शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

३५ वर्षांनंतर मिळाले पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:14 IST

सत्ता परिवर्तनानंतर आजारी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत करून सिंचन वाढविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला चंद्रपूरमध्ये पाठबळ मिळाले आहे. राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात चारशे हेक्टर सिंचन क्षमता एका बंद पडलेल्या तलावाने वाढवली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार : मौलझरी तलावाची सिंचन क्षमता चारशे हेक्टर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सत्ता परिवर्तनानंतर आजारी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत करून सिंचन वाढविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला चंद्रपूरमध्ये पाठबळ मिळाले आहे. राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात चारशे हेक्टर सिंचन क्षमता एका बंद पडलेल्या तलावाने वाढवली आहे. अधिकाऱ्यांच्या कल्पकतेला शासन-प्रशासनाची मिळालेली साथ यामधून हा चमत्कार चंद्रपूर जिल्ह्यात साकारला गेला आहे.साधारण चाळीसी ते पन्नाशीमध्ये गेलेल्या पिढीला चंद्रपूर-मूल राज्यमार्गावर असणारा मौलझरी लघू पाटबंधारे तलाव आठवत असेल. १९७२-७३ मध्ये या तलावाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सन १९८३ मध्ये या तलावाच्या धरण पाळीचे काम पूर्ण करण्यात आले. या तलावातून चारशे हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल, अशी आशा या भागातील नागाळा, महादवाडी, गोंडसावरी या गावांना होती. मात्र दरवर्षी येणारा पाऊस तलाव भरून काढायचा. पण काही दिवसातच धरण पाळीतून ३५ वर्ष सतत पाणी वाहून जात होते.त्यामुळे या तीनही गावातील नागरिक सातत्याने काहीतरी उपाययोजना होऊन पाणी साठेल, यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागे लागत होते. मौलझरी लघू पाटबंधारे तलाव व त्यासाठी करण्यात येणाºया प्रत्येक उपाययोजनेबाबत या काळात आणखी एक व्यक्ती सातत्याने विधानसभेमध्ये लढत होता. ते होते तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार !२०१४ मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मात्र ना. मुनगंटीवार यांनी आपल्या जुन्या मागणीसाठी पुन्हा एकदा या तलावाबाबत काय करता येईल, यासाठी अधिकाºयांना विचारमंथन करायला सांगितले. पाटबंधारे विभागाचे चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने यांनी तलावाच्या धरण पाळी खालून होणारी गळती थांबविण्याकरिता सिमेंट ग्राउंटींग करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला.हा प्रस्ताव पुढे ठेवताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा एका ठिकाणी केलेला यशस्वी प्रयोग पालकमंत्र्यांना सांगितला. कार्यकारी अभियंता सोनोने यांचा प्रस्ताव मान्य करण्याचा निर्णय ना.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. २७ मार्चला भूमिपूजन झाले आणि त्यानंतर चार महिन्यांपर्यंत पाळीच्या मध्यभागातून तीन समांतर रंगांमध्ये जलरोधी खंदकाच्याही खाली खडकांमध्ये सरासरी चार मीटर खोलीपर्यंत मशीनद्वारे डीलिंग करून सिमेंट ग्राउंटीग करण्यात आले. यामुळे या खडकांमध्ये भेगा राहिलेल्या आहेत त्या भागामध्ये सिमेंट जाऊन बसते. त्यामुळे या धरणाची भिंत कायमस्वरूपी अभेद्य झाली असून आता पुढच्या अनेक वर्षांपर्यंत या धरणामधून पाणी लिकेज अर्थात पाण्याची गळती होणार नाही.जलयुक्तला ‘चांदा ते बांदा’ ची मदत देऊ : मुनगंटीवारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रापुढे ठेवलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. मौलझरी तलाव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कल्पक व धाडसी अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण कायम असतो. हा प्रकल्प पुनर्जिवित करण्यासाठी गेली अनेक वर्षे मी लढा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. जलयुक्त शिवार योजनेतून या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले आहे. या प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी व परिपूर्णतेसाठी चांदा ते बांदा योजनेतूनही निधी दिला जाईल. हा प्रकल्प पुढच्या वर्षी आणखी पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल अशी, मला आशा असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.प्रयोगाला मान्यता मिळाल्याचा आनंद : सोनोनेया प्रकल्पाबद्दल बोलताना कार्यकारी अभियंता राजेश सोनोने यांनी अधिकाऱ्यांच्या प्रयोगशीलतेला कल्पक नेतृत्वाने पाठबळ दिल्याचा हा चमत्कार असल्याचे सांगितले. गेली अनेक वर्षे या जिल्ह्यांमध्ये काम करताना ही उपाययोजना सूचवली होती. यावर निधी कोठून खर्च करायचा आणि ही योजना यशस्वी होईल का, असा प्रश्न करून आपली बोळवण होत होती. मात्र पालकमंत्र्यांनी या प्रयोगावर विश्वास ठेवत पाठबळ दिल्याने आज सत्य पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.