शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांच्या दरात दहा टक्यांनी वाढ; शेतकऱ्यांची अर्थकोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:53 IST

आर्थिक तडजोडीत गुंतले शेतकरी : प्रोत्साहन भत्ताचा अद्याप पत्ता नाही

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकरी बि-बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. काही प्रमाणात पाऊस झाल्याने नांगरणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र यावर्षी मागील वर्षीपेक्षा बियाण्यांच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे खरीप पिकाबाबतचे नियोजन भरकटलेले असून, शेतकऱ्यांची अर्थकोंडी होताना दिसत आहे. परिणामी शेतकरी हतबल झाले आहेत.

कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. अशातच शेतीकरिता लागणारा उत्पादन खर्च वाढल्याने व अपेक्षित शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा गुंता वाढत असून, शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. मागील वर्षी धनाचे भाव तीन हजारांवर गेले होते. मात्र, यंदा दोन हजार ७०० ते दोन हजार ८०० वर भाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. असे असताना यंदा शासनाने हमीभावावर केवळ ६९ रुपयांची वाढ केली, तर बियाण्यांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने शासनाचे धोरणच शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

मजूरच्या दरातही वाढखरीप हंगामाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांनी बँक, महिला बचत गटाच्या माध्यमातून पैशांची तजवीज करताना दिसत आहेत. मात्र, बियाणे व किटकनाशकांच्या वाढलेल्या किमती, तर मजुरांचीही मजुरीदर दुपटीने वाढल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. त्यातच मजूरही मिळत नसल्याचे अडचण येत आहे.

केंद्रचालकांची डोकेदुखीकृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत बियाणे वितरण, विक्री करण्यासाठी साथी पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. शासनाच्या वतीने विविध योजनातंर्गत अनुदानावर वितरित केल्या जाणाऱ्या बियाण्यांची नोंद साथी पोर्टलवर ठेवावी लागणार आहे. त्यामुळे अनुदानावर बियाणे वितरित करणाऱ्या उत्पादक संस्था, सहकारी संस्था, तसेच कृषी सेवा केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली आहे.

बियाणे खरेदीतही फसगतमहागड्या व नामांकित कंपनीच्या बियाणे परवानाधारक कृषी केंद्रातून घेतल्यानंतरही उत्पादन निघाल्यावर आपली फसगत झाल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येतात, तेव्हा शेतकऱ्यांना मनस्ताप शिवाय काहीही मिळत नाही. मागील वर्षी मूल तालुक्यात बियाण्यात फसगत झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती, हे विशेष.

"मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धानाला भाव मिळाला नाही, तर यावर्षी शासनाने बियाण्यांच्या किमती वाढविल्याने व मजुरांची मजुरीही वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांकडे शेती शिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेती कसावी लागत असल्याचे चित्र आहे."- सूरज ठाकूर, युवा शेतकरी, भेजगाव

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीFarmerशेतकरी