शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

१५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 15:47 IST

Chandrapur : पाण्यासाठी सुरु आहे पायपीट; विहिरींनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड पंचायत समिती अंतर्गत १५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावातील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींचे पाणी तळाशी गेल्याने १५ गावातील नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच त्रेधा तिरपट उडत असल्याची माहिती आहे.

उन्हाळा आता ऐन भरात आहे. त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक पाणी स्त्रोतावर महिलांची गर्दी वाढली आहे. परिणामी विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी नळयोजनेच्या पाईपलाईन जीर्ण झाल्याने तर काही ठिकाणी जल जीवन मिशनद्वारा सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे.

पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार पांजरेपार येथील नळयोजना बंद पडल्याने येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पान्होळी येथील नळयोजनेच्या विहिरीत पाणी नसल्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कोर्धा, कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी, ढोरपा, चारगाव चक, मोहाळी, मिंथूर, कसर्ला येथील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठल्याने या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कन्हाळगाव व बोंड येथे नळयोजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्याने या दोन गावात पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. कसर्ला येथील पाणीटंचाईस जल जीवन मिशनचे काम अपूर्ण हेही कारण सांगितल्या जात आहे.

सुचविण्यात आलेल्या उपाययोजनाया गावात पाणी टंचाईच्या समस्येचे त्वरित निवारण करण्यासाठी गावातील विहिरींचे गाळ काढणे, जुन्या विंधन विहिरी फ्लशिंग करणे, गावात नवीन विंधन विहिरी खोदणे, इन्व्हेल बोअर मारणे आदी उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. मात्र या उपाययोजनांची पूर्तता केव्हा करण्यात येते या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. यासंदर्भात येथील प्रभारी गटविकास अधिकारी शुक्रे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, पण त्यांचेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर