शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

पाणी पातळी दीड मीटरने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:57 PM

यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती ....

ठळक मुद्देजिल्ह्यात ५३.३० टक्केच पाऊस : उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती भूजल सर्व्हेक्षण विभागाने दिली आहे.भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून दरवर्षी वर्षांतून तीनदा भूजल पातळीची नोंद घेतली जाते. या अहवालातून त्या गावांना, तालुक्यांना पाणी वापराबाबत सूचना मिळत असतात. त्यामुळे प्रशासनही त्या आधारे पाण्याचे नियोजन करीत असते. दरवर्षी मार्च व जुलै महिन्यात होणाºया सर्व्हेक्षणातून पाणी पातळीत घट दिसून येत असते. मात्र आॅक्टोबर महिन्यात होणाºया सर्व्हेक्षणात पाणी पातळीत वाढ झालेली दिसते. मात्र यावर्षी कमी पावसामुळे आॅक्टोबर महिन्यातच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने घटल्याचे समोर आले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला दिला. त्यामुळे पेरणीची कामे उशिराने झाली. तब्बल महिनाभराने पाऊस पडला. मात्र पावसात सातत्य नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांनाही सरासरी गाठता आली नाही. त्यामुळे सध्या अनेक सिंचन प्रकल्पांनी आताच तळ गाठले आहे. यामुळे सिंचन प्रकल्पांतून नळ योजनांना होणारा पाणीपुरवठा प्रभावित होत असून आतापासूनच नियोजन आवश्यक आहे.जिल्ह्यात काही दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझीम पावसाची हजेरी लागत असल्याने या पावसाने शेतपिकांना फायदा होत आहे. मात्र सिंचन प्रकल्प व नदी, नाले कोरडे असल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी समस्या उद्भवण्याची चिन्ह आहेत.