शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन मिशनचेही काम दीड वर्षापासून अर्धवट; नागरिकांमध्ये तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 14:08 IST

जुनी नळयोजना ठप्प : नागरिकांत तीव्र संताप, काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

दीपक साबने लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : दोन वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत ग्रामपंचायत येल्लापूर येथे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा अनियमित का होईना पण सुरू होता. सर्वांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याच्या उदात्त हेतूने शासनाच्या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत तालुक्यातील येल्लापूर येथे काम मंजूर झाले व कामास सुरुवातही करण्यात आली. तेव्हा अस्तित्वात असलेली गावातील जुनी जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत नळयोजनेसाठी केलेली पाइपलाइनही उद्ध्वस्त केली. आता नवीन जलजीवन मिशनचे कामही जवळपास दीड वर्षापासून ठप्प आहे. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

परिणामी गावातील नागरिकांसह दिव्यांग, वयोवृद्ध, दीर्घ आजार असणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. ग्रामपंचायत येल्लापूर येथे जवळपास अडीच हजार लोकसंख्या आहे. येथे पाच हातपंप, सहा विहिरी आहेत. सध्या जवळपास सर्वच पाण्याच्या स्रोतात पाणी मुबलक आहे. जिल्हा परिषद शाळेजवळील व गावालगत असलेली पिण्याच्या पाण्याची विहीर ढासळून दोन वर्षांचा कालावधी लोटला, तरी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. या विहिरीवरून पाणी भरताना दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. सध्या येल्लापूरवासीय तलावाखाली असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवरून बैलबंडी, ऑटो, सायकल व दुचाकीच्या साहाय्याने पाणी आणतात. ज्यांच्याकडे वरील साधने नाहीत, त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते व जे दूरवर पायपीट करू शकत नाही, त्यांना एक माठ पाण्याचे १५० ते २०० रुपये मोजावे लागतात. 

विशेष म्हणजे, गावात अशी काही कुटुंबे आहेत, त्यांच्या घरी पाणी आणण्यासाठी कोणीही नाहीत. दिव्यांग व्यक्तींनाही त्यांच्या तीनचाकी सायकलवर पाणी आणण्याची वेळ आली आहे. सुपारी आत्राम हा दिव्यांग पाणी आणण्यासाठी दररोज आपल्या नातेवाइकांना सोबत घेऊन आपल्या तीन चाकी सायकलवरून पाणी आणतो. दीड वर्षापासून अर्धवट असलेल्या जलजीवनच्या कामामुळे वरील त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. 

शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती गावात सर्व शेतकरीवर्ग असल्याने सध्या शेतकरी कुटुंबातील सर्वच सदस्य शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सकाळी उठून पाणी आणण्यासाठी जास्तीचा वेळ वाया जातो. याचा परिणाम शेती कामावर होताना दिसून येत आहे.

"जलजीवनचे अर्धवट काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, या गंभीर समस्येची प्रशासनाने दखल घेतली नाही. संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन दीड वर्षापासून अर्धवट राहिलेल्या जलजीवन मिशनचे काम त्वरित पूर्ण करावे आणि गावातील नागरिकांना नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करावा. अन्यथा नाइलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल." - प्रशांत कांबळे, सदस्य ग्रामपंचायत तथा सामाजिक कार्यकर्ता.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाईchandrapur-acचंद्रपूर