‘मी वादळ वारा’ हा बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :SocialसामाजिकVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीchandrapur-acचंद्रपूर