शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शेतकऱ्यांना शेतीच्या कामात वाघाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:20 IST

राजेश बारसागडे सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील वाढोणा, आलेवाही, ऊश्राळ मेंढा, खरकाडा, आकापूर आदी गावांत नरभक्षक वाघाचा ...

राजेश बारसागडे

सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील वाढोणा, आलेवाही, ऊश्राळ मेंढा, खरकाडा, आकापूर आदी गावांत नरभक्षक वाघाचा हैदोस सुरू असून, दोन गुरख्यांना ठार करून अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, जनावरांना वाघाने फस्त केले आहे. सद्यस्थितीत वाढोणा परिसरातील अनेक गावांत शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत तोंडाला मनुष्याच्या व जनावरांच्या रक्ताचा वास लागलेला नरभक्षक वाघ शेतकऱ्यांच्या रोवणी हंगामात अडसर ठरत आहे.

भीतिपोटी अनेक शेतकरी त्यांच्याच शेताकडे फिरकायलाही तयार नाहीत. दरम्यान, या नरभक्षक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील अनेक गावांतील शेतकरी तथा नागरिकांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आलेवाही बिट कक्ष क्र.७०३ मध्ये येत असलेल्या खरकाडा जंगल परिसरात मंगळवारी रमेश वाघाडे या गुराख्यास वाघाने ठार केले. त्या अगोदर जवळील आकापूर येथील गुराख्यास रात्रीच्या सुमारास वाघाने मारल्याची घटना घडली होती. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या व कित्येक जनावरांना या वाघाने ठार केले आहे. दोन्ही गुराख्यांना व विविध जनावरांना यमसदनी पाठविणारा नरभक्षक हा एकच पट्टेदार वाघ आहे, असे संबंधित गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. वाढोणा-ऊश्राळ मेंढा या गावांच्या मधोमध शेतशिवारांना लागून गोसेखुर्द कालवा गेलेला आहे. कालव्याच्या पाळीवर मोठमोठी झाडे तयार झाल्याने व झुडपी जंगल असल्याने, या परिसरात वाघाची वसाहत आहे, शिवाय रंगी तलावाच्या सभोवताल किरकोळ झुडपी जंगलाचा वेढा आहे आणि या वेढ्यासभोवताल वाढोणा, ऊश्राळ मेंढा, सावरगाव खरकाडा, जीवनापूर आदी गावांतील नागरिकांचे शेत आहेत. रमेश वाघाडेला ज्या परिसरात वाघाने मारले, त्याच परिसरात अर्जुन सोनवाणे रा.खरकाडा, सदाशिव मडावी रा.जीवनापूर, गुलाब कुळमेथे रा. जीवनापूर, मार्कंडी कोमावर रा.वाढोणा, राजू कुळमेथे, उत्तम मेश्राम, रवि सहारे, रामदास निकुरे, सुभाष गजबे यांच्यासह आलेवाही, आकापूर, वाढोणा, खरकाडा, ऊश्राळ मेंढा, जीवनापूर आदी गावांतील अनेक शेतकऱ्यांची शेती आहेत, शिवाय रंगी तलाव शेजारीही ऊश्राळमेंढा व वाढोणा या गावांतील अनेक शेतकऱ्यांचे शेत आहे आणि सभोवताल जंगलाचा वेढा आहे. सद्यस्थितीत शेतीतील रोवणीचा हंगाम जोरात सुरू आहे आणि परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. हा वाघ केव्हाही जंगल परिसरातून शेतात प्रवेश करू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी स्वतःच्या शेतात जायला घाबरत आहेत.

बॉक्स

...आणि वाघ तिच्या मागे धावत आला

सावरगाव येथील एका शेतकऱ्याचे शेत वाढोणा परिसरातील खरकाडालगत जंगल परिसरात आहे. त्याची आई शेतात काम करीत असताना, अचानक वाघ तिच्या दिशेने येताना दिसला. ती इतर महिला रोवणी करत असलेल्या दुसऱ्यांच्या शेताकडे प्रचंड जोरात पळायला लागली. वाघही तिच्यामागे धावत आला. शेवटी ती इतर महिलांजवळ पोहोचली आणि महिलांची सामूहिक आरडाओरड सुरू झाली, तेव्हा कुठे वाघ माघारी परतला. ही घटना गुरुवारी घडली.

कोट

एकाच महिन्यात वाढोणा परिसरात दोन गावांतील दोन गुराख्यांना वाघाने ठार मारले. अनेक शेतकऱ्यांचे शेत खरकाडा जंगल परिसरात आहेत. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी घाबरलो आहोत. शेतात जाणे म्हणजे युद्धात गेल्यासारखे वाटू लागले आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त हवा आहे. मात्र, वनविभागाने अजूनही कुठलीही उपाययोजना केली नाही.

- अर्जुन गोपाला सोनवाने, शेतकरी, खरकाडा.

कोट :

नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतालगतच्या परिसरात वाघाने मागील १५ दिवसांत बराच धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांत भीतीचे सावट पसरले आहे. परिणामी, शेतीची कामे खोळंबली आहेत. वाघाचा कायम बंदोबस्त करण्याबाबत खासदार अशोक नेते यांना कळविले आहे.

- होमदेव मेश्राम, माजी तालुकाध्यक्ष, भाजपा, नागभीड.