शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

तथागत गौतम बुद्धांचा एक शांतीदूत हरपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:21 IST

साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म तब्बल अडीच हजार वर्षांनंतरही जगातील अनेक देशात मोठ्या दिमाखाने जिवंत आहे. त्या धर्माचा प्रचार व पसार करण्याचे काम भन्तेजीच्या माध्यमातून सुरू आहे.

ठळक मुद्देभन्ते राहुल बोधी यांच्यावर अंत्यसंस्कार : अधिष्ठान करताना भंन्तेवर बिबट्याच्या हल्ला

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म तब्बल अडीच हजार वर्षांनंतरही जगातील अनेक देशात मोठ्या दिमाखाने जिवंत आहे. त्या धर्माचा प्रचार व पसार करण्याचे काम भन्तेजीच्या माध्यमातून सुरू आहे. हाच प्रचार करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी चिवर धारण केलेल्या व तथागत गौतम बुद्धांच्या विचाराची पेरणी करण्यासाठी निघालेल्या भन्ते राहुलबोधी यांचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या संघरामगिरी येथे ४० दिवसांचे अधिष्ठान करीत असताना मैत्री भावना विसरलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शांतीदूताचा करूण अंत झाला.स्वतंत्र लढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिमूरक्रांती नगरी शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या सोनेगाव वन येथे महादेव वाळके यांच्या परिवारात राहुल यांचा जन्म झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण गावात तर पुढील शिक्षण ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी, पदवीपर्यंतचे शिक्षण चिमूरमध्ये झाले. शिक्षणानंतर राहुलने परिवाराला हातभार लावण्यासाठी गावात छोटे किराणा दुकान सुरू केले. मात्र त्यांना बुद्ध धम्माविषयीची तळमळ स्वस्थ्य बसू देत नव्हती. याचदरम्यान संघारामगीरी येथील काही भन्तेजीच्या संपर्कात आल्याने त्याने ध्यान-साधना सुरु केली. तसेच अनेक युवकांनाही धम्म शिबिर करायला लावले. दरम्यान राहुल तथागत गौतम बुद्धांच्या विचाराने प्रेरित झाल्याने तीन वर्षाअगोदर बौद्ध धम्माचे २२७ नियम ग्रहण करून विधिवत सदस्य झाले. तसचे बौद्धगया येथे धम्माची उपसंपदा घेतली. त्यामुळे राहुल हा भंते राहुलबोधी मध्ये परिवर्तीत झाले. यादरम्यान त्यांनी अरुणाचल प्रदेश, बांग्लादेश येथून बौद्ध धम्माचे ज्ञान प्राप्त केले.शिवणी येथे वर्षावास संपवून १३ धुतानग अधिष्ठानांपैकी दोन अधिष्ठान पूर्ण करण्याच्या दृष्टीने मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पहाडावरील बौद्ध विहारापासून एक किमी अंतरावर अरण्यकांक व वृक्षमुलिकांक अधिष्ठान करीत होते.दरम्यान सुष्टीतील प्राणी मत्रांवर मैत्रीची शिकवण देणाऱ्या भन्तेवर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा करूण अंत झाला. ध्यान साधनेत अधिष्ठान सुरू असताना मृत्यू ओढावल्यास बौद्ध शासनात पवित्र मानल्या जात असले, तरी त्यांच्या जाण्याने तथागत गौतम बुद्धाचा शांतीदूत हरपला आहे. तर संघारामगिरीचे जनक महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांच्या संघात एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.परिसरातील बौद्ध बांधवांनी घेतले अंत्यदर्शनखडसंगी : बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बौद्ध भिक्खू राहुलबोधी यांच्यावर खडसंगी येथील स्मशानभूमीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आला. भंन्ते राहुलबोधी यांना अखेरचा निरोप देण्याकरिता अनेक धम्मबांधव सश्रुनयानांनी सहभागी झाले होते. पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा पार्थिव भिक्खू संघाच्या स्वाधीन केले. दरम्यान बौध्द भिक्खू संघ महाप्रज्ञा साधनभूमी, संघरामगिरीच्या व्यवस्थापनाने त्यांच्यावर अंत्यविधी खडसंगी येथील स्मशानभूमीत करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील गावा-गावांतून धम्मबांधवांचे जत्थे रात्री उशिरापर्यंत स्थानिक सम्राट अशोक बुद्धविहारात दाखल होऊन त्यांना वंदन केले. कडाक्याच्या थंडीतही मोठ्या संख्यने धम्मबांधव साश्रूनयनांने अंतयात्रेत सहभागी झाले होते. संघनायक महाथेरो भदंत ज्ञानज्योती व त्यांच्या भिक्खू संघाच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला.