शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

भेजगावात पाण्यासाठी महिलांचा टाहो, तीन दिवसांपासून नळ योजना बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:21 IST

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

शशिकांत गणवीर

भेजगाव (चंद्रपूर) : मूल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भेजगाव येथे तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प पडला असून गावात पाणी समस्या गंभीर बनली आहे. परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

भेजगाव येथे कोटी रुपये खर्चून नवीन नळ योजना कार्यान्वित होणार आहे. मात्र, तोपर्यंत जुन्याच नळ योजनेवर गावकऱ्यांची तहान भागणार आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे मोटार जळाल्याचे कारण पुढे करीत तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प केल्याने ग्रामपंचायत विरोधात संताप व्यक्त केल्या जात आहे.

बोरचांदली व १९ गावांकरिता कार्यान्वित असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा या गावाला आधार होता. मात्र, ही योजना मागील आठ दिवसांपासून लिकेज दुरुस्तीच्या नावावर बंद आहे. त्यामुळे गावात कोणत्याही योजनेचे पाणी येणे बंद झाले आहे. परिणामतः गावात पाण्यासाठी महिलांचा हाहाकार माजला आहे.

जवळपास तीन हजार लोकवस्तीच्या गावात तीस वर्षांपूर्वीपासून जिल्हा परिषदेची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. त्यामुळे गावात इतर पाण्याच्या सुविधा तोकड्या आहेत. असे असले तरी एकाही बोअरवेल व विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे इतरत्र भटकंती करूनही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत.

आरो प्लांट बसविताच पडला बंद

ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोग निधीतून लाखो रुपये खर्च करून आरो प्लांट बसविले. मात्र, अल्पावधीतच ते बंद पडल्याने पदाधिकाऱ्यांनी या प्लांटच्या नावावर निधीची वाट लावल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सरपंच, सचिव गावात न राहता तालुक्यावरून गावाचा कारभार हाकत असल्याने स्थानिक समस्येपासून त्यांची नाळ तुटत असून गाव विकासापासून दूर आहे. परिणामतः गावाशी काहीही देणे घेणे नसल्याच्या तोऱ्यात पदाधिकारी वागत आहेत. आपण स्वतः सोयी सुविधेकरिता तालुक्यावर राहत असल्याने सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. ग्रामपंचायतीने पाणी समस्येकडे जातीने लक्ष देत त्वरित शुद्ध पाणीपुरवठा नियमित सुरू करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूरWaterपाणी