शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावांना सीमांकनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:50 IST

चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देअतिक्रमण वाढले : शेतकरी व प्रशासनात वाद

घनश्याम नवघडे।आॅनलाईन लोकमतनागभीड : चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी या तलावांवरील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सिंचन क्षमता कमी होत आहे.१६ मे २०१६ च्या जल-१ या निर्णयानुसार या तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे शासनाने ठरविले आहे. यानुसार २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ४१४ तलावांच्या दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. ऊर्वरित कामे २०१९ पर्यत करण्यात येणार आहेत. असे असले तरी त्याअगोदर या तलावांचे सीमांकन होणे गरजेचे आहे. मात्र या तलावांचे सीमांकन करण्याची तसदी न घेता जि.प.च्या लघु सिंचन विभागाने तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे काम सुरू केले. तेच मुळ चुकीचे आहे, असे यासंदर्भात बोलले जात आहे.वास्तविक, सीमांकनाअभावी या तलावात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अतिक्रमणामुळे मामा तलाव काही ठिकाणी आपले अस्तित्व हरवून बसले असून सिंचन क्षमता कमी झाली आहे. या अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक, गावकरी व प्रशासन यांच्यात संघर्ष उद्भवल्याची उदाहरणे माहित असूनही जि.प या तलावांच्या सीमांकनाबाबत वेळ काढूपणाचे धोरण का अवलंबत आहे, हे एक कोडेच आहेसीमांकन करून तलावातील अतिक्रमण हटविल्यास पाण्याच्या संचय साठ्यात भर पडून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.प्रशासन व शेतकऱ्यांमधील वादही थांबतीललघु सिंचान विभागाकडे नसलेल्या पण जि. प. कडील एका विभागाच्या अखत्यारीतील मांगरूड आणि गोविंदपूर येथील तलावाच्या सीमांकनावरून नागभीड तालुक्यातच मोठे वाद उद्भवले होते. मांगरूड येथे तर उपविभागीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत वेस्ट वेअर फोडावा लागल्याची घटना मागील वर्षी घडली होती. हेच सीमांकन अगोदर झाले असते तर ही वेळ आली नसती.मोजणी शुल्क भरण्यासाठी निधीच नाहीमामा तलावांचे सीमांकन करण्यासाठी उपविभागीय कार्यालयांनी सबंधित भूमी अभिलेख कार्यालयांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. असे असले तरी भूमी अभिलेख कार्यालय मोजणी शुल्क प्राप्त झाल्याशिवाय सीमांकन करून देत नसल्याने येथेच लघु सिंचाई विभागाचे घोडे अडले आहे. मात्र मोजणी शुल्क अदा करायला लघु सिंचन विभागाकडे निधीच नाही.तलावाच्या पोटात झालेल्या अतिक्रमणामुळे वारंवार होत असलेले वाद लक्षात घेऊन या सर्व तलावांचे सीमांकन करणे गरजेचे आहे. यावर जि.प.च्या सभेत आपण प्रश्नही उपस्थित केला होता. या तलावांचे सीमांकन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार.- संजय गजपुरे, जि. प. सदस्य, चंद्रपूर .