शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेला पूर्णत्वाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 14, 2015 01:15 IST

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकामाधीन आहे.

सुरेश रंगारी कोठारीबल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकामाधीन आहे. या योजनेस ८ नोव्हेंबर २०११ ला सन १९९९-२००० चे दरसूचीनुसार १९३१.५३ लक्ष साठी प्रशासकीय मान्यता व ३० जानेवारी २००९ ला सन २००८-०९ चे दरसुचीनुसार ७०३७.८८ लक्ष किमतीच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावास विदर्भ पाटबंधारे विभाग मंडळ नागपूरद्वारे मान्यता मिळाली. ११ डिसेंबर २०११ ला या योजनेच्या प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ झाला. मात्र सध्याची कामाची स्थिती पाहता, उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होईल, हे सांगता येणे कठीण आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील हे सिंचन प्रकल्प एकमेव असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बल्लारपूर तालुक्यातील दहा गावे सुजलाम-सुफलाम होणार आहेत. या योजनेतून ३ हजार ६९९ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. या भागातील शेती केवळ निसर्गाच्या भरवश्यावर असून प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. सध्या स्थितीत या योजनेच्या जॅलवेल, पंपहाऊस व उध्वनलिकेचे काम प्रततीपथावर आहे. तसेच उजवा व डावा मुख्य कालव्याचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यापैकी ४०० ते ५०० मिटर कालव्याचे काम शिल्लक आहे. या भागातील शेत जमीन उत्तम दर्जाची असून कोरडवाहू शेतकऱ्यांना हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. गेली १५ वर्षांपासून या प्रकल्पाच्या लाभासाठी शेतकरी तळमळीत आहे. या प्रकल्पाच्या पंपहाऊस व जॅवेलचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून पंपमशीन ४ बाय २८५ अशक्ती प्रकल्प ठिकाणी फिटींगसाठी आल्या आहेत. या प्रकल्पाला लागणारी विजेची कामे पूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पामुळे खरीप २ हजार ३९८ हे व रब्बी १ हजार ३०१ हे शेती सिंचीत होणार आहे. अजूनपर्यंत या प्रकल्पाचा वितरण हौदाचे कामास सुरूवात झाली नाही. मात्र या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा दावा करीत आहेत.पळसगाव- आमडी उपसा सिंचन प्रकल्पाचे कामे येत्या जून-जुलैमध्ये पूर्ण होणार असून प्रकल्पात आवश्यक निधीचा पुरवठा वेळोवेळी होत आहे. कोणत्याही विभागाकडून प्रकल्पबाधीत होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. येत्या हंगामात प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत २० टक्के काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. कालव्याचेकाम निकृष्टया प्रकल्पाच्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक कामे अंदाजपत्रकात नमूद असल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे करण्यात आली नाहीत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाला तरीही भविष्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ३९९८ हे असून बल्लारपूर तालुक्यातील बामणी, दुधोली, दहेली, जोगापूर, कोर्टीतुकूम, कोर्टीमक्ता, कळमना, आमडी व पळसगाव या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.