आरटीईच्या १५०० जागांसाठी तीन हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:25+5:302021-04-03T04:24:25+5:30

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार ...

Three thousand applications for 1500 RTE posts | आरटीईच्या १५०० जागांसाठी तीन हजार अर्ज

आरटीईच्या १५०० जागांसाठी तीन हजार अर्ज

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामाकिंत शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०२१-२०२२ या सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील १९६ शाळांमधील १५७१ जागेच्या प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. या जागेसाठी ३०८२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना शहरातील नामांकित शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

बॉक्स

अर्ज करण्यासाठी वाढली होती मुदत

आरटीईतर्फे नामांकित शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३ मार्च ते २१ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, ११ ते १५ मार्च या कालावधीत ओटीपीची तांत्रिक अडचण आल्यामुळे पालकांना अर्ज करता आला नव्हते. त्यामुळे मुदतवाढ देवून ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. जिल्ह्याभरात ३०८२ जणांनी अर्ज केले.

बॉक्स

मागील वर्षी जागा रिक्त

सन २००९ पासून बालकांना मोफत प्रवेश दिल्या जात आहे. यासाठी हजारो पालक आपल्या पाल्यांचा अर्ज सादर करतात. मात्र शाळाच्या विविध अटी लादत असल्यामुळे अनेकांचा प्रवेश होत नाही. तर अनेक शाळा प्रवेश निश्चित होऊन बालकाला शाळेत प्रवेश देत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक पदे रिक्त राहतात. परिणामी शासनाच्या मुख्य उद्देशालाचा हरताळ फासल्या जात आहे. अशा शाळांवर कारवाई करणे, गरजेचे आहे.

बॉक्स

आता लक्ष लॉटरी

३० मार्चला अर्ज करण्याची मुदत संपली. १५७१ जागांसाठी ३०८२ जणांनी अर्ज केले. एप्रिल महिन्यात लॉटरीद्वारे सोडत काढण्यात येणार आहे. तेव्हाच प्रवेश निश्चित होणार आहे. तसा संदेश पालकांना पाठविण्यात येत असतो.

कोट

तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही

शासनाच्या या योजनेतून मुलाला नामांकित शाळेत प्रवेश मिळाला तर बरे होईल. संपूर्ण कागदपत्राच्या आधारे अर्ज केला आहे. नंबर लागला नाही. तर शहरातील मोठ्या नामांकित शाळेत शिकवण्याचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.

- राजकुमार मेश्राम, चंद्रपूर

-------

शहरातील नामांकित शाळेतील शुल्क मोठ्या प्रमाणात आहे. ते भरणे कठीण आहे. आरटीई योजनेतून प्रवेश मिळाल्यास मुलाला मोठ्या व नामांकित शाळेत शिकविण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

- अमित गोंगले, चंद्रपूर

Web Title: Three thousand applications for 1500 RTE posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.