शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

बियाणांच्या दरात दहा टक्यांनी वाढ; शेतकऱ्यांची अर्थकोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:53 IST

आर्थिक तडजोडीत गुंतले शेतकरी : प्रोत्साहन भत्ताचा अद्याप पत्ता नाही

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकरी बि-बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. काही प्रमाणात पाऊस झाल्याने नांगरणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र यावर्षी मागील वर्षीपेक्षा बियाण्यांच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे खरीप पिकाबाबतचे नियोजन भरकटलेले असून, शेतकऱ्यांची अर्थकोंडी होताना दिसत आहे. परिणामी शेतकरी हतबल झाले आहेत.

कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. अशातच शेतीकरिता लागणारा उत्पादन खर्च वाढल्याने व अपेक्षित शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा गुंता वाढत असून, शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. मागील वर्षी धनाचे भाव तीन हजारांवर गेले होते. मात्र, यंदा दोन हजार ७०० ते दोन हजार ८०० वर भाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. असे असताना यंदा शासनाने हमीभावावर केवळ ६९ रुपयांची वाढ केली, तर बियाण्यांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने शासनाचे धोरणच शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

मजूरच्या दरातही वाढखरीप हंगामाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांनी बँक, महिला बचत गटाच्या माध्यमातून पैशांची तजवीज करताना दिसत आहेत. मात्र, बियाणे व किटकनाशकांच्या वाढलेल्या किमती, तर मजुरांचीही मजुरीदर दुपटीने वाढल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. त्यातच मजूरही मिळत नसल्याचे अडचण येत आहे.

केंद्रचालकांची डोकेदुखीकृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत बियाणे वितरण, विक्री करण्यासाठी साथी पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. शासनाच्या वतीने विविध योजनातंर्गत अनुदानावर वितरित केल्या जाणाऱ्या बियाण्यांची नोंद साथी पोर्टलवर ठेवावी लागणार आहे. त्यामुळे अनुदानावर बियाणे वितरित करणाऱ्या उत्पादक संस्था, सहकारी संस्था, तसेच कृषी सेवा केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली आहे.

बियाणे खरेदीतही फसगतमहागड्या व नामांकित कंपनीच्या बियाणे परवानाधारक कृषी केंद्रातून घेतल्यानंतरही उत्पादन निघाल्यावर आपली फसगत झाल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येतात, तेव्हा शेतकऱ्यांना मनस्ताप शिवाय काहीही मिळत नाही. मागील वर्षी मूल तालुक्यात बियाण्यात फसगत झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती, हे विशेष.

"मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धानाला भाव मिळाला नाही, तर यावर्षी शासनाने बियाण्यांच्या किमती वाढविल्याने व मजुरांची मजुरीही वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांकडे शेती शिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेती कसावी लागत असल्याचे चित्र आहे."- सूरज ठाकूर, युवा शेतकरी, भेजगाव

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीFarmerशेतकरी