शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

राजुरा तालुक्यात ८१ गावात विलगीकरण कक्षच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:26 IST

राजुरा : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्यूचा आलेख वाढत चालला आहे. अनेक कोरोना बधितांचा बेड व ...

राजुरा : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्यूचा आलेख वाढत चालला आहे. अनेक कोरोना बधितांचा बेड व प्राणवायूअभावी मृत्यू झाल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. मुळात रुग्ण संख्या वाढीला 'ब्रेक' लावण्यासाठी ग्राम स्तरावर विलगीकरण कक्षाची गरज असते. पण, याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाबधितांना मोकळे रान मिळत आहे. गावात 'मोकाट' फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. राजुरा तालुक्यात अजूनही ८१ गावात विलगीकरण कक्षाची सोय नाही.

परिणामी पॉझिटिव्ह रुग्णांचा बेजबाबदारपणा संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात चांगलाच हाहाकार माजवला आहे. कोरोनाची पहिली लाट शहरापुरती मर्यादित होती. त्यामुळे ग्रामीण जनता बिनधास्त होती. पण, दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याने जनतेत भीतीने घर निर्माण केले आहे. त्यातच काही गावातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ चांगलेच धास्तावल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या काही गावात तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांत कोरोना चाचणी केली जात आहे. यात बहुतेक तापाचे रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. पण, या कोरोना बाधितांची कुठे व्यवस्था करायची, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात ६५ ग्रामपंचायती असून, यात १११ गावांचा समावेश आहे. पण, मोजक्याच गावात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. आजघडीला ३० गावांमध्ये कक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे आणि या केंद्रात गावातील कोरोना रुग्ण राहत आहेत. पण, उर्वरित ८१ गावात विलगीकरण कक्ष नसल्याने या गाव परिसरातील रुग्ण हे घरी आयसोलेट होऊन गावात मोकाट फिरत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांना मोकळे रान मिळत असल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. कोरोना बधितांच्या मोकाट फिरण्यामुळे गावात संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन गावात पर्यायी व्यवस्था तयार करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.