शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार ! काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 14:12 IST

Chandrapur : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार व्हावा, शिक्षक परिषदेचे सरकारकडे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इयत्ता १ ते ८ वीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठीशिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. दोन वर्षांच्या आत टीईटी पास न झाल्यास नोकरीवर गदा येणार असल्याने हजारो शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानंतर राज्यभरातील शिक्षकांत संभ्रम पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने सरकारकडे थेट सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी साकडे घातले असून संघटनेकडून राज्यभरातील तालुका व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदने देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ?

१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार इयत्ता १ ते ८ शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे. सेवानिवृत्तीला पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेले शिक्षक या नियमातून वगळले गेले आहेत. मात्र इतर सर्वांनी टीईटी न उत्तीर्ण झाल्यास त्यांची सेवा संपुष्टात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे.

पदोन्नतीसाठीही टीईटी बंधनकारक

नवीन निर्णयानुसार, केवळ सेवा टिकवण्यासाठीच नाही, तर पदोन्नतीसाठीही टीईटी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. काम करत असतानाही आता पात्रता पुन्हा सिद्ध करावी लागणार? असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत.

राज्यभर निवेदन मोहीम सुरू

टीईटीसंदर्भात राज्यभरात तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदने देण्यात येत आहेत. ही मोहीम राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर, कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्यवाह संजय पगार, अमोल देठे, बाबुराव गाडेकर, विजया लक्ष्मी पुरेड्डीवार, भरत मडके, राजेंद्र नांद्रे, दिलीप पाटील, सुनील केणे, राजेंद्र जायभाये आदींच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.

फेरविचार करा!

राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेने शासनाला साकडे घातले आहे. 'कायद्यानुसार शासनाने पूर्वीच विविध आदेश निर्गमित केले आहेत.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून, लाखो शिक्षकांचे भवितव्य वाचवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरतीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय