शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

...तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी, पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांत चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे जुन्या पाणीपुरवठा योजनेवर ...

चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांत चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे जुन्या पाणीपुरवठा योजनेवर ताण पडत आहे. त्यामुळे आता नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेला आणखी किती दिवस लागणार, याबाबत संभ्रम आहे. शहरातील सर्व भागांत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी आपल्या सोयीनुसार बोअरवेल खोदले आहेत. यासाठी पाणी लागत नसल्याने ३०० ते साडेतीनशे फुटांपर्यंतही काहींनी बोअरवेल मारून भूगर्भातील पाणी उपसा सुरू केला आहे. बोअरवेल मारताना महापालिका तसेच भूजल विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र मनपा तसेच संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कुठलीही परवानगी न घेता शहरात वाट्टेल तिथे बोअरवेल मारले जात आहेत. सिमेंटीकरणामुळे पाणी मुरत नाही तर दुसरीकडे उपसा मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे भविष्यात चंद्रपूर शहरात पाण्यासाठी विदारक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून पेट्रोलपेक्षाही पाणी महाई होणार आहे.

बाॅक्स

कोणीही यावे अन्‌ बोअरवेल खोदावे?

चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक जण घर बांधून स्वत: पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे परवानगी न घेता बोअरवेल मारत आहेत. विशेष म्हणजे, घर बांधण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली जात असली तरी बोअरवेल मारताना कुठलीही परवानगी घेतलीच जात नसल्याचे चित्र आहे. याकडे अधिकाऱ्यांसह पदाधिकारीही दुर्लक्ष करीत आहेत.

बाॅक्स

रेनवाॅटर हार्व्हेस्टिंग कागदावरच

पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी रेनवाॅटर हार्व्हेस्टिंग करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने योजनाही जाहीर केली आहे. मात्र योग्य नियोजन न केल्यामुळे नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालयामध्ये रेनवाॅटर हार्व्हेस्टिंग अनिवार्य असतानाही शहरातील अनेक कार्यालयात ही सोयच नसल्याचे बघायला मिळत आहे.

बाॅक्स

दिवसाआड पाणीपुरवठा

महापालिकेद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र दिवसाआड आणि अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिक आपल्या सोयीनुसार बोअरवेल, ट्यूबवेल तसेच विहिरीद्वारे पाण्याची सोय करीत आहेत. परिणामी भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे.

कोट

भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी कमी होत आहे. याचा परिणामी येत्या काही वर्षांतच जाणवेल. प्रत्येकाने रेनवाॅटर हार्व्हेस्टिंग करणे गरजेचे आहे. महापालिकेनेही यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे;. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात पाणी समस्या उग्र रूप धारण करण्यापूर्वी वेळीच नियोजन करणे अत्यावश्यक आहे.

-संजय वैद्य

जिल्हा संयोजक

जलबिरादरी

बाॅक्स

दिवसाआड नळाद्वारे पाणी

५५४०

शहरातील एकूण बोअरवेल

३,७५,०००

शहराची एकूण लोकसंख्या

२५०

लिटर प्रतिकुटुंब पाणी