शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार ! काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 14:12 IST

Chandrapur : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार व्हावा, शिक्षक परिषदेचे सरकारकडे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इयत्ता १ ते ८ वीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठीशिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. दोन वर्षांच्या आत टीईटी पास न झाल्यास नोकरीवर गदा येणार असल्याने हजारो शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानंतर राज्यभरातील शिक्षकांत संभ्रम पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने सरकारकडे थेट सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी साकडे घातले असून संघटनेकडून राज्यभरातील तालुका व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदने देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ?

१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार इयत्ता १ ते ८ शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे. सेवानिवृत्तीला पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेले शिक्षक या नियमातून वगळले गेले आहेत. मात्र इतर सर्वांनी टीईटी न उत्तीर्ण झाल्यास त्यांची सेवा संपुष्टात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे.

पदोन्नतीसाठीही टीईटी बंधनकारक

नवीन निर्णयानुसार, केवळ सेवा टिकवण्यासाठीच नाही, तर पदोन्नतीसाठीही टीईटी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. काम करत असतानाही आता पात्रता पुन्हा सिद्ध करावी लागणार? असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत.

राज्यभर निवेदन मोहीम सुरू

टीईटीसंदर्भात राज्यभरात तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदने देण्यात येत आहेत. ही मोहीम राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर, कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्यवाह संजय पगार, अमोल देठे, बाबुराव गाडेकर, विजया लक्ष्मी पुरेड्डीवार, भरत मडके, राजेंद्र नांद्रे, दिलीप पाटील, सुनील केणे, राजेंद्र जायभाये आदींच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.

फेरविचार करा!

राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेने शासनाला साकडे घातले आहे. 'कायद्यानुसार शासनाने पूर्वीच विविध आदेश निर्गमित केले आहेत.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून, लाखो शिक्षकांचे भवितव्य वाचवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरतीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय