मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर तालुक्यांतील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST2021-07-17T04:23:02+5:302021-07-17T04:23:02+5:30
चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे मूल तालुक्यातील २४ गावे, पोंभुर्णा तालुक्यातील १५ ...

मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर तालुक्यांतील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात
चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे मूल तालुक्यातील २४ गावे, पोंभुर्णा तालुक्यातील १५ गावे, तर बल्लारपूर तालुक्यातील १८ गावे अंतर्भूत असलेल्या योजनेचा विस्तृत आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, ॲड. हरीश गेडाम, वैशाली बुद्धलवार, गौतम निमगडे, रामपाल सिंह, पं.स. पोंभुर्णाच्या सभापती अल्का आत्राम, पं.स. सभापती केमा रायपुरे, रमेश पिपरे, नामदेव आसुटकर, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा (जि.प.) व अन्य अधिकारी उपस्थित होते.
संबंधित योजनांच्या कामांची प्रशासकीय मान्यता कधी मिळाली, त्याची किंमत किती, टेंडर कधी झाले, काम पूर्ण करण्याचा कालावधी किती होता, त्याला उशीर झाला असल्यास काही दंड ठोठावला का, व तो वसूल झाला का, असे अनेक प्रश्नांचा आढावा घेतला. मूल तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणी ऑक्टोबर २०२१ पर्यंत, पोंभुर्णा तालुक्यातील काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही, असे बजावत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल पुरवठा होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.