शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:22 IST

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. तुंबलेल्या नाल्या, साचलेले पाणी, रस्त्यावरील सांडपाणी, यामुळे मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घराघरात डासांचा शिरकाव झाला असल्याने चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देडेंग्यूचीही लागण होण्याची शक्यता : रुग्णालयात हिवतापाचे रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. तुंबलेल्या नाल्या, साचलेले पाणी, रस्त्यावरील सांडपाणी, यामुळे मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घराघरात डासांचा शिरकाव झाला असल्याने चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. याशिवाय ताप, मलेरिया यासारख्या रुग्णातही वाढ झाली आहे. सावली शहरात दोन दिवसांपूर्वी दोन डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर चंद्रपुरातही डेंग्यूसारख्या तापाचे रुग्ण वाढविण्याची शक्यता आहे.जुलै महिन्यात चंद्रपुरात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. मागील सात दिवसांपासून दररोज पावसाची रिपरिप सुरू होती. या सात दिवसात सूर्याचेही दर्शन झाले नाही. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. काही प्रभागात तर सांडपाणीही रस्त्यावर वाहत असल्याने तिथे डबके साचले आहे. प्लास्टिक बंदी असली तर चंद्रपूरच्या अनेक सांडपाणी वाहून नेणाºया नाल्यांमध्ये प्लास्टिक तुंबून पाणी वाहणे बंद झाले आहे. या प्रकारामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून चंद्रपुरातील सर्वच प्रभागात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रत्येक घरी डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.अष्टभूजा प्रभाग, जगन्नाथ बाबा नगर परिसर, नगिनाबाग, वडगाव प्रभाग, दे.गो. तुकूम प्रभाग, डॉ. आंबेडकर प्रभाग, गोपालपुरी परिसर, पठाणपुरा प्रभाग, इंदिरानगर प्रभाग, बंगाली कॅम्प प्रभाग आदी प्रभागात तर डासांचा प्रकोप झाला आहे. डासांची उत्पत्ती सातत्याने वाढत असल्याने ताप, मलेरिया यासारख्या रुग्णांत वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातही हिवतापाचे रुग्ण वाढल्याचे तेथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. व्ही. मुनघाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याशिवाय खासगी रुग्णालयातही मलेरियाच्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिका व आरोग्य विभागाने आताच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा डेंग्यूच्या रुग्णातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डेंग्यूची लक्षणेताप येतो, मळमळ वाटते, उलटी होते, डोके दुखते, शरिरातील ज्वार्इंडमध्ये दुखणे सुरू होते. प्रारंभी रुग्णांमध्ये आढळलेली ही लक्षणे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णात सारखी आढळतात. मात्र डेग्यू असला तर थंडी वाजत नाही. मलेरियात मात्र थंडी वाजून ताप येतो. यावेळी रुग्णांची रक्तचाचणी करून उपचार केला नाही तर गंभीर लक्षणे आढळतात. त्यात रक्तातील पांढºया पेशी कमी होतात, रक्तदाब कमी होतो, अंग थंड पडते, रुग्ण बेशुध्द होतो, त्वतेच्या आत रक्तस्त्राव होतो, अंगावर लाल चट्टे पडतात.मनपाने मोहीम राबवावीसांडपाणी व शहरातील घाण पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यूचीही लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. महापालिकेने हिवताप विभागाला सोबत घेऊन शहरात डास निर्मूलनासाठी किंवा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.असा करावा उपचारसध्या जिल्ह्यात साथ सुरू असल्याने डेंग्यूचे प्राथमिक लक्षणे आढळले की ताप येण्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच रक्ताची चाचणी करून घ्यावी. त्यानंतर घरी आराम आणि नियमित औषधोपचार घ्यावा. बेशुध्द होणे व पांढऱ्या पेशी कमी होणे अशी गंभीर लक्षणे दिसली की मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखालीच उपचार घ्यावा लागतो. रुग्णांच्या रक्तात पांढऱ्या पेशी टाकाव्या लागतात व नियमित रक्त द्यावे लागते.डेंग्यूचा डास दिवसा चावतोमलेरिया पसरविणारे डास रात्री चावा घेतात. मात्र डेंग्यूचे डास नेहमी सकाळी व दिवसाच मनुष्याला चावतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळ होण्याआधी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.या आहेत प्रतिबंधात्मक उपाययोजनासर्वांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा (भांडे, गंगाळ, टाके रिकामे करून कोरडे ठेवावे)आजुबाजुच्या परिसरात टायर, कप यासारख्या वस्तूंमध्ये पाणी साचून असेल तर फेकून वस्तू कोरड्या कराव्यासाचलेल्या पाण्यात ‘टेमीफास्ट’ या औषधांची फवारणी करावी.साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावे. (गप्पी मासे डासांच्या अळ्यांना खाऊन टाकतात व डासांची उत्पत्ती होत नाही)साथीच्या दिवसात नेहमी मच्छरदाणीचा वापर करावा.मागील काही दिवसात मलेरियाचे रुग्ण वाढले आहे. या दिवसात या आजाराचे रुग्ण अधिक येतात. मात्र अद्याप डेंग्यूचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.-डॉ. यू. व्ही. मुनघाटे,निवासी वैद्यकीय अधिकारी,जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.