शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

वीज देयकांची रक्कम वळती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:56 IST

सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांचे बिल थकित ठेवणाऱ्या नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींची रक्कम १४ व्या वित्त आयोगातून परस्पर वीज वितरण कंपनीकडे वळती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देव्याज, दंडात कपात: नगर परिषद आणि जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांचे बिल थकित ठेवणाऱ्या नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींची रक्कम १४ व्या वित्त आयोगातून परस्पर वीज वितरण कंपनीकडे वळती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या रकमेवर व्याज व दंड न आकारता थकित बिलातील उर्वरित ५० टक्के रक्कम सुलभ हप्त्याने देण्याची योजना महावितरणने सुरू केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे.सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांचे बिल न भरणाºया ग्रामपंचायतींची संख्या जिल्ह्यात बरीच आहे. पाणीकर व दिवाबत्ती कर वसूल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वीज वितरण कंपनीचे कोट्यवधी रुपये थकित आहेत. महावितरण कंपनीच्या ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या थकीत बिलाच्या रक्कमांपैकी (दंड व व्याज कमी करुन) ५० टक्के रक्कम वित्त आयोगाच्या अनुदानातून पररस्पर वळते करण्यास जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी प्रारंभी विरोध केला होता. मात्र, नगर विकास विभागाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली नव्हती. त्यामुळे हा तिढा सुटला नव्हता. दरम्यान, मनपा, नगरपालिका, नगरपंचायतींकडून महावितरण कंपनीने वसूल करावी, आवश्यकता वाटल्यास महावितरण कंपनीने सदर रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्ते तयार करून देण्याचा आदेश जारी करण्यात आला. या निर्णयाचा लाभ नगरपरिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांनाही घेता येणार आहे. ५० टक्के रक्कम वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामविकास विभागाने महावितरण कंपनीस थेट अदा करावी. उर्वरीत ५० टक्के रक्कम संबंधित जिल्हा परिषद, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायतींनी महावितरण कंपनीकडे भरावी. त्याकरिता कंपनीकडून वीज बिलाच्या रकमेचे सुलभ हप्ते लवकर तयार केले जाणार आहे. ३१ मार्च २०१८ पूर्वी जीे पथदिवे ग्रामपंचायत भागात आहेत. त्यापुढील वीज देयकाची रक्कम ग्रामविकास विभागाने महावितरण कंपनीकडे शासकीय अनुदान किंवा वित्त आयोगाच्या अनुदानातून भरणा करण्यास मान्यता देण्यात आली. ३१ मार्चनंतरच्या आस्थापित झालेल्या पथदिव्यांच्या देयकांची रक्कम ग्रामपंचायतीकडून महावितरण कंपनीस अदा करावी लागणार आहे. नवीन पथदिव्याकरिता वेगळे मीटर लावून द्यावे, असेही मार्गदर्शक तत्त्वात नमूद करण्यात आले. ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा निधी वितरीत झाला असेल त्यांनी नळ योजनेच्या थकीत बिलांची रक्कम वित्त आयोगाच्या रकमेतून महावितरण कंपनीकडे भरण्यास परवानगी देण्यात आली. नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यांच्या वीज देयकांची रक्कम महावितरणकडे नियमितपणे भरण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे.पाणीपुरवठा, पथदिवे सुरू राहणारजिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींनी स्वत:च्या उत्पन्नात वाढ केली नाही. शासनाच्या विविध योजनांवरच मदार ठेवून गावाचा गाडा हाकत असल्याने वीजबिल भरणा अथवा गावकºयांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून काही प्रमाणात निधी मिळतो. जिल्हा परिषदेनेही योजना सुरू करून निधी देण्याचे जाहीर केले. पण, प्रत्यक्षात अल्प प्रमाणात निधी मिळत असल्याने शेकडो ग्रामपंचायतींची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. पेसाअंतर्गत येणाºया राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील गावांना थेट निधी दिला जात आहे. काही जागरूक पदाधिकारी निधीचा योग्य वापर करीत आहेत. मात्र, अशा ग्रामपंचायतींची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. पेसा गावांचा अपवाद वगळल्यास अन्य ग्रामपंचायतींचे उत्पन्न मर्यादित असल्याने पथदिवे व पाणीपुरवठ्याचे वीज बिल भरणे कठीण झाले. नव्या निर्णयामुळे दोन्ही सेवा सुरू राहण्याची आशा निर्माण झाली आहे.