शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

भेजगावात पाण्यासाठी महिलांचा टाहो, तीन दिवसांपासून नळ योजना बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:21 IST

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

शशिकांत गणवीर

भेजगाव (चंद्रपूर) : मूल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भेजगाव येथे तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प पडला असून गावात पाणी समस्या गंभीर बनली आहे. परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

भेजगाव येथे कोटी रुपये खर्चून नवीन नळ योजना कार्यान्वित होणार आहे. मात्र, तोपर्यंत जुन्याच नळ योजनेवर गावकऱ्यांची तहान भागणार आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे मोटार जळाल्याचे कारण पुढे करीत तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प केल्याने ग्रामपंचायत विरोधात संताप व्यक्त केल्या जात आहे.

बोरचांदली व १९ गावांकरिता कार्यान्वित असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा या गावाला आधार होता. मात्र, ही योजना मागील आठ दिवसांपासून लिकेज दुरुस्तीच्या नावावर बंद आहे. त्यामुळे गावात कोणत्याही योजनेचे पाणी येणे बंद झाले आहे. परिणामतः गावात पाण्यासाठी महिलांचा हाहाकार माजला आहे.

जवळपास तीन हजार लोकवस्तीच्या गावात तीस वर्षांपूर्वीपासून जिल्हा परिषदेची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. त्यामुळे गावात इतर पाण्याच्या सुविधा तोकड्या आहेत. असे असले तरी एकाही बोअरवेल व विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे इतरत्र भटकंती करूनही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत.

आरो प्लांट बसविताच पडला बंद

ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोग निधीतून लाखो रुपये खर्च करून आरो प्लांट बसविले. मात्र, अल्पावधीतच ते बंद पडल्याने पदाधिकाऱ्यांनी या प्लांटच्या नावावर निधीची वाट लावल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सरपंच, सचिव गावात न राहता तालुक्यावरून गावाचा कारभार हाकत असल्याने स्थानिक समस्येपासून त्यांची नाळ तुटत असून गाव विकासापासून दूर आहे. परिणामतः गावाशी काहीही देणे घेणे नसल्याच्या तोऱ्यात पदाधिकारी वागत आहेत. आपण स्वतः सोयी सुविधेकरिता तालुक्यावर राहत असल्याने सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. ग्रामपंचायतीने पाणी समस्येकडे जातीने लक्ष देत त्वरित शुद्ध पाणीपुरवठा नियमित सुरू करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूरWaterपाणी