शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या ईरई व झरपटच्या विद्रुपीकरणाला वेकोलिच जबाबदार

By राजेश भोजेकर | Updated: June 15, 2024 18:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे नागपूर खंडपीठात अखेर शपथपतत्र; नरेश पुगलिया यांची माहिती

चंद्रपूर : चंद्रपूरच्या जीवनदायिनी ईरई व झरपट नद्यांच्या विद्रुपीकरणाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चांगलाच गाजत आहे. नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून प्रतिवादी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर आपले अभ्यासपूर्ण शपथपत्र न्यायालयात दाखल केलेले आहे. यामध्ये ईरई व झरपट नदीच्या विद्रुपीकरणास सर्वस्वी वेकोलिच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती जनहित याचिकाकर्ते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शनिवारी येथे दिली.

पद्मापूर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड खाणीची पातळी ही ईरई नदीच्या बरोबरीने असल्याने त्यातील वाळूमिश्रित माती व गाळ ईरई नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे नदीचे रूपांतर नाल्यात होत आहे. भटाळी खाणीमध्ये कोळशाची साठवणूक करतात. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाणी मारणे थांबविले. परिणामी वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. हिंदुस्थान लालपेठ खाणीमुळे ईरई नदीचे पात्र उथळ झाले असून, पावसाळ्यात चंद्रपूर शहरातील पाण्याचा प्रवाह सरळ हाेत नाही. तसेच पद्मापूरपासून लालपेठ खाण ते दुर्गापूरपर्यंत तयार झालेले वेकोलिचे ढिगारे हटविले नाही. यामुळे ही माती थेट नद्यांमध्ये जाते, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाली आहे. यामुळे वेकोलि आता हात वर करू शकत नाही. ईरई नदीतून अर्ध्या शहराला पिण्याचे पाणी मिळते. काठावरील विचोळा, छोटा नागपूर, पडोली, कोसारा, दाताळा व इतर गावांच्या पिण्याच्या पाण्याची नळयोजना आहे. जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा त्याचा फटका पुराच्या रूपाने चंद्रपूर शहराला बसतो. ही बाब अधोरेखित झाली आहे, याकडे नरेश पुगलिया यांनी लक्ष वेधले आहे.

कायमस्वरूपी उपयायोजना करण्याची गरज

ईरई व झरपट नदीवर बंधारा बांधण्याची गरज आहे. दोन्ही नद्यांचे खोलीकरण व्हावे. ईरई नदीवर डाव्या व उजव्या तीरावर संरक्षक भिंत व इतर विकासाची कामे करणे आवश्यक आहे. या दोन्ही नद्यांच्या खोलीकरणाची जबाबदारी वेकोलिवर सोपविण्यात यावी. संरक्षण भिंत व इतर विकासांसाठी लागणारा निधी राज्य शासन देत नसेल तर जिल्हा खनिज विकास निधीतून ही कामे करावी, असेही पुगलिया यांनी म्हटले आहे.

जनआंदोलन उभारण्याची इशारा

पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या नद्यांचा प्रश्न मार्गी लावाला. नागपुरात उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे जनआंदोलन उभे झाले होते. या धर्तीवर चंद्रपुरातील ईरई व झरपट नदीला प्रदूषण व पूरमुक्त करण्यासाठी येथील जनता जनआंदोलन करेल, असा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रriverनदी