आदिवासी उपाय योजनेतील शिक्षक पाच महिन्यांपासून पगाराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:16+5:302020-12-14T04:39:16+5:30
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्राअंतर्गत पाच विद्यालयातील शिक्षकांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना ...

आदिवासी उपाय योजनेतील शिक्षक पाच महिन्यांपासून पगाराविना
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्राअंतर्गत पाच विद्यालयातील शिक्षकांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. .
चंद्रपूर जिल्ह्यातील ना. ज. राऊत विद्यालय अडेगाव (देश ) ता. चिमूर, सरस्वती विद्यालय कोजबी, ता. नागभीड, प्रियदर्शिनी विद्यालय साखरी, ता. राजुरा, चेतना माध्यमिक विद्यालय मजरा ता. वरोरा, सावित्रीबाई फुले विद्यालय मासळ (बु) ता. चिमूर शाळामधील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी वेतन अधीक्षक बोदाडकर यांच्याशी संपर्क साधून पाचही शाळेचे त्वरीत वेतन करण्याचा आदेश दिला. यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भाष्कर बावणकर, संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, जिल्हा मार्गदर्शक किशोर हजारे, मुख्याध्यापक अडेगाव (देश), मुख्यध्यापक सुखदेव रामटेके, मुख्यध्यापिका ठवरे, मुख्यध्यापक बोकडे, मुख्यध्यापक थिपे आदी उपस्थित होते .