शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना करावी लागणार कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:26 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. दरम्यान, दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. दरम्यान, दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना पडली आहे, तर दुसरीकडे शिक्षकांनाही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यावर्षी प्रथमच ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. त्यानंतर कोरोना संदर्भातील नियम पाळून वर्ग सुरू करण्यात आले. दहावी आणि बारावीचे वर्ष जीवनातील अत्यंत्य महत्त्वाचे असल्यामुळे विद्यार्थ्यी अधिक गंभीर होतात. एवढेच नाही तर शिक्षकही अतिरिक्त क्लास घेऊन त्यांच्या ज्ञानामध्ये सतत भर पाडतात. विशेष म्हणजे, विद्यार्थी आठ ते नऊ महिने कठोर मेहनत घेतात. मात्र, यावर्षी पाहिजे तशी शैक्षणिक वर्षाची सुरुवातच झाली नसल्याने आता विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय थोडाफार कठीण वाटणारा आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. सोबतच विज्ञानच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यावर्षी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी मोबाईल रेंज मिळत नसल्यामुळे ते यापासून वंचित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे यामध्ये मोठे नुकसान होत आहे.

बा्ॅक्स

दहावीचा अभ्यासक्रम

कोरोना संकटामुळे अभ्यासक्रम २५ टक्के कमी केला आहे. मात्र, उर्वरित अभ्यासक्रमही पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. विज्ञान, गणित या विषयांसाठी विद्यार्थ्यांना शाळा, कालेजमध्ये जाणे अत्यावश्यक आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय समजून घेणे अवघड जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षकांकडून शिकविणे महत्त्वाचे आहे. आता परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना कसरत करावी लागणार आहे.

बारावीचा अभ्यासक्रम

दरवर्षी बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. यावर्षी २५ टक्के अभ्यासक्रम कपात करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात वर्गात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अत्यल्प कालावधी शिल्लक आहे. ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, असा प्रश्न सध्या पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे.

----

कोट

कोरोना संकटामुळे यावर्षी २५ टक्के अभ्यासक्रम कपात करण्यात आला असला, तरी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

आता नियमित वर्ग सुरू झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अडचण नाही. मात्र, तीनच तासिका घेण्याचे बंधन असल्यामुळे शिक्षकांना शिकविण्यासाठी वेळ पुरत नाही.

- प्राचार्य नरेंद्र बोबडे

अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघटना, चंद्रपूर

कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वांचेच नुकसान झाले आहे. मात्र, यातूनही मार्ग काढणे गरजेचे आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे, तर शिक्षकांनाही कमी वेळेत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजावून सांगावा लागणार आहे. कमी वेळेत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

- धनंजय चाफले

प्राचार्य डायट

कोट

शाळा नियमित आणि पूर्णवेळ सुरू झाली तर अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो. सध्या तीनच तास शाळा सुरू आहे. त्यामुळे यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण होणार की नाही याची चिंता आहे. शिक्षक पूर्णपणे सहकार्य करीत आहेत.

दहावीचा विद्यार्थी

आता नियमित काॅलेज सुरू करून अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये अनेक अडचणी येत आहेत. काॅलेजमध्येही तीनच तास होत असल्यामुळे अतिरिक्त क्लास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.