तारण योजना ठरली शेतकर्यांना तारक
By Admin | Updated: May 25, 2014 23:27 IST2014-05-25T23:27:25+5:302014-05-25T23:27:25+5:30
गोंडपिपरी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये शेतमाल तारण योजनेंतर्गत १८६२ क्विंटल सोयाबीन तारण ठेवणार्या शेतकर्यांना प्रतिक्विंटल ४ हजार ५७१ एवढा भाव मिळाल्याने तारण लाभार्थी

तारण योजना ठरली शेतकर्यांना तारक
धाबा : गोंडपिपरी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये शेतमाल तारण योजनेंतर्गत १८६२ क्विंटल सोयाबीन तारण ठेवणार्या शेतकर्यांना प्रतिक्विंटल ४ हजार ५७१ एवढा भाव मिळाल्याने तारण लाभार्थी शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, सुरुवातीला व्यापार्यांना सोयाबिन विकणारे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने १ डिसेंबर २0१३ पासून सोयाबीन शेतमालासाठी तारण योजना सुरु केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील शेतकर्यांनी १ हजार ८६२ क्विंटल सोयाबिन समितीत तारण ठेवले. या सोयाबिनचा लिलाव करण्यासाठी बाहेरील व्यापार्यांना पाचारण करण्यात आले होते. मालाची अ ग्रेड, ब ग्रेड, क ग्रेड अशी प्रतवारी करण्यात आली. लिलावात चढय़ा बोलीनुसार अ ग्रेडकरिता ४ हजार ५७१ प्रतिक्विंटल, ब ग्रेडसाठी ४ हजार ५४६ प्रतिक्विंटल तर क ग्रेडसाठी ४ हजार ३२६ प्रतिक्विंटल एवढा भाव स्नेहा प्लांट व मध्य प्रदेशाच्या व्यापार्यांनी दिला. त्यामुळे २ हजार २00 ते २ हजार ८00 रुपये प्रतिक्विंटल भावाने स्थानिक व्यापार्यांना ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी करण्याकरिता सोयाबिन विक्री करणार्या शेतकर्यांचे दिवाळे निघाले तर तारण योजनेमध्ये शेतमाल ठेवणार्या शेतकर्यांना ही योजना तारक ठरली आहे. येणार्या वर्षात तरी शेतकर्यांनी सोयाबिन तारण योजनेत कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवावे, अशी विनंती सचिव जितेंद्र सोनटक्के, सभापती राजीवसिंह चंदेल यांनी केली आहे. सोयाबिनवगळता इतर पिकांसाठीही तारण योजना ३१ ऑगस्ट २0१४ पर्यंत सुरु असून सोयाबिनसह तारण योजनेत इतर माल देणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर विविध बक्षिसे बाजार समितीने जाहीर केली आहेत. तसेच शेतकर्यांसाठी १८ जानेवारी २0१४ पासून बैलबाजारालाही सुरुवात केली आहे. लाभ घेण्याची विनंती समितीतर्फे करण्यात आली. (वार्ताहर)