शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

जलजीवन मिशनचेही काम दीड वर्षापासून अर्धवट; नागरिकांमध्ये तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 14:08 IST

जुनी नळयोजना ठप्प : नागरिकांत तीव्र संताप, काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

दीपक साबने लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : दोन वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत ग्रामपंचायत येल्लापूर येथे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा अनियमित का होईना पण सुरू होता. सर्वांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याच्या उदात्त हेतूने शासनाच्या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत तालुक्यातील येल्लापूर येथे काम मंजूर झाले व कामास सुरुवातही करण्यात आली. तेव्हा अस्तित्वात असलेली गावातील जुनी जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत नळयोजनेसाठी केलेली पाइपलाइनही उद्ध्वस्त केली. आता नवीन जलजीवन मिशनचे कामही जवळपास दीड वर्षापासून ठप्प आहे. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

परिणामी गावातील नागरिकांसह दिव्यांग, वयोवृद्ध, दीर्घ आजार असणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. ग्रामपंचायत येल्लापूर येथे जवळपास अडीच हजार लोकसंख्या आहे. येथे पाच हातपंप, सहा विहिरी आहेत. सध्या जवळपास सर्वच पाण्याच्या स्रोतात पाणी मुबलक आहे. जिल्हा परिषद शाळेजवळील व गावालगत असलेली पिण्याच्या पाण्याची विहीर ढासळून दोन वर्षांचा कालावधी लोटला, तरी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. या विहिरीवरून पाणी भरताना दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. सध्या येल्लापूरवासीय तलावाखाली असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवरून बैलबंडी, ऑटो, सायकल व दुचाकीच्या साहाय्याने पाणी आणतात. ज्यांच्याकडे वरील साधने नाहीत, त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते व जे दूरवर पायपीट करू शकत नाही, त्यांना एक माठ पाण्याचे १५० ते २०० रुपये मोजावे लागतात. 

विशेष म्हणजे, गावात अशी काही कुटुंबे आहेत, त्यांच्या घरी पाणी आणण्यासाठी कोणीही नाहीत. दिव्यांग व्यक्तींनाही त्यांच्या तीनचाकी सायकलवर पाणी आणण्याची वेळ आली आहे. सुपारी आत्राम हा दिव्यांग पाणी आणण्यासाठी दररोज आपल्या नातेवाइकांना सोबत घेऊन आपल्या तीन चाकी सायकलवरून पाणी आणतो. दीड वर्षापासून अर्धवट असलेल्या जलजीवनच्या कामामुळे वरील त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. 

शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती गावात सर्व शेतकरीवर्ग असल्याने सध्या शेतकरी कुटुंबातील सर्वच सदस्य शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सकाळी उठून पाणी आणण्यासाठी जास्तीचा वेळ वाया जातो. याचा परिणाम शेती कामावर होताना दिसून येत आहे.

"जलजीवनचे अर्धवट काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, या गंभीर समस्येची प्रशासनाने दखल घेतली नाही. संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन दीड वर्षापासून अर्धवट राहिलेल्या जलजीवन मिशनचे काम त्वरित पूर्ण करावे आणि गावातील नागरिकांना नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करावा. अन्यथा नाइलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल." - प्रशांत कांबळे, सदस्य ग्रामपंचायत तथा सामाजिक कार्यकर्ता.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाईchandrapur-acचंद्रपूर