शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

भेजगावात पाण्यासाठी महिलांचा टाहो, तीन दिवसांपासून नळ योजना बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:21 IST

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

शशिकांत गणवीर

भेजगाव (चंद्रपूर) : मूल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भेजगाव येथे तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प पडला असून गावात पाणी समस्या गंभीर बनली आहे. परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

भेजगाव येथे कोटी रुपये खर्चून नवीन नळ योजना कार्यान्वित होणार आहे. मात्र, तोपर्यंत जुन्याच नळ योजनेवर गावकऱ्यांची तहान भागणार आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे मोटार जळाल्याचे कारण पुढे करीत तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प केल्याने ग्रामपंचायत विरोधात संताप व्यक्त केल्या जात आहे.

बोरचांदली व १९ गावांकरिता कार्यान्वित असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा या गावाला आधार होता. मात्र, ही योजना मागील आठ दिवसांपासून लिकेज दुरुस्तीच्या नावावर बंद आहे. त्यामुळे गावात कोणत्याही योजनेचे पाणी येणे बंद झाले आहे. परिणामतः गावात पाण्यासाठी महिलांचा हाहाकार माजला आहे.

जवळपास तीन हजार लोकवस्तीच्या गावात तीस वर्षांपूर्वीपासून जिल्हा परिषदेची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. त्यामुळे गावात इतर पाण्याच्या सुविधा तोकड्या आहेत. असे असले तरी एकाही बोअरवेल व विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे इतरत्र भटकंती करूनही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत.

आरो प्लांट बसविताच पडला बंद

ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोग निधीतून लाखो रुपये खर्च करून आरो प्लांट बसविले. मात्र, अल्पावधीतच ते बंद पडल्याने पदाधिकाऱ्यांनी या प्लांटच्या नावावर निधीची वाट लावल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सरपंच, सचिव गावात न राहता तालुक्यावरून गावाचा कारभार हाकत असल्याने स्थानिक समस्येपासून त्यांची नाळ तुटत असून गाव विकासापासून दूर आहे. परिणामतः गावाशी काहीही देणे घेणे नसल्याच्या तोऱ्यात पदाधिकारी वागत आहेत. आपण स्वतः सोयी सुविधेकरिता तालुक्यावर राहत असल्याने सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. ग्रामपंचायतीने पाणी समस्येकडे जातीने लक्ष देत त्वरित शुद्ध पाणीपुरवठा नियमित सुरू करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूरWaterपाणी