शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

हातपंप बंद पडल्याने पाटण परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 12:48 AM

महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । दुरूस्ती पथकाची प्रतीक्षा, उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी महिलांची भटकंती

अनवर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : जिवती तालुक्यातील कामतगुडा, सिंगरेगोंदी, लखमापूर, शंकरपठार, सांगनापूर, पोचीगुड, चौपणगुडा या गावांतील हातपंप नादुरूस्त असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. संगमनापूर गावाला भेट दिली असता नागरिकांचे हाल दिसून आले. भीमराव मुट्टेलु, चिंनू राजू, मारोती भिमराव मुटटेलु, भीमराव बुततेलु, बापूराव भित्तेलु, महेश मुट्टेलु, मैसु मुट्टेलु, येल्ला, किसन, संतोष, देवराव राजू मुट्टेलु आदींनी गावातील जलसंकटाची माहिती दिली. सहा महिन्यांपासून हातपंप बंद असल्यामुळे हरी कुंडगिरी यांच्या खासगी विहिरीतून पाण्याची गरज भागवावी लागत असल्याचे पोलीस पाटील भीमराव मुहूलू यांनी सांगितले. परमडोली, कोठा, शंकरलोधी, लेंडीगुडा, महाराजगुडा, पद्मावती, आंतरगाव, इंदिरानगर, येसापूर, पळसगाव, नारायणगुडा, भोलापाठर, गौरी या वादग्रस्त गावांमध्येही टंचाईची चाहूल लागली आहे.विकास योजना पोहोचवाजिवती तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये विकासाच्या अनेक योजना पोहोचल्या नाही. शेतकरी आजही पारंपरिक शेती करून उदरनिर्वाह करीत आहेत. महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणाºया योजनांचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीच्या विकासासोबतच सामाजिक न्याय व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक झाले आहे.उपाययोजना करण्याची मागणीमहाराष्ट्रातील भाईपठार व कोलामगुडा येथील कुटुंबांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे नापिकी व तेलंगणा सरकारच्या योजनांसाठी स्थलांतर केले. या गावांमध्येही पाणी टंचाईची चाहूल सुरू झाली. कामतगुडा, सिंगरेगोंदी, लखमापूर, शंकरपठार, सांगनापूर, पोचीगुड, चौपणगुडा येथील हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी