शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

चंद्रपूरच्या ईरई व झरपटच्या विद्रुपीकरणाला वेकोलिच जबाबदार

By राजेश भोजेकर | Updated: June 15, 2024 18:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे नागपूर खंडपीठात अखेर शपथपतत्र; नरेश पुगलिया यांची माहिती

चंद्रपूर : चंद्रपूरच्या जीवनदायिनी ईरई व झरपट नद्यांच्या विद्रुपीकरणाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चांगलाच गाजत आहे. नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून प्रतिवादी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर आपले अभ्यासपूर्ण शपथपत्र न्यायालयात दाखल केलेले आहे. यामध्ये ईरई व झरपट नदीच्या विद्रुपीकरणास सर्वस्वी वेकोलिच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती जनहित याचिकाकर्ते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शनिवारी येथे दिली.

पद्मापूर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड खाणीची पातळी ही ईरई नदीच्या बरोबरीने असल्याने त्यातील वाळूमिश्रित माती व गाळ ईरई नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे नदीचे रूपांतर नाल्यात होत आहे. भटाळी खाणीमध्ये कोळशाची साठवणूक करतात. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाणी मारणे थांबविले. परिणामी वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. हिंदुस्थान लालपेठ खाणीमुळे ईरई नदीचे पात्र उथळ झाले असून, पावसाळ्यात चंद्रपूर शहरातील पाण्याचा प्रवाह सरळ हाेत नाही. तसेच पद्मापूरपासून लालपेठ खाण ते दुर्गापूरपर्यंत तयार झालेले वेकोलिचे ढिगारे हटविले नाही. यामुळे ही माती थेट नद्यांमध्ये जाते, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाली आहे. यामुळे वेकोलि आता हात वर करू शकत नाही. ईरई नदीतून अर्ध्या शहराला पिण्याचे पाणी मिळते. काठावरील विचोळा, छोटा नागपूर, पडोली, कोसारा, दाताळा व इतर गावांच्या पिण्याच्या पाण्याची नळयोजना आहे. जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा त्याचा फटका पुराच्या रूपाने चंद्रपूर शहराला बसतो. ही बाब अधोरेखित झाली आहे, याकडे नरेश पुगलिया यांनी लक्ष वेधले आहे.

कायमस्वरूपी उपयायोजना करण्याची गरज

ईरई व झरपट नदीवर बंधारा बांधण्याची गरज आहे. दोन्ही नद्यांचे खोलीकरण व्हावे. ईरई नदीवर डाव्या व उजव्या तीरावर संरक्षक भिंत व इतर विकासाची कामे करणे आवश्यक आहे. या दोन्ही नद्यांच्या खोलीकरणाची जबाबदारी वेकोलिवर सोपविण्यात यावी. संरक्षण भिंत व इतर विकासांसाठी लागणारा निधी राज्य शासन देत नसेल तर जिल्हा खनिज विकास निधीतून ही कामे करावी, असेही पुगलिया यांनी म्हटले आहे.

जनआंदोलन उभारण्याची इशारा

पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या नद्यांचा प्रश्न मार्गी लावाला. नागपुरात उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे जनआंदोलन उभे झाले होते. या धर्तीवर चंद्रपुरातील ईरई व झरपट नदीला प्रदूषण व पूरमुक्त करण्यासाठी येथील जनता जनआंदोलन करेल, असा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रriverनदी