शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

जिल्ह्यात वर्षभरात वाघाने घेतला ४० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 15:44 IST

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले असून प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते.

राजेश भोजेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्हा आता वाघांच्या हल्ल्याने हादरला आहे. पहिल्यांदाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात वाघाने हल्ला चढवून वनरक्षक स्वाती ढुमणे यांचा बळी घेतला.

यापाठोपाठ पोंभुर्णा वनपरिक्षेत्रही पहिल्यांदाच वाघाच्या हल्ल्यांनी चर्चेत आले आहे. येथे वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाघाला जेरबंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा वन्यजीव-मानव संघर्षाची ठिणगी पडली आहे.

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले आहे. प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते. ताडोबाच्या कोअरमध्ये वाघाचा हल्ला झाला आणि एका वनरक्षकाला जीव गमवाला लागला. आधीच वनविभागाने दक्षता घेतली असती तर हा हल्ला रोखता आला असता. वाघांच्या क्षेत्रातच वनविभाग गाफील राहत असेल तर अन्य भागात होणारे हल्ले रोखण्यात वनविभाग कितपत सतर्क आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

वनविभाग आणि वाघांचे हल्ले

बल्लारपूर - २चंद्रपूर - ४ भद्रावती - ३ नागभीड - १पोंभूर्णा - २ सावली - ४ शिवणी - १ सिंदेवाही - ४ तळोधी (बा.) - ४मूल बफर - ४चिचपल्ली - ३साउथ ब्रम्हपुरी - ३ताडोबा कोअर - ३पिपर्डा (ता. चिमूर) - १मोहर्ली (बफऱ) - १

माजी वनमंत्र्यांचा वनविभागाला इशारा

पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात अलिकडच्या काळात वाघाने आठ जणांना जखमी केले आहे. तर, दोघांचा बळी घेतला आहे. या भागात पहिल्यांदा वाघाची इतकी दहशत पसरली आहे. हा परिसर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मोडतो. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या क्षेत्रात हे हल्ले होत असल्याने त्यांनी, वाघ त्वरित पकडा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वनविभागाला दिलेला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघDeathमृत्यूwildlifeवन्यजीव