शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जिल्ह्यात वर्षभरात वाघाने घेतला ४० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 15:44 IST

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले असून प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते.

राजेश भोजेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्हा आता वाघांच्या हल्ल्याने हादरला आहे. पहिल्यांदाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात वाघाने हल्ला चढवून वनरक्षक स्वाती ढुमणे यांचा बळी घेतला.

यापाठोपाठ पोंभुर्णा वनपरिक्षेत्रही पहिल्यांदाच वाघाच्या हल्ल्यांनी चर्चेत आले आहे. येथे वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाघाला जेरबंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा वन्यजीव-मानव संघर्षाची ठिणगी पडली आहे.

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले आहे. प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते. ताडोबाच्या कोअरमध्ये वाघाचा हल्ला झाला आणि एका वनरक्षकाला जीव गमवाला लागला. आधीच वनविभागाने दक्षता घेतली असती तर हा हल्ला रोखता आला असता. वाघांच्या क्षेत्रातच वनविभाग गाफील राहत असेल तर अन्य भागात होणारे हल्ले रोखण्यात वनविभाग कितपत सतर्क आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

वनविभाग आणि वाघांचे हल्ले

बल्लारपूर - २चंद्रपूर - ४ भद्रावती - ३ नागभीड - १पोंभूर्णा - २ सावली - ४ शिवणी - १ सिंदेवाही - ४ तळोधी (बा.) - ४मूल बफर - ४चिचपल्ली - ३साउथ ब्रम्हपुरी - ३ताडोबा कोअर - ३पिपर्डा (ता. चिमूर) - १मोहर्ली (बफऱ) - १

माजी वनमंत्र्यांचा वनविभागाला इशारा

पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात अलिकडच्या काळात वाघाने आठ जणांना जखमी केले आहे. तर, दोघांचा बळी घेतला आहे. या भागात पहिल्यांदा वाघाची इतकी दहशत पसरली आहे. हा परिसर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मोडतो. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या क्षेत्रात हे हल्ले होत असल्याने त्यांनी, वाघ त्वरित पकडा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वनविभागाला दिलेला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघDeathमृत्यूwildlifeवन्यजीव