शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

गोड बोलण्यातून वाढेल एकमेकांप्रती आत्मियता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:04 PM

संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब व सभोवतीचे सामाजिक पर्यावरण कसे असते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देप्रशासन अधिकारी (शिक्षण) नित यांचा सल्ला

संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब व सभोवतीचे सामाजिक पर्यावरण कसे असते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोड अन् लाघवी बोलण्यातून माणसे जुळतात. नकारात्मक बोलण्याने दुरावतात, असे मत चंद्रपूर मनपाचे प्रशासन अधिकारी (शिक्षण) नागेश नित यांनी व्यक्त केले.गोड बोलण्यामुळे खरे यातून एकमेकांविषयी आदराची भावना निर्माण होते. तरीदेखील काही व्यक्ती याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतो. कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ शाळेतच जात जातो. अध्यापन व अध्ययनाची प्रक्रिया ही दुहेरी असते. यामध्ये संवाद हा घटक महत्त्वाचा ठरतो. विषय समजावून सांगताना शिक्षक रंजकतेचा वापर करत असतील तर ज्ञान विद्यार्थ्यांच्या मनात ठसते. ज्ञानग्रहनातील संकटे दूर होतात. मराठी संत साहित्यात अशी हजारो उदाहरणे आहेत. जगणे कितीही कष्टप्रद असो गोड बोलण्याने एका क्षणात दु:ख हलके होते.दैनंदिन आयुष्यात अनेकदा मतभेद निर्माण होतात. मात्र मनभेदांना थारा देऊ नये. बोलण्यातील माधुर्य टिकविण्याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. दोन पिढ्यांचा भाषिकस्तर आता बदलला असला तरी त्यातील गोडवा कदापि संपणार नाही, अशी शब्दसंपत्ती मराठी भाषेत आहे.