शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 15:47 IST

Chandrapur : पाण्यासाठी सुरु आहे पायपीट; विहिरींनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड पंचायत समिती अंतर्गत १५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावातील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींचे पाणी तळाशी गेल्याने १५ गावातील नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच त्रेधा तिरपट उडत असल्याची माहिती आहे.

उन्हाळा आता ऐन भरात आहे. त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक पाणी स्त्रोतावर महिलांची गर्दी वाढली आहे. परिणामी विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी नळयोजनेच्या पाईपलाईन जीर्ण झाल्याने तर काही ठिकाणी जल जीवन मिशनद्वारा सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे.

पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार पांजरेपार येथील नळयोजना बंद पडल्याने येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पान्होळी येथील नळयोजनेच्या विहिरीत पाणी नसल्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कोर्धा, कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी, ढोरपा, चारगाव चक, मोहाळी, मिंथूर, कसर्ला येथील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठल्याने या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कन्हाळगाव व बोंड येथे नळयोजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्याने या दोन गावात पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. कसर्ला येथील पाणीटंचाईस जल जीवन मिशनचे काम अपूर्ण हेही कारण सांगितल्या जात आहे.

सुचविण्यात आलेल्या उपाययोजनाया गावात पाणी टंचाईच्या समस्येचे त्वरित निवारण करण्यासाठी गावातील विहिरींचे गाळ काढणे, जुन्या विंधन विहिरी फ्लशिंग करणे, गावात नवीन विंधन विहिरी खोदणे, इन्व्हेल बोअर मारणे आदी उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. मात्र या उपाययोजनांची पूर्तता केव्हा करण्यात येते या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. यासंदर्भात येथील प्रभारी गटविकास अधिकारी शुक्रे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, पण त्यांचेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर