शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात वर्षभरात वाघाने घेतला ४० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 15:44 IST

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले असून प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते.

राजेश भोजेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्हा आता वाघांच्या हल्ल्याने हादरला आहे. पहिल्यांदाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात वाघाने हल्ला चढवून वनरक्षक स्वाती ढुमणे यांचा बळी घेतला.

यापाठोपाठ पोंभुर्णा वनपरिक्षेत्रही पहिल्यांदाच वाघाच्या हल्ल्यांनी चर्चेत आले आहे. येथे वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाघाला जेरबंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा वन्यजीव-मानव संघर्षाची ठिणगी पडली आहे.

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले आहे. प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते. ताडोबाच्या कोअरमध्ये वाघाचा हल्ला झाला आणि एका वनरक्षकाला जीव गमवाला लागला. आधीच वनविभागाने दक्षता घेतली असती तर हा हल्ला रोखता आला असता. वाघांच्या क्षेत्रातच वनविभाग गाफील राहत असेल तर अन्य भागात होणारे हल्ले रोखण्यात वनविभाग कितपत सतर्क आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

वनविभाग आणि वाघांचे हल्ले

बल्लारपूर - २चंद्रपूर - ४ भद्रावती - ३ नागभीड - १पोंभूर्णा - २ सावली - ४ शिवणी - १ सिंदेवाही - ४ तळोधी (बा.) - ४मूल बफर - ४चिचपल्ली - ३साउथ ब्रम्हपुरी - ३ताडोबा कोअर - ३पिपर्डा (ता. चिमूर) - १मोहर्ली (बफऱ) - १

माजी वनमंत्र्यांचा वनविभागाला इशारा

पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात अलिकडच्या काळात वाघाने आठ जणांना जखमी केले आहे. तर, दोघांचा बळी घेतला आहे. या भागात पहिल्यांदा वाघाची इतकी दहशत पसरली आहे. हा परिसर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मोडतो. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या क्षेत्रात हे हल्ले होत असल्याने त्यांनी, वाघ त्वरित पकडा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वनविभागाला दिलेला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघDeathमृत्यूwildlifeवन्यजीव