शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

सेल्फीच्या नादात दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू; मित्राला वाचविताना गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 10:35 IST

सुटी घालवण्यासाठी आले होते गावाला

वरोरा (चंद्रपूर) : बाहेर शहरात शिक्षण घेत असताना सुट्या असल्यामुळे पाच मित्र गावाला आले. चारगाव धरणावर जाऊन मौजमजा करायची, या बेताने ते धरणावर गेले. सेल्फी काढताना एकाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरा मित्रही बुडाला. दोघांच्या मृत्यूने वरोऱ्यात शाेककळा पसरली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

आयुष चिडे (१९, रा. बोर्डा, वरोरा), हार्दिक विनायक गुळगाणे (१९, रा. शेगाव) यांच्यासोबत अन्य तीन मित्र गुरुवारी दुपारी चारगाव धरणावर गेले होते. सेल्फी काढताना हार्दिक गुळगाणे याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. मित्राला बुडताना बघून आयुष चिडे हा पोहणे येत नसतानाही पाण्यात उतरला. तो मित्राला आणि स्वत:ला वाचवू शकला नाही. सेल्फीच्या नादाने त्यांच्या मैत्रीचा आणि आयुष्याचा प्रवास संपवला.

या घटनेची माहिती होताच शेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. धरणामध्ये पाणी अधिक असल्याने स्थानिक नावाड्यांच्या मदतीने गळ टाकून दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आले. लगेच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDamधरणDeathमृत्यूwarora-acवरोरा