शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

वीज देयकांची रक्कम वळती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:56 IST

सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांचे बिल थकित ठेवणाऱ्या नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींची रक्कम १४ व्या वित्त आयोगातून परस्पर वीज वितरण कंपनीकडे वळती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देव्याज, दंडात कपात: नगर परिषद आणि जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांचे बिल थकित ठेवणाऱ्या नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींची रक्कम १४ व्या वित्त आयोगातून परस्पर वीज वितरण कंपनीकडे वळती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या रकमेवर व्याज व दंड न आकारता थकित बिलातील उर्वरित ५० टक्के रक्कम सुलभ हप्त्याने देण्याची योजना महावितरणने सुरू केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे.सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांचे बिल न भरणाºया ग्रामपंचायतींची संख्या जिल्ह्यात बरीच आहे. पाणीकर व दिवाबत्ती कर वसूल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वीज वितरण कंपनीचे कोट्यवधी रुपये थकित आहेत. महावितरण कंपनीच्या ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या थकीत बिलाच्या रक्कमांपैकी (दंड व व्याज कमी करुन) ५० टक्के रक्कम वित्त आयोगाच्या अनुदानातून पररस्पर वळते करण्यास जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी प्रारंभी विरोध केला होता. मात्र, नगर विकास विभागाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली नव्हती. त्यामुळे हा तिढा सुटला नव्हता. दरम्यान, मनपा, नगरपालिका, नगरपंचायतींकडून महावितरण कंपनीने वसूल करावी, आवश्यकता वाटल्यास महावितरण कंपनीने सदर रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्ते तयार करून देण्याचा आदेश जारी करण्यात आला. या निर्णयाचा लाभ नगरपरिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांनाही घेता येणार आहे. ५० टक्के रक्कम वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामविकास विभागाने महावितरण कंपनीस थेट अदा करावी. उर्वरीत ५० टक्के रक्कम संबंधित जिल्हा परिषद, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायतींनी महावितरण कंपनीकडे भरावी. त्याकरिता कंपनीकडून वीज बिलाच्या रकमेचे सुलभ हप्ते लवकर तयार केले जाणार आहे. ३१ मार्च २०१८ पूर्वी जीे पथदिवे ग्रामपंचायत भागात आहेत. त्यापुढील वीज देयकाची रक्कम ग्रामविकास विभागाने महावितरण कंपनीकडे शासकीय अनुदान किंवा वित्त आयोगाच्या अनुदानातून भरणा करण्यास मान्यता देण्यात आली. ३१ मार्चनंतरच्या आस्थापित झालेल्या पथदिव्यांच्या देयकांची रक्कम ग्रामपंचायतीकडून महावितरण कंपनीस अदा करावी लागणार आहे. नवीन पथदिव्याकरिता वेगळे मीटर लावून द्यावे, असेही मार्गदर्शक तत्त्वात नमूद करण्यात आले. ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा निधी वितरीत झाला असेल त्यांनी नळ योजनेच्या थकीत बिलांची रक्कम वित्त आयोगाच्या रकमेतून महावितरण कंपनीकडे भरण्यास परवानगी देण्यात आली. नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यांच्या वीज देयकांची रक्कम महावितरणकडे नियमितपणे भरण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे.पाणीपुरवठा, पथदिवे सुरू राहणारजिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींनी स्वत:च्या उत्पन्नात वाढ केली नाही. शासनाच्या विविध योजनांवरच मदार ठेवून गावाचा गाडा हाकत असल्याने वीजबिल भरणा अथवा गावकºयांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून काही प्रमाणात निधी मिळतो. जिल्हा परिषदेनेही योजना सुरू करून निधी देण्याचे जाहीर केले. पण, प्रत्यक्षात अल्प प्रमाणात निधी मिळत असल्याने शेकडो ग्रामपंचायतींची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. पेसाअंतर्गत येणाºया राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील गावांना थेट निधी दिला जात आहे. काही जागरूक पदाधिकारी निधीचा योग्य वापर करीत आहेत. मात्र, अशा ग्रामपंचायतींची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. पेसा गावांचा अपवाद वगळल्यास अन्य ग्रामपंचायतींचे उत्पन्न मर्यादित असल्याने पथदिवे व पाणीपुरवठ्याचे वीज बिल भरणे कठीण झाले. नव्या निर्णयामुळे दोन्ही सेवा सुरू राहण्याची आशा निर्माण झाली आहे.