शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अन् प्रेमनगरातील ग्रामस्थांनी गावच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:02 AM

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली.

ठळक मुद्देदहा वर्षांची वस्ती क्षणार्धात ओसाड : गावाला पोलीस छावणीचे स्वरुप

शंकर चव्हाण।आॅनलाईन लोकमतजिवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली. वाद विकोपाला जाऊन एखादी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीच यासाठी ग्रामस्थांचे समुपदेशन केले. त्याला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी हा निर्णय घेत सोमवारी आपले बस्तान सेवादासनगरात हलविले.जिवतीपासून २७ कि.मी. अंतरावर असलेल्या नोकेवाडा ग्रा.पं. मधील प्रेमनगरातील नागरिक उदरनिर्वाहासाठी सेवादासनगरातून स्थलांतरित झाले होते. दहा वर्षांपूर्वी प्रेमनगरात येऊन त्यांनी आपली वस्ती थाटली होती. गाव महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असल्याने नोकेवाडा ग्रामपंचायतींतर्गत प्रेमनगरात सिमेंट रस्ता व पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. आणि आता गावात विजेचे खांबही आले होते. दरम्यान, तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून बंजारा व आदिवासी समाजात वाद पेटला आहे. विशेष म्हणजे, प्रेमनगर गावाची महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा राज्यातही नोंद झाली आहे. ग्रामस्थांची नावेसुद्धा तेलंगणातील मतदान यादीत समाविष्ट झाली आहे. हीच बाब तेलंगणा राज्यातील कोलामा येथील नागरिकांच्या मनात खटकत होती. आता प्रेमनगरातील ग्रामस्थसुद्धा आपल्या आरक्षणाचा फायदा घेत सुविधा घेतील, असा समज झाल्याने तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरात हल्ला चढविला. गाव उठवा नाहीतर घरे जाळू व जिवानिशी मारू, अशा धमक्या दिल्या. याबाबत प्रेमनगरातील ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार करून संरक्षक मागितले. निवेदन दिल्यानंतर पुन्हा तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरात येऊन गोंधळ घातला. सोमवारपर्यंत गाव न हटविल्यास घरे जाळून टाकू, असा इशारा देत लोकांनी प्रेमनगरातील एका मांडवाला आग लावली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस विभागाने प्रेमनगरात दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त कुमक पाठवून तगडा बंदोबस्त लावला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तेलंगणातील लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा रोष वाढतच असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी प्रेमनगरातील ग्रामस्थांचेच समुपदेशन करीत त्यांना सेवादासनगरात हलविले.