शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मामा तलावांना सीमांकनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:50 IST

चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देअतिक्रमण वाढले : शेतकरी व प्रशासनात वाद

घनश्याम नवघडे।आॅनलाईन लोकमतनागभीड : चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी या तलावांवरील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सिंचन क्षमता कमी होत आहे.१६ मे २०१६ च्या जल-१ या निर्णयानुसार या तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे शासनाने ठरविले आहे. यानुसार २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ४१४ तलावांच्या दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. ऊर्वरित कामे २०१९ पर्यत करण्यात येणार आहेत. असे असले तरी त्याअगोदर या तलावांचे सीमांकन होणे गरजेचे आहे. मात्र या तलावांचे सीमांकन करण्याची तसदी न घेता जि.प.च्या लघु सिंचन विभागाने तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे काम सुरू केले. तेच मुळ चुकीचे आहे, असे यासंदर्भात बोलले जात आहे.वास्तविक, सीमांकनाअभावी या तलावात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अतिक्रमणामुळे मामा तलाव काही ठिकाणी आपले अस्तित्व हरवून बसले असून सिंचन क्षमता कमी झाली आहे. या अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक, गावकरी व प्रशासन यांच्यात संघर्ष उद्भवल्याची उदाहरणे माहित असूनही जि.प या तलावांच्या सीमांकनाबाबत वेळ काढूपणाचे धोरण का अवलंबत आहे, हे एक कोडेच आहेसीमांकन करून तलावातील अतिक्रमण हटविल्यास पाण्याच्या संचय साठ्यात भर पडून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.प्रशासन व शेतकऱ्यांमधील वादही थांबतीललघु सिंचान विभागाकडे नसलेल्या पण जि. प. कडील एका विभागाच्या अखत्यारीतील मांगरूड आणि गोविंदपूर येथील तलावाच्या सीमांकनावरून नागभीड तालुक्यातच मोठे वाद उद्भवले होते. मांगरूड येथे तर उपविभागीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत वेस्ट वेअर फोडावा लागल्याची घटना मागील वर्षी घडली होती. हेच सीमांकन अगोदर झाले असते तर ही वेळ आली नसती.मोजणी शुल्क भरण्यासाठी निधीच नाहीमामा तलावांचे सीमांकन करण्यासाठी उपविभागीय कार्यालयांनी सबंधित भूमी अभिलेख कार्यालयांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. असे असले तरी भूमी अभिलेख कार्यालय मोजणी शुल्क प्राप्त झाल्याशिवाय सीमांकन करून देत नसल्याने येथेच लघु सिंचाई विभागाचे घोडे अडले आहे. मात्र मोजणी शुल्क अदा करायला लघु सिंचन विभागाकडे निधीच नाही.तलावाच्या पोटात झालेल्या अतिक्रमणामुळे वारंवार होत असलेले वाद लक्षात घेऊन या सर्व तलावांचे सीमांकन करणे गरजेचे आहे. यावर जि.प.च्या सभेत आपण प्रश्नही उपस्थित केला होता. या तलावांचे सीमांकन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार.- संजय गजपुरे, जि. प. सदस्य, चंद्रपूर .